शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

- आता कृषी औजारांचा शेतकऱ्यांना थेट लाभ

By admin | Updated: February 9, 2017 00:09 IST

केंद्र व राज्य सरकार द्वारा कृषी विषयक योजनांसाठी शेतकऱ्यांना अनुदान वस्तु स्वरुपात न देता थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने देण्यात येणार आहे.

यापुढे अनुदान नाही : केंद्र, राज्य सरकारच्या योजनांसाठी निर्देश अमरावती : केंद्र व राज्य सरकार द्वारा कृषी विषयक योजनांसाठी शेतकऱ्यांना अनुदान वस्तु स्वरुपात न देता थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने देण्यात येणार आहे. या विषयांचे निर्देश कृष विभागाने २१ जानेवारीला दिले आहेत. शासनाद्वारा शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या कृषी विषयक योजनेंतर्गत लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने देण्यात यावे असा निर्णय ५ डिसेंबर २०१६ च्या नियोजन विभागाच्या बैठकीत घेण्यात आला होता. कृषी औजारे, पीक संरक्षण औजारे, विद्युत , डिझेल, बोअरवेल, सबमर्शिबल पंप व एचडीपीआई पाईप आदींचा लाभ आता अनुदान स्वरुपात देण्यात येणार नाही असे कृषी विभागाने जाहीर केले आहे. विविध योजनेतंर्गत अनुदानावर पुरवठा करावयाच्या कृषी औजारांची यादी व तांत्रिक निकष क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या व तांत्रिक समितच्या सल्ल्याने व क्षेत्रीय चाचणीच्या आधारे निश्चित करण्यात येणार आहे. ज्या औजारांच्या उत्पादकांनी प्रत्येक कृषी औजाराच्या पृष्ठभागावर कंपनीचे नाव, ब्रॅँड नाव, व प्रमाणीकरण व संस्थेने दिलेला प्रमाणिकरणाचा अनुक्रमांक छापला असेल अशाच कृषी औजारांचा समावेश या मध्ये करण्यात येणार आहे. शासनाच्या सूचना असल्यास काही देयकांची विक्री कर विभागाद्वारा सत्यता पडताळणी करण्यात येणार आहे. खोट्या देयकांच्याद्वारे अनुदानाची रकम मिळविणाऱ्यांवर नियंत्रण मिळविता येणार आहे. तसेच लाभार्थी स्वत: विक्रेत्यांकडून औजारांची खरेदी करणार असल्याने औजारांच्या गुणवत्तेसंदर्भात कृषी विभागाची कुठलाही संबंध राहणार नाही असे शासनाने स्पष्ट केले आहे. मार्च २०१७ पर्यंत औजाराचे प्रमाणीकरण जानेवारी ते मार्च २०१७ पर्यंत लाभार्थ्यांनी कृषी औजारे देयकांची स्वयंसाक्षांकित प्रत व औजारे मंजूर करतांना विहिद करण्यात आलेल्या अन्य कागदपत्रांच्या प्रती सादर करतांना लाभार्थी शेतकऱ्यांची ओळख बायोमेट्रीक पद्धतीने नोंदविण्याची व्यवस्था उपलब्ध नसल्यास अशा प्रकरणात औजारांचे फिजीकल व्हेरीफिकेशन करण्यात येणार आहे. कॅशलेस पद्धतीने राहणार व्यवहार शेतकऱ्यांना कृषी औजारांची खरेदी ही कॅशलेस पद्धतीने व त्यांच्या आधार क्रमांकासी निगडित स्वत:च्या बॅँक खात्याकडून विक्रेत्याला कृषी औजाराची रक्कम देणे बंधनकारक आहे. कृषी विभागाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अनुदानाची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने पंधरा दिवसाच्या आत जमा करणे संबंधितावर सेवा हमी कायद्यान्वये बंधनकारक राहणार आहे. असे आहेत लाभार्थी निवडीचे निकष शेतकऱ्यांची ओळख पटविण्याकरिता त्याचे स्वताचे नावे असलेला ७/१२ व ८-अ तसेच लाभार्थी अनु.जाती, जमाती, प्रवर्गातील असल्यास प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दिलेली वैध जात प्रमाणपत्राची प्रत, आधार कार्ड, शेतकऱ्यांचे बॅँक खाते आधार क्रमांकासी जोडून घेणे आवश्यक, त्याकरीता शेतकऱ्यांनी बॅँकेला दिलेल्या पत्राची व बॅँकेकडून मिळालेली पोहोच पावती अनिवार्य आहे.