शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
3
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
4
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
6
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
7
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
8
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
9
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
10
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
11
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
12
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
13
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
14
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
15
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
16
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
17
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
18
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
19
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
20
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग

‘नोटा’ बंदीचा संत्रा उत्पादकांना फटका

By admin | Updated: November 18, 2016 00:21 IST

केंद्र सरकारने हजार, पाचशेच्या नोटा चलनातून बाद केल्याचा सर्वाधिक फटका संत्रा उत्पादकांना बसला आहे.

व्यवहार गोत्यात : खरेदीअभावी शेतकऱ्यांवर अरिष्टे, हमीभाव देण्याची मागणीअमरावती : केंद्र सरकारने हजार, पाचशेच्या नोटा चलनातून बाद केल्याचा सर्वाधिक फटका संत्रा उत्पादकांना बसला आहे. संत्रा व्यापाऱ्यांसोबत यापूर्वी झालेले व्यवहार गोत्यात आले आहे. हल्ली संत्रा मातीमोल दरात खरेदी केला जात आहे. शेतक ऱ्यांवरील आरिष्ट दूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, यासाठी संत्रा उत्पादकांनी गुरुवारी जिल्हा कचेरीवर धाव घेऊन आपबिती कथन केली.निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर यांच्याशी चर्चा करताना संत्रा उत्पादकांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी रेटून धरली. सध्या आंबिया बहर संत्रा तोडीचा हंगाम सुरु झाला आहे. यापूर्वी मोहन पावडे, मनीष देशमुख, किशोर चांगोले यांनी संत्रा व्यापाऱ्यांंसोबत केलेले व्यवहार हजार, पाचशेच्या नोटा बाद झाल्यामुळे ते गोत्यात आले आहे. यावेळी संत्र्यांचे उत्पादन चांगले असताना आता हजार, पाचशेच्या नोटा बंदच्या निर्णयामुळे संत्रा उत्पादकांवर आरिष्टे कोसळले आहे. बाजारात संत्र्याला खरेदीदार नाही. व्यापारी अतिशय कमी दरात व्यवहार करीत आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे ३० ते ३२ हजार रुपये प्रति टन दर असलेला संत्रा आता व्यापारी १४ ते १८ हजार रुपये दराने खरेदीची मागणी करीत आहे. एकूणच संत्रा उत्पादक हताश झाले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी मोहन पावडे यांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना बुधवारी निवेदन देऊन पुढाकार घेण्याची विनंती केली होतीे. त्यानुसार संत्राउत्पादकांवर आलेले आरिष्ट दूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संत्रा उत्पादकांची बैठक घेण्याच्या सूचना आरडीसी पातुरकर यांना दिल्या. त्यानुसार गुरुवारी ही बैठक पार पडली. संत्रा उत्पादकांवर आलेले संकट दूर करण्यासाठी नवीन चलन उपलब्ध करून द्यावे आदी मागण्यांवर आरडीसी यांनी तोडगा काढण्याची ग्वाही दिली. यावेळी मोहन पावडे, मनीष देशमुख, किशोर चांगोले, रमेश जिचकार, सचिन खोले, प्रवीण इंगळे, नितीन राऊत, रवी पाटील, देवेंद्र गोरडे, विजय खेरडे, पुरुषोत्तम भेले उपस्थित होते.संत्रा खरेदी-विक्रीचे व्यवहार विश्वासावरसंत्रा खरेदी किंवा विक्रीचे व्यवहार हे विश्वासावर चालतात. संत्रा खरेदीदार व्यापारी हे संत्रा तोडीपूर्वी ५० टक्के रक्कम देतात आणि तोडीनंतर ५० टक्के रक्कम देतात. पंरतु जुने चलन बंद करण्याचा निर्णय हा संत्रा उत्पादकांच्या मुळावर घाला घालणारा ठरत आहे. संत्रा खरेदीदार व्यापारी हे परप्रांतीय असल्यामुळे ते धनादेशाद्वारे व्यवहार करण्याचे शब्द देत आहेत. मात्र परप्रांतीय संत्रा खरेदीदार व्यापाऱ्यांवर कसा विश्वास ठेवावा, असा सवाल संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे. या व्यवहारात फसवणुकीची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे.