शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
5
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
6
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
7
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
8
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
9
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
10
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
11
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
12
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
13
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
14
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
15
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
16
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
17
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
18
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
19
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
20
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध

नैसर्गिक आपदग्रस्तांना आता ६ हजारांपर्यंत मदत, एसडीआरएफचे नवे निकष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2018 19:31 IST

केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती निकषाच्या धर्तीवर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणा-या आपदग्रस्तांना द्यावयाच्या मदतीच्या दरात सुधारणा करण्यात आली आहे.

अमरावती : केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती निकषाच्या धर्तीवर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणा-या आपदग्रस्तांना द्यावयाच्या मदतीच्या दरात सुधारणा करण्यात आली आहे. त्याबाबतचा आदेश महसूल व वनविभागाने २५ जानेवारीला जारी केला आहे. राज्यात नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमध्ये बाधित व्यक्तींना मदत देण्याकरिता केंद्र व राज्य शासनाने संयुक्तपणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची अर्थात स्टेट डिझॉस्टर रिस्पॉन्स फंड एसडीआरएफची स्थापना करण्यात आली. त्यात सन २०१५ ते २०२० या कालावधीकरिता मदतीच्या दराचे सुधारित निकष निश्चित केलेत. त्यामधील काही बाबीत सुधारणा करण्यात आल्या आहेत.नैसर्गिक आपत्तीमध्ये दोन दिवसांपेक्षा अधिक कालावधीपर्यंत क्षेत्र पाण्यात बुडाले असल्यास किंवा घरे पूर्णत: वाहून गेल्यास वा पूर्णत: क्षतिग्रस्त झाल्यास त्या कुटुंबांना प्रतिकुटुंब २५०० रुपये व घरगुती भांडी व वस्तू नुकसानीसाठी २५०० रुपये मिळणार आहेत. अंशत: पडझड झालेल्या घरांच्या नुकसानरपाईमध्येही सुधारणा करण्यात आली आहे. पक्या व कच्चा घरांची १५ टक्के पडझड झाली असल्यास प्रतिघर ६ हजार रुपये मिळणार आहेत. याशिवाय पडझड वा नष्ट झालेल्या झोपडीधारकाला प्रतिझोपडी ६ हजार रुपये मदत मिळेल.राज्य शासनाच्या सक्षम प्राधिका-याने बाधित झालेले घर हे अधिकृत असल्याचे प्रमाणित करणे आवश्यक असेल. याशिवाय बाधित झालेल्या झोपडीधारकाला मदत देण्यापूर्वी राज्य व जिल्हास्तरीय अधिका-यांनी झोपडे म्हणून प्रमाणित करणे अनिवार्य केले आहे.