शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

आता उठवा सारे रान!

By admin | Updated: April 21, 2015 00:15 IST

जिल्ह्यात फेब्रुवारी व मार्च महिन्यात अवकाळीने ५०,२७७ हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाले.

अवकाळीतही डावलला शेतकरी : ‘एनडीआरएफ’नुसार हेक्टरी १२ हजार हवी मदतगजानन मोहोड अमरावतीजिल्ह्यात फेब्रुवारी व मार्च महिन्यात अवकाळीने ५०,२७७ हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने मात्र ५० टक्क्यांवर ८,०१२ हेक्टर नुकसानीचा संयुक्त अहवाल पाठविला. यामध्ये बाधित असताना ८ तालुके निरंक दाखविल्याने ते मदतीपासून वंचित राहणार आहेत. आपादग्रस्तांना विशेष बाब म्हणून मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने १३ एप्रिल रोजी घेतला आहे. तत्पूर्वी ३३ टक्के नुकसानीचा निकषाने हेक्टरी १२ हजार २०० रुपयांपर्यंत मदत देण्याचे परिपत्रक केंद्र शासनाने ८ एप्रिल २०१५ रोजी काढले. हे निकष राज्य शासनाला बंधनकारक असताना टाळाटाळ केली जात आहे. नैसर्गिक आपत्तीसाठी सुधारित आपत्ती मदत मिळायला पाहिजे. यासाठी लोकप्रतिनिधीसह सर्वांनी रान उठवायला पाहिजे. जिल्ह्यात प्रामुख्याने २८ फेब्रुवारी व १ मार्च व नंतर मार्च महिन्यात धामणगाव व भातकुली तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने शेती पिके व फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. ५० हजार हेक्टरवर क्षेत्रात नुकसान झाले असताना जिल्हा प्रशासनाने केवळ धामणगाव, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, चांदूररेल्वे, धामणगाव व अमरावती तालुक्यात ५० टक्क्यांवर नुकसान झाल्याचा संयुक्त अहवाल शासनाला पाठविला. नुकसान झाले असताना कागदी घोडे नाचवित पंचनामे झाले असल्याने ४२,७६६ हेक्टर बाधित क्षेत्र शासनाने घोषित केलेल्या मदतीपासून वंचित राहिले आहे. अवकाळी व बाधित झालेल्यांना विशेष बाब म्हणून मदत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. प्रत्यक्षात या निर्णयापूर्वीच केंद्र शासनाने १४ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीचे (नॅशनल डिझॉष्टर रिपॉन्स फंड) अध्यादेश ८ एप्रिलला जारी केले. राज्य सरकारला हे बंधनकारक आहे.२०१५ ते २०२० साठी ‘अध्यादेश’ नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधितांना मदत देण्यासाठी 'केंद्रीय आपत्ती प्रतिसाद निधी'द्वारा ८ एप्रिल रोजी काढण्यात आलेला अध्यादेश हा सन २०१५ ते २०२० या कालावधीसाठी राज्य शासनाला बंधनकारक आहे. यामध्ये केंद्र शासनाने शेतीपिकांचे ३३ टक्के नुकसान हा मदतीचा निकष ठरविला आहे. फेब्रुवारी, मार्च अवकाळीसाठी बंधनकारकनैसर्गिक आपत्तीसाठी शासनाने सुधारित मदतीचे धोरण केंद्र शासनाने १ एप्रिल २०१५ ते २०२० या कालावधीसाठी बंधनकारक केले आहे. मात्र या अध्यादेशामध्ये देशात फेब्रुवारी व मार्च २०१५ मध्ये अवकाळीमुळे बाधित असलेल्या सर्व क्षेत्रासाठी या अध्यादेशाचे निकष बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांवरील अन्याय खपवून घेणार नाही. शासनाकडे मुद्दा रेटला आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहिल. वेळ पडल्यास आक्रमक भूमिका घेऊ .-यशोमती ठाकूर, आमदार, तिवसा मतदारसंघ.राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीसंदर्भात अध्यादेश निघाला आहे. ३३ टक्के बाधित क्षेत्राला मदत मिळू शकते. २२ एप्रिलला मुख्यमंत्र्यांना भेटू.- अनिल बोंडे, आमदार, मोर्शी मतदारसंघ.केंद्राचा निर्णय राज्य सरकारला बंधनकारक आहे. त्या निर्णयाची अंमलबजावणी करायला पाहिजे. शासनाने धोरण ठरविले नाही तर तीव्र आंदोलन करू.- बच्चू कडू, आमदार,अचलपूर मतदारसंघ.अवकाळी मदतीसंदर्भात राज्य शासनाचा निर्णय झाला आहे. निधी अप्राप्त आहे. एनडीआरएफच्या अध्यादेशाप्रमाणेच ही मदत राहण्याची शक्यता आहे.- ज्ञानेश्वर राजूरकर, विभागीय आयुक्त, अमरावती.