शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
2
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
3
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
4
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
5
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
6
शरणू हांडेचं अपहरण करणारा 'तो' युवक आणि मास्टरमाईंड कोण?; गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक आरोप
7
Kapil Sharma : "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी
8
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
9
Duleep Trophy 2025 : ज्युनिअरच्या नेतृत्वाखाली कर्तृत्व दाखवण्यासाठी मैदानात उतरणार हे २ सिनियर्स
10
सारखा भाऊच का? रक्षाबंधनाला बहिणीने ओवाळणी द्यायची की भावाने? भाऊबीजेचे काय, वाचा यमाची कथा...
11
थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव
12
Video - 'ते' आले अन् धारदार शस्त्रांनी केला हल्ला; हुमा कुरेशीच्या भावाच्या हत्येचे CCTV फुटेज
13
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
14
पालकमंत्रिपदाचा तिढा सुटेना; आता ध्वजवंदनावरून वादंग; १५ ऑगस्टचा मान गोगावलेंना देण्याची मागणी
15
पाक क्रिकेटर बलात्कार प्रकरणात अडकला; पोलिसांनी मॅच सुरु असतानाच ठोकल्या बेड्या
16
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
17
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
18
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
19
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
20
तिसरा श्रावण शनिवार: तुमची साडेसाती सुरू आहे? अश्वत्थ मारुती पूजनासह ‘हे’ ५ शनि उपाय कराच!

सेंद्रिय शेतीला आता शासनाचे बळ

By admin | Updated: April 1, 2016 00:40 IST

रासायनिक शेतीचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत. त्यामुळे शेतकरी आता सेंद्रिय शेतीकडे वळू लागला आहे.

प्रशिक्षण : शेतकऱ्यांचे गट होणार स्थापनअमरावती : रासायनिक शेतीचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत. त्यामुळे शेतकरी आता सेंद्रिय शेतीकडे वळू लागला आहे. यासाठी केंद्र शासनाने सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करणारी योजना आखली आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांचे गट स्थापित करण्यात येणार आहे व मार्गदर्शन करून सेंद्रीय शेतीसाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. यामधून उत्पादित शेतीमालाला बाजारपेठ उपलब्ध करून कमी किमतीत ग्राहकांना शेतीमाल पुरविणे, हा या योजनेचा मूळ उद्देश आहे. पार्टिसीपेटरी गॅरंटी सिस्टीम (पीजीस प्रणाली) अंतर्गत सेंद्रिय शेती करू इच्छिणाऱ्या प्रत्येक गावातील शेतकऱ्यांचे गट स्थापित होणार आहेत. या गटातील प्रत्येक शेतकऱ्याने तीन वर्षांपर्यंत सेंद्रीय पध्दतीने शेती करणे बंधनकारक असणार आहे. तीन वर्षाच्या कालावधीत प्रत्येकवर्षी माती, पाणी परीक्षण केले जाईल. पिकाच्या गरजेनुसार मातीमध्ये काही कमतरता असल्यास त्या अन्नद्रव्याची भरपाई सेंद्रीय खताद्वारे करण्याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. यागटांना वेळोवेळी प्रशिक्षणे, अभ्यासदौरे व तज्ज्ञ व्यक्तीद्वारे प्रात्याक्षिके दिली जाणार आहे. सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेला शेतीमाल तो सेंद्रीय असल्याचा पुरावा म्हणून सेंद्रीय प्रमाणिकरण करुन घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. जीपीएस प्रणालीद्वारे ही प्रमाणीकरणाची पद्धत अधिक सोपी होणार आहे. सेंद्रिय शेतीसाठी सामूहिक गटांतर्गत शेतकरी एकत्र आल्यास त्या शेतकऱ्यांच्या शेतावर विविध सेंद्रीय खते, किटकनाशके, रोगनाशके, वाढ प्रेरके तयार करण्यासाठी प्रोत्साहित केल्या जाणार आहे. उत्पादन खर्चात बचत होऊन उत्पादीत माल कमी किंमतीत अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचविला जाणार आहे. त्यामुळे सेंद्रीय शेतीला आता ‘अच्छे दिन’ येणार आहेत. ही बाब शेतकऱ्यांसाठी सकारात्मक आहे. (प्रतिनिधी)