शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

खते, बियाणांत फसवणूक झाल्यास अजामीनपात्र गुन्हा

By admin | Updated: June 14, 2016 00:04 IST

यावर्षी मान्सूनचा अंदाज चांगला असल्याने खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात पेरणी होणार असून.

पालकमंत्र्यांचे निर्देश : जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक अमरावती : यावर्षी मान्सूनचा अंदाज चांगला असल्याने खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात पेरणी होणार असून शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे बियाणे व खते पुरेशे उपलब्ध करून द्यावे तसेच खते व बियाणात शेतकऱ्यांची फसगत करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिले आहे. विक्रेत्यांनी बोगस बियाणे, खते कीटकनाशक विकून शेतकऱ्यांना कर्जबाजारी केले. याला आळा घालण्यासाठी बोगस बियाणे, खते विके्रत्यांवर व कंपन्यावर थेट फौजदारीसह अजामिनपात्र गुन्हा नोंदविण्याचा इशारा पालकमंत्र्यांनी दिला.जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी आढावा बैठक ते बोलत होते. निसर्गाच्या अवकृपेने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना मदत करून जोमाने उठविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. परंतु काही बोगस खते, औषधे आणि बियाण्यांच्या कंपन्या, पुरवठादार, दुकानदार, दलालांची साखळी यात शेतकऱ्यांची फसवणूक करतात. या पार्श्वभूमिवर उत्पादक, पुरवठादार आणि विक्रेत्यांनाच लगाम लावण्याचे ना.पोटे यांनी स्पष्ट केले. संबंधित अधिकाऱ्यांना नियमित तपासणी करून दोषींवर कारवाईचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. बियाणे किंवा खतांची विक्री करताना लिंकिंगच्या नावाखाली अनावश्यक बाबी शेतकऱ्यांच्या माथी मारल्या जातात. यंदाच्या खरीप हंगामात असे प्रकार टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांना बियाणे, खते व कीटकनाशकांचा उपलब्ध साठा, त्याची किंमत दर्शविणारा फलक दुकानाबाहेर लावण्याची सक्ती करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. बियाणे, खतांची साठेबाजी व काळाबाजार रोखण्यासाठी प्रत्येक तालुक्यात कृषी विभागामार्र्फत विशेष पथक स्थापन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात. दुकानदार, कंपन्यांवर चौकशी करून फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचा इशारा पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)बियाणे, खते खरेदीच्या पावत्या सांभाळून ठेवायावर्षी शेतकऱ्यांनी बियाणे खते खरेदीच्या पक्क्या पावत्या, बियाणांच्या थैल्या सांभाळून ठेवाव्यात व काही तक्रार असल्यास शेतकऱ्यांकडे असलेले पुरावे कृषी अधिकाऱ्यांनी जमा करावेत. सर्व कागदपत्रांसह संबंधित कंपनीच्या विरोधात कडक कारवाई करता येईल, असे आदेशही पालकमंत्र्यांनी बैठकीतील उपस्थित अधिकाऱ्यांना दिले