शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

आता महापालिकाच करणार पाणी पुरवठा

By admin | Updated: August 8, 2015 00:11 IST

राज्यात मुंबईनंतर अमरावती येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची पाणीपुरवठा योजना प्रसिद्ध आहे.

अमरावती : राज्यात मुंबईनंतर अमरावती येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची पाणीपुरवठा योजना प्रसिद्ध आहे. आता ही योजना महापालिकेच्या ताब्यात येणार असून त्याअनुषंगाने आयुक्त गुडेवार यांनी हालचाली सुरु केल्या आहेत. सात कोटी रूपयांनी नफ्यात असलेली ही योजना लवकरच महापालिकेच्या ताब्यात जाण्याचे संकेत आहेत.शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने जीवन प्राधिकरणच्या ताब्यातील पाणी पुरवठा योजना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ताब्यात देण्याची मोहीम सुरु केली आहे. त्यानुसार येथील पाणी पुरवठा योजना महापालिकेच्या ताब्यात येईल, हे जवळपास निश्चित झाले आहे. योजना ताब्यात घेण्यासाठीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मान्य करुन तो शासनाकडे पाठविला जाणार आहे. अमरावती शहराची ‘स्मार्ट सिटी’ उपक्रमात निवड झाल्यानंतर नागरिकांना स्मार्ट सुविधा देण्यासाठी हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. २४ तास पाणीपुरवठा करण्याचा निकष ‘स्मार्ट सिटी’साठी असल्याने तो पूर्ण करावाच लागेल. त्यादृष्टीने योजना हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे.घर तेथे नळ 'कनेक्शन'शहरातील प्रत्येक नागरिकाच्या घरी नळ कनेक्शन अनिवार्य असेल. २४ तास पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक नळ बंद केले जातील. त्यानंतर झोपडपट्ट्यांमध्ये सर्वांना नळ कनेक्शन दिले जाईल, असे आयुक्त गुडेवार यांनी स्पष्ट केले. नवबौध्द, अनुसूचित जातींना शासन अनुदानातून नळ 'कनेक्शन' दिले जात आहेत.पाणीपुरवठा योजना महापालिकेच्या ताब्यात देण्याच्या हालचाली शासनस्तरावर सुरू झाल्या आहेत. ही योजना नफ्यात असून ती ताब्यात घेण्यास काहीही अडचण नाही. सभागृहाच्या ठरावानंतर हालचाली वेगाने सुरू होतील.- चंद्रकांत गुडेवार,आयुक्त, महापालिका.