शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
4
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
5
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
6
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
7
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
8
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
9
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
10
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
12
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
13
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
14
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
15
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
16
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
17
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
18
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
19
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक आपदग्रस्तांना आता ६ हजारांपर्यंत मदत, एसडीआरएफचे नवे निकष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2018 19:31 IST

केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती निकषाच्या धर्तीवर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणा-या आपदग्रस्तांना द्यावयाच्या मदतीच्या दरात सुधारणा करण्यात आली आहे.

अमरावती : केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती निकषाच्या धर्तीवर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणा-या आपदग्रस्तांना द्यावयाच्या मदतीच्या दरात सुधारणा करण्यात आली आहे. त्याबाबतचा आदेश महसूल व वनविभागाने २५ जानेवारीला जारी केला आहे. राज्यात नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमध्ये बाधित व्यक्तींना मदत देण्याकरिता केंद्र व राज्य शासनाने संयुक्तपणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची अर्थात स्टेट डिझॉस्टर रिस्पॉन्स फंड एसडीआरएफची स्थापना करण्यात आली. त्यात सन २०१५ ते २०२० या कालावधीकरिता मदतीच्या दराचे सुधारित निकष निश्चित केलेत. त्यामधील काही बाबीत सुधारणा करण्यात आल्या आहेत.नैसर्गिक आपत्तीमध्ये दोन दिवसांपेक्षा अधिक कालावधीपर्यंत क्षेत्र पाण्यात बुडाले असल्यास किंवा घरे पूर्णत: वाहून गेल्यास वा पूर्णत: क्षतिग्रस्त झाल्यास त्या कुटुंबांना प्रतिकुटुंब २५०० रुपये व घरगुती भांडी व वस्तू नुकसानीसाठी २५०० रुपये मिळणार आहेत. अंशत: पडझड झालेल्या घरांच्या नुकसानरपाईमध्येही सुधारणा करण्यात आली आहे. पक्या व कच्चा घरांची १५ टक्के पडझड झाली असल्यास प्रतिघर ६ हजार रुपये मिळणार आहेत. याशिवाय पडझड वा नष्ट झालेल्या झोपडीधारकाला प्रतिझोपडी ६ हजार रुपये मदत मिळेल.राज्य शासनाच्या सक्षम प्राधिका-याने बाधित झालेले घर हे अधिकृत असल्याचे प्रमाणित करणे आवश्यक असेल. याशिवाय बाधित झालेल्या झोपडीधारकाला मदत देण्यापूर्वी राज्य व जिल्हास्तरीय अधिका-यांनी झोपडे म्हणून प्रमाणित करणे अनिवार्य केले आहे.