शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

खते, बियाणांत फसवणूक झाल्यास अजामीनपात्र गुन्हा

By admin | Updated: June 14, 2016 00:04 IST

यावर्षी मान्सूनचा अंदाज चांगला असल्याने खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात पेरणी होणार असून.

पालकमंत्र्यांचे निर्देश : जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक अमरावती : यावर्षी मान्सूनचा अंदाज चांगला असल्याने खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात पेरणी होणार असून शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे बियाणे व खते पुरेशे उपलब्ध करून द्यावे तसेच खते व बियाणात शेतकऱ्यांची फसगत करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिले आहे. विक्रेत्यांनी बोगस बियाणे, खते कीटकनाशक विकून शेतकऱ्यांना कर्जबाजारी केले. याला आळा घालण्यासाठी बोगस बियाणे, खते विके्रत्यांवर व कंपन्यावर थेट फौजदारीसह अजामिनपात्र गुन्हा नोंदविण्याचा इशारा पालकमंत्र्यांनी दिला.जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी आढावा बैठक ते बोलत होते. निसर्गाच्या अवकृपेने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना मदत करून जोमाने उठविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. परंतु काही बोगस खते, औषधे आणि बियाण्यांच्या कंपन्या, पुरवठादार, दुकानदार, दलालांची साखळी यात शेतकऱ्यांची फसवणूक करतात. या पार्श्वभूमिवर उत्पादक, पुरवठादार आणि विक्रेत्यांनाच लगाम लावण्याचे ना.पोटे यांनी स्पष्ट केले. संबंधित अधिकाऱ्यांना नियमित तपासणी करून दोषींवर कारवाईचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. बियाणे किंवा खतांची विक्री करताना लिंकिंगच्या नावाखाली अनावश्यक बाबी शेतकऱ्यांच्या माथी मारल्या जातात. यंदाच्या खरीप हंगामात असे प्रकार टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांना बियाणे, खते व कीटकनाशकांचा उपलब्ध साठा, त्याची किंमत दर्शविणारा फलक दुकानाबाहेर लावण्याची सक्ती करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. बियाणे, खतांची साठेबाजी व काळाबाजार रोखण्यासाठी प्रत्येक तालुक्यात कृषी विभागामार्र्फत विशेष पथक स्थापन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात. दुकानदार, कंपन्यांवर चौकशी करून फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचा इशारा पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)बियाणे, खते खरेदीच्या पावत्या सांभाळून ठेवायावर्षी शेतकऱ्यांनी बियाणे खते खरेदीच्या पक्क्या पावत्या, बियाणांच्या थैल्या सांभाळून ठेवाव्यात व काही तक्रार असल्यास शेतकऱ्यांकडे असलेले पुरावे कृषी अधिकाऱ्यांनी जमा करावेत. सर्व कागदपत्रांसह संबंधित कंपनीच्या विरोधात कडक कारवाई करता येईल, असे आदेशही पालकमंत्र्यांनी बैठकीतील उपस्थित अधिकाऱ्यांना दिले