शहरं
Join us  
Trending Stories
1
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
2
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
3
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
5
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
6
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
7
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
9
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
10
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
11
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
12
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
13
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
14
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
15
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
16
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
17
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
18
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
19
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
20
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित

आता आषाढातही ‘शुभमंगल सावधान’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:10 IST

( श्यामकांत सहस्त्रभोजने ) बडनेरा : पूर्वी आषाढात लग्न वर्ज्य होते. शास्त्रामध्ये चतुर्मासात लग्न सोहळ्याला नकार आहे. आषाढात साधारणतः ...

( श्यामकांत सहस्त्रभोजने )

बडनेरा : पूर्वी आषाढात लग्न वर्ज्य होते. शास्त्रामध्ये चतुर्मासात लग्न सोहळ्याला नकार आहे. आषाढात साधारणतः शुभकार्य टाळली जातात. मात्र, कोरोना महामारीमुळे लोकांपुढे अनेक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. अशा परिस्थितीत मुहूर्ताची तिथी आटोपल्यानंतरही शुभ दिवस पाहून आता आषाढात ‘शुभमंगल सावधान’ केले जात आहे.

यंदा १५ जुलै ही लग्न मुहूर्ताची शेवटची तारीख होती. कोरोना महामारीमुळे दोन वर्षांत अनेक लोक आषाढ, श्रावणात शुभदिवस पाहून लग्न सोहळे पार पाडीत आहेत. वाढती लोकसंख्या, मर्यादित मंगल कार्यालये आणि महामारी यांसारख्या अडचणीमुळे लोकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. त्यामुळेच सोईचा शुभ दिवस पाहून लग्नसोहळे आटोपले जात आहेत. यंदा जुलै महिन्यात २५, २७, २८, २९, तर ऑगस्टमध्ये ९, ११, १३, १४, १९, २०, २३, २४, २७, ३०, ३१ ऑगस्टपर्यंत शुभ दिवस आहेत. या तारखांवर बऱ्याच ठिकाणचे मंगल कार्यालय बुक आहेत. कोरोनामुळे लांबलेले विवाह सोहळे आषाढात पार पडत आहेत. अलीकडे मुहुर्ताशिवाय सोईनुसार विवाह सोहळे केल्या जात असल्याचे पाहावयास मिळत आहे.

---------------------

मंगल कार्यालये बूक

आषाढात विवाह करू नये, असे शास्त्र सांगते. अलीकडे त्यामध्ये बदल पाहावयास मिळतो आहे. बऱ्याच लोकांना त्यांच्या अडचणीमुळे मुहुर्ताचे दिवस साधता येत नाही. त्यामुळे लग्न मुहुर्ताची शेवटची तारीख आटोपल्यानंतरही काही शुभ दिवस असतात. त्यावर लग्न सोहळे केले जात आहेत. ३१ ऑगस्टपर्यंत शुभ दिवस आहेत. बरीच लहान-मोठी मंगल कार्यालये लग्न सोहळ्यासाठी बूक असल्याची माहिती मंगल कार्यालयांच्या व्यवस्थापकांकडून मिळाली. बरेच लोक आपल्या घरीच लग्न सोहळा करीत आहेत.

--------------------------

परवानगी पन्नास लोकांची पण...

कोरोना महामारीमुळे शासन प्रशासन स्तरावर लग्न सोहळ्यासाठी ५० लोकांचीच उपस्थिती निश्चित करण्यात आलेली आहे. काही लग्न सोहळे नियमांचे काटेकोर पालन करून पार पडले. मात्र, काहींनी नातेवाइकांचा रोष टाळण्यासाठी टप्प्याटप्प्याने मंडपात बोलवून आपल्या मनासारखे विवाह सोहळे पार पाडल्याचे चित्र पाहावयास मिळाले. काही लग्न सोहळे नियम डावलून प्रचंड गर्दीने झाले. काहींना प्रशासनाच्या कारवाईलादेखील सामोरे जावे लागले.

------------------------------

आषाढात शुभ तारखा......

१) यंदा आषाढात १५ जुलै ही लग्न मुहूर्ताची शेवटची तारीख होती. त्यानंतर २० नोव्हेंबरलाच लग्न मुहुर्ताची पहिली तारीख आहे. वधू-वर पित्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या अडचणींचा विचार करून लांबलेले विवाह सोहळे शुभ दिवस पाहून पार पाडले जातात.

- रमेश तेलंग, पुरोहित, अमरावती.

2) आषाढ, श्रावणात शुभ दिवसांच्या तारखा पाहून मुलामुलींकडील लोक लग्न सोहळे करतात. कोरोना महामारीमुळे बऱ्याच लोकांना लग्न सोहळे पार पाडताना अडचणींचा सामना करावा लागतो. यंदा १५ जुलैपर्यंतच लग्नाचे मुहूर्त होते.

- दत्तात्रय राहाटगावकर, पुरोहित, बडनेरा.

---------------------------