शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

सेंद्रिय शेतीला आता शासनाचे बळ

By admin | Updated: April 1, 2016 00:40 IST

रासायनिक शेतीचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत. त्यामुळे शेतकरी आता सेंद्रिय शेतीकडे वळू लागला आहे.

प्रशिक्षण : शेतकऱ्यांचे गट होणार स्थापनअमरावती : रासायनिक शेतीचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत. त्यामुळे शेतकरी आता सेंद्रिय शेतीकडे वळू लागला आहे. यासाठी केंद्र शासनाने सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करणारी योजना आखली आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांचे गट स्थापित करण्यात येणार आहे व मार्गदर्शन करून सेंद्रीय शेतीसाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. यामधून उत्पादित शेतीमालाला बाजारपेठ उपलब्ध करून कमी किमतीत ग्राहकांना शेतीमाल पुरविणे, हा या योजनेचा मूळ उद्देश आहे. पार्टिसीपेटरी गॅरंटी सिस्टीम (पीजीस प्रणाली) अंतर्गत सेंद्रिय शेती करू इच्छिणाऱ्या प्रत्येक गावातील शेतकऱ्यांचे गट स्थापित होणार आहेत. या गटातील प्रत्येक शेतकऱ्याने तीन वर्षांपर्यंत सेंद्रीय पध्दतीने शेती करणे बंधनकारक असणार आहे. तीन वर्षाच्या कालावधीत प्रत्येकवर्षी माती, पाणी परीक्षण केले जाईल. पिकाच्या गरजेनुसार मातीमध्ये काही कमतरता असल्यास त्या अन्नद्रव्याची भरपाई सेंद्रीय खताद्वारे करण्याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. यागटांना वेळोवेळी प्रशिक्षणे, अभ्यासदौरे व तज्ज्ञ व्यक्तीद्वारे प्रात्याक्षिके दिली जाणार आहे. सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेला शेतीमाल तो सेंद्रीय असल्याचा पुरावा म्हणून सेंद्रीय प्रमाणिकरण करुन घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. जीपीएस प्रणालीद्वारे ही प्रमाणीकरणाची पद्धत अधिक सोपी होणार आहे. सेंद्रिय शेतीसाठी सामूहिक गटांतर्गत शेतकरी एकत्र आल्यास त्या शेतकऱ्यांच्या शेतावर विविध सेंद्रीय खते, किटकनाशके, रोगनाशके, वाढ प्रेरके तयार करण्यासाठी प्रोत्साहित केल्या जाणार आहे. उत्पादन खर्चात बचत होऊन उत्पादीत माल कमी किंमतीत अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचविला जाणार आहे. त्यामुळे सेंद्रीय शेतीला आता ‘अच्छे दिन’ येणार आहेत. ही बाब शेतकऱ्यांसाठी सकारात्मक आहे. (प्रतिनिधी)