शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
3
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
4
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
5
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
6
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
7
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
8
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
9
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
10
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
11
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
12
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
14
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
15
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
16
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
17
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
18
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
19
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
20
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...

आता अकृषी विद्यापीठांमध्ये गुणपत्रिकेचा एकच पॅटर्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 18:32 IST

उच्च न्यायालयाचे आदेश : उच्च व शिक्षण संचालकांनी तयार केला प्रस्ताव

गणेश वासनिक, अमरावती : राज्यात १३ अकृषी विद्यापीठांमध्ये गुणपत्रिकेचा एकच पॅटर्न असणार आहे. विद्यापीठांत परीक्षा प्रणाली ही सेमिस्टर पद्धतीची लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आता अंतिम वर्षाच्या गुणपत्रिकेवर श्रेणी आणि गुण अशा दोन्ही बाबी नमूद असतील, असा प्रस्ताव उच्च व शिक्षण विभागाने तयार केला असून, तो राज्य शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे.पुणे येथे उच्च व शिक्षण संचालक कार्यालयात राज्यातील १३ विद्यापीठांचे परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक आणि सीईटी सेलचे प्रतिनिधी हजर होते. यावेळी समान गुणपत्रिकेच्या विषयावर विद्यापीठाच्या परीक्षा संचालकांनी मते नोंदविली आणि प्रस्तावित परीक्षा प्रणालीची माहिती सादर केली. दरम्यान, उच्च व शिक्षण संचालक धनराज माने यांनी विद्यापीठांमध्ये गुणपत्रिका समान असावी, या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात माहिती दिली. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार परीक्षांसाठी सेमिस्टर पॅटर्न लागू झाला. त्यामुळे गुणपत्रिकेवर श्रेणी आणि गुण अशा दोन्ही बाबी नमूद करूनच विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देणे अनिवार्य आहे. मात्र, मुंबई विद्यापीठाच्या विधी अभ्यासक्रमाच्या एका विद्यार्थ्याला अंतिम वर्षाची गुणपत्रिका देताना यात श्रेणी नमूद होती. त्यामुळे या विद्यार्थ्याला नेमके किती गुण मिळाले, हे स्पष्ट होऊ शकले नाही, अशा विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेशास अडचणी निर्माण झाल्यात. परिणामी त्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आणि न्यायासाठी याचिका सादर केली. या याचिकेवर निकाल देताना मुंबई उच्च न्यायालयाने राज्य शासनाला विद्यापीठांमध्ये गुणपत्रिकेचा पॅटर्न एकच असावा, असे निर्देश दिले आहेत. या निर्देशाची अंमलबजावणी आता अकृषी विद्यापीठांमध्ये युद्धस्तरावर केली जाणार आहे.

शासन निर्णयाची प्रतीक्षा मुंबई विद्यापीठात विधी अभ्यासक्रमात सन २०१८-२०१९ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेतील त्रुटींमुळे सर्वच विद्यापीठांमध्ये एकच गुणपत्रिकेच्या पॅटर्नची अंमलबजावणी केली जाणार आहे. डिजिटल आणि सेमिस्टर प्रणालीमुळे हे शक्य आहे. यापुढे गुणपत्रिकेवर श्रेणी आणि गुण अशा दोन्ही बाबी नमूद असतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना नेमके किती गुण आणि कोणती श्रेणी आहे, हे गुणपत्रिकेवरून स्पष्ट होईल. उच्च व शिक्षण विभागाने प्रस्ताव ब तयार करून तो शासनाकडे पाठविला आहे. मात्र, आता याबाबत शासन निर्णयाची प्रतीक्षा आहे.    पुणे येथील उच्च शिक्षण संचालकांकडे झालेल्या बैठकीत आता अकृषी विद्यापीठांमध्ये गुणपत्रिका एकाच पॅटर्नची असावी, असे शिक्कामोर्तब झाले आहे. हा प्रस्ताव पुढील निर्णयासाठी राज्य शासनाकडे पाठविला जाईल. एकदा शासनाने मान्यता दिली की याची अंमलबजावणी विद्यापीठांमध्ये सुरू होईल.      - हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, अमरावती विद्यापीठ

टॅग्स :Amravatiअमरावती