शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
2
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
3
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
4
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
5
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
6
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
7
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
8
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
9
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
10
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
11
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
12
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
13
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
14
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
15
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
16
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
17
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
18
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
19
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
20
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)

आता आषाढातही ‘शुभमंगल सावधान’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:10 IST

( श्यामकांत सहस्त्रभोजने ) बडनेरा : पूर्वी आषाढात लग्न वर्ज्य होते. शास्त्रामध्ये चतुर्मासात लग्न सोहळ्याला नकार आहे. आषाढात साधारणतः ...

( श्यामकांत सहस्त्रभोजने )

बडनेरा : पूर्वी आषाढात लग्न वर्ज्य होते. शास्त्रामध्ये चतुर्मासात लग्न सोहळ्याला नकार आहे. आषाढात साधारणतः शुभकार्य टाळली जातात. मात्र, कोरोना महामारीमुळे लोकांपुढे अनेक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. अशा परिस्थितीत मुहूर्ताची तिथी आटोपल्यानंतरही शुभ दिवस पाहून आता आषाढात ‘शुभमंगल सावधान’ केले जात आहे.

यंदा १५ जुलै ही लग्न मुहूर्ताची शेवटची तारीख होती. कोरोना महामारीमुळे दोन वर्षांत अनेक लोक आषाढ, श्रावणात शुभदिवस पाहून लग्न सोहळे पार पाडीत आहेत. वाढती लोकसंख्या, मर्यादित मंगल कार्यालये आणि महामारी यांसारख्या अडचणीमुळे लोकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. त्यामुळेच सोईचा शुभ दिवस पाहून लग्नसोहळे आटोपले जात आहेत. यंदा जुलै महिन्यात २५, २७, २८, २९, तर ऑगस्टमध्ये ९, ११, १३, १४, १९, २०, २३, २४, २७, ३०, ३१ ऑगस्टपर्यंत शुभ दिवस आहेत. या तारखांवर बऱ्याच ठिकाणचे मंगल कार्यालय बुक आहेत. कोरोनामुळे लांबलेले विवाह सोहळे आषाढात पार पडत आहेत. अलीकडे मुहुर्ताशिवाय सोईनुसार विवाह सोहळे केल्या जात असल्याचे पाहावयास मिळत आहे.

---------------------

मंगल कार्यालये बूक

आषाढात विवाह करू नये, असे शास्त्र सांगते. अलीकडे त्यामध्ये बदल पाहावयास मिळतो आहे. बऱ्याच लोकांना त्यांच्या अडचणीमुळे मुहुर्ताचे दिवस साधता येत नाही. त्यामुळे लग्न मुहुर्ताची शेवटची तारीख आटोपल्यानंतरही काही शुभ दिवस असतात. त्यावर लग्न सोहळे केले जात आहेत. ३१ ऑगस्टपर्यंत शुभ दिवस आहेत. बरीच लहान-मोठी मंगल कार्यालये लग्न सोहळ्यासाठी बूक असल्याची माहिती मंगल कार्यालयांच्या व्यवस्थापकांकडून मिळाली. बरेच लोक आपल्या घरीच लग्न सोहळा करीत आहेत.

--------------------------

परवानगी पन्नास लोकांची पण...

कोरोना महामारीमुळे शासन प्रशासन स्तरावर लग्न सोहळ्यासाठी ५० लोकांचीच उपस्थिती निश्चित करण्यात आलेली आहे. काही लग्न सोहळे नियमांचे काटेकोर पालन करून पार पडले. मात्र, काहींनी नातेवाइकांचा रोष टाळण्यासाठी टप्प्याटप्प्याने मंडपात बोलवून आपल्या मनासारखे विवाह सोहळे पार पाडल्याचे चित्र पाहावयास मिळाले. काही लग्न सोहळे नियम डावलून प्रचंड गर्दीने झाले. काहींना प्रशासनाच्या कारवाईलादेखील सामोरे जावे लागले.

------------------------------

आषाढात शुभ तारखा......

१) यंदा आषाढात १५ जुलै ही लग्न मुहूर्ताची शेवटची तारीख होती. त्यानंतर २० नोव्हेंबरलाच लग्न मुहुर्ताची पहिली तारीख आहे. वधू-वर पित्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या अडचणींचा विचार करून लांबलेले विवाह सोहळे शुभ दिवस पाहून पार पाडले जातात.

- रमेश तेलंग, पुरोहित, अमरावती.

2) आषाढ, श्रावणात शुभ दिवसांच्या तारखा पाहून मुलामुलींकडील लोक लग्न सोहळे करतात. कोरोना महामारीमुळे बऱ्याच लोकांना लग्न सोहळे पार पाडताना अडचणींचा सामना करावा लागतो. यंदा १५ जुलैपर्यंतच लग्नाचे मुहूर्त होते.

- दत्तात्रय राहाटगावकर, पुरोहित, बडनेरा.

---------------------------