शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

- आता कृषी औजारांचा शेतकऱ्यांना थेट लाभ

By admin | Updated: February 9, 2017 00:09 IST

केंद्र व राज्य सरकार द्वारा कृषी विषयक योजनांसाठी शेतकऱ्यांना अनुदान वस्तु स्वरुपात न देता थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने देण्यात येणार आहे.

यापुढे अनुदान नाही : केंद्र, राज्य सरकारच्या योजनांसाठी निर्देश अमरावती : केंद्र व राज्य सरकार द्वारा कृषी विषयक योजनांसाठी शेतकऱ्यांना अनुदान वस्तु स्वरुपात न देता थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने देण्यात येणार आहे. या विषयांचे निर्देश कृष विभागाने २१ जानेवारीला दिले आहेत. शासनाद्वारा शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या कृषी विषयक योजनेंतर्गत लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने देण्यात यावे असा निर्णय ५ डिसेंबर २०१६ च्या नियोजन विभागाच्या बैठकीत घेण्यात आला होता. कृषी औजारे, पीक संरक्षण औजारे, विद्युत , डिझेल, बोअरवेल, सबमर्शिबल पंप व एचडीपीआई पाईप आदींचा लाभ आता अनुदान स्वरुपात देण्यात येणार नाही असे कृषी विभागाने जाहीर केले आहे. विविध योजनेतंर्गत अनुदानावर पुरवठा करावयाच्या कृषी औजारांची यादी व तांत्रिक निकष क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या व तांत्रिक समितच्या सल्ल्याने व क्षेत्रीय चाचणीच्या आधारे निश्चित करण्यात येणार आहे. ज्या औजारांच्या उत्पादकांनी प्रत्येक कृषी औजाराच्या पृष्ठभागावर कंपनीचे नाव, ब्रॅँड नाव, व प्रमाणीकरण व संस्थेने दिलेला प्रमाणिकरणाचा अनुक्रमांक छापला असेल अशाच कृषी औजारांचा समावेश या मध्ये करण्यात येणार आहे. शासनाच्या सूचना असल्यास काही देयकांची विक्री कर विभागाद्वारा सत्यता पडताळणी करण्यात येणार आहे. खोट्या देयकांच्याद्वारे अनुदानाची रकम मिळविणाऱ्यांवर नियंत्रण मिळविता येणार आहे. तसेच लाभार्थी स्वत: विक्रेत्यांकडून औजारांची खरेदी करणार असल्याने औजारांच्या गुणवत्तेसंदर्भात कृषी विभागाची कुठलाही संबंध राहणार नाही असे शासनाने स्पष्ट केले आहे. मार्च २०१७ पर्यंत औजाराचे प्रमाणीकरण जानेवारी ते मार्च २०१७ पर्यंत लाभार्थ्यांनी कृषी औजारे देयकांची स्वयंसाक्षांकित प्रत व औजारे मंजूर करतांना विहिद करण्यात आलेल्या अन्य कागदपत्रांच्या प्रती सादर करतांना लाभार्थी शेतकऱ्यांची ओळख बायोमेट्रीक पद्धतीने नोंदविण्याची व्यवस्था उपलब्ध नसल्यास अशा प्रकरणात औजारांचे फिजीकल व्हेरीफिकेशन करण्यात येणार आहे. कॅशलेस पद्धतीने राहणार व्यवहार शेतकऱ्यांना कृषी औजारांची खरेदी ही कॅशलेस पद्धतीने व त्यांच्या आधार क्रमांकासी निगडित स्वत:च्या बॅँक खात्याकडून विक्रेत्याला कृषी औजाराची रक्कम देणे बंधनकारक आहे. कृषी विभागाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अनुदानाची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने पंधरा दिवसाच्या आत जमा करणे संबंधितावर सेवा हमी कायद्यान्वये बंधनकारक राहणार आहे. असे आहेत लाभार्थी निवडीचे निकष शेतकऱ्यांची ओळख पटविण्याकरिता त्याचे स्वताचे नावे असलेला ७/१२ व ८-अ तसेच लाभार्थी अनु.जाती, जमाती, प्रवर्गातील असल्यास प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दिलेली वैध जात प्रमाणपत्राची प्रत, आधार कार्ड, शेतकऱ्यांचे बॅँक खाते आधार क्रमांकासी जोडून घेणे आवश्यक, त्याकरीता शेतकऱ्यांनी बॅँकेला दिलेल्या पत्राची व बॅँकेकडून मिळालेली पोहोच पावती अनिवार्य आहे.