शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

आता आषाढातही ‘शुभमंगल सावधान’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:10 IST

( श्यामकांत सहस्त्रभोजने ) बडनेरा : पूर्वी आषाढात लग्न वर्ज्य होते. शास्त्रामध्ये चतुर्मासात लग्न सोहळ्याला नकार आहे. आषाढात साधारणतः ...

( श्यामकांत सहस्त्रभोजने )

बडनेरा : पूर्वी आषाढात लग्न वर्ज्य होते. शास्त्रामध्ये चतुर्मासात लग्न सोहळ्याला नकार आहे. आषाढात साधारणतः शुभकार्य टाळली जातात. मात्र, कोरोना महामारीमुळे लोकांपुढे अनेक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. अशा परिस्थितीत मुहूर्ताची तिथी आटोपल्यानंतरही शुभ दिवस पाहून आता आषाढात ‘शुभमंगल सावधान’ केले जात आहे.

यंदा १५ जुलै ही लग्न मुहूर्ताची शेवटची तारीख होती. कोरोना महामारीमुळे दोन वर्षांत अनेक लोक आषाढ, श्रावणात शुभदिवस पाहून लग्न सोहळे पार पाडीत आहेत. वाढती लोकसंख्या, मर्यादित मंगल कार्यालये आणि महामारी यांसारख्या अडचणीमुळे लोकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. त्यामुळेच सोईचा शुभ दिवस पाहून लग्नसोहळे आटोपले जात आहेत. यंदा जुलै महिन्यात २५, २७, २८, २९, तर ऑगस्टमध्ये ९, ११, १३, १४, १९, २०, २३, २४, २७, ३०, ३१ ऑगस्टपर्यंत शुभ दिवस आहेत. या तारखांवर बऱ्याच ठिकाणचे मंगल कार्यालय बुक आहेत. कोरोनामुळे लांबलेले विवाह सोहळे आषाढात पार पडत आहेत. अलीकडे मुहुर्ताशिवाय सोईनुसार विवाह सोहळे केल्या जात असल्याचे पाहावयास मिळत आहे.

---------------------

मंगल कार्यालये बूक

आषाढात विवाह करू नये, असे शास्त्र सांगते. अलीकडे त्यामध्ये बदल पाहावयास मिळतो आहे. बऱ्याच लोकांना त्यांच्या अडचणीमुळे मुहुर्ताचे दिवस साधता येत नाही. त्यामुळे लग्न मुहुर्ताची शेवटची तारीख आटोपल्यानंतरही काही शुभ दिवस असतात. त्यावर लग्न सोहळे केले जात आहेत. ३१ ऑगस्टपर्यंत शुभ दिवस आहेत. बरीच लहान-मोठी मंगल कार्यालये लग्न सोहळ्यासाठी बूक असल्याची माहिती मंगल कार्यालयांच्या व्यवस्थापकांकडून मिळाली. बरेच लोक आपल्या घरीच लग्न सोहळा करीत आहेत.

--------------------------

परवानगी पन्नास लोकांची पण...

कोरोना महामारीमुळे शासन प्रशासन स्तरावर लग्न सोहळ्यासाठी ५० लोकांचीच उपस्थिती निश्चित करण्यात आलेली आहे. काही लग्न सोहळे नियमांचे काटेकोर पालन करून पार पडले. मात्र, काहींनी नातेवाइकांचा रोष टाळण्यासाठी टप्प्याटप्प्याने मंडपात बोलवून आपल्या मनासारखे विवाह सोहळे पार पाडल्याचे चित्र पाहावयास मिळाले. काही लग्न सोहळे नियम डावलून प्रचंड गर्दीने झाले. काहींना प्रशासनाच्या कारवाईलादेखील सामोरे जावे लागले.

------------------------------

आषाढात शुभ तारखा......

१) यंदा आषाढात १५ जुलै ही लग्न मुहूर्ताची शेवटची तारीख होती. त्यानंतर २० नोव्हेंबरलाच लग्न मुहुर्ताची पहिली तारीख आहे. वधू-वर पित्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या अडचणींचा विचार करून लांबलेले विवाह सोहळे शुभ दिवस पाहून पार पाडले जातात.

- रमेश तेलंग, पुरोहित, अमरावती.

2) आषाढ, श्रावणात शुभ दिवसांच्या तारखा पाहून मुलामुलींकडील लोक लग्न सोहळे करतात. कोरोना महामारीमुळे बऱ्याच लोकांना लग्न सोहळे पार पाडताना अडचणींचा सामना करावा लागतो. यंदा १५ जुलैपर्यंतच लग्नाचे मुहूर्त होते.

- दत्तात्रय राहाटगावकर, पुरोहित, बडनेरा.

---------------------------