शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
2
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
3
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
4
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
5
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
6
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
7
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
8
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
9
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
10
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
11
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
12
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
13
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
14
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
15
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
16
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
17
Operation Sindoor Live Updates: भारत पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष थांबला! डोनाल्ड ट्रम्प यांनी काय सांगितलं?
18
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
19
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
20
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...

स्मशानभूमीत जागा मिळेना, खुल्या जागेवर अंत्यविधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 05:00 IST

कोरोना संसर्ग, सारी, दमा अशा गंभीर आजाराने मृत्यू झालेल्या व्यक्तींचे अंत्यविधी गॅस दाहिनी प्रकल्पात करण्यात येत आहे. गॅस दाहिनीत एका मृतदेहासाठी  किमान दोन तास लागतात. मृतदेहांची संख्या वाढत असल्याने गॅस दाहिनीत अंत्यविधीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. बरेचदा प्रतीक्षा सोयीची ठरत नसल्याने अंत्यविधी खुल्या जागेवर करण्यात येत असल्याची माहिती प्रबंधक एकनाथ इंगळे यांनी दिली.

ठळक मुद्देशुक्रवारी २६, क्षमतेपेक्षा अधिक मृतदेह, कोविड-सारी आजाराने दगावण्याचे प्रमाण वाढले

गणेश वासनिकलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना महामारीचे संकट गहिरे होत आहे. शहरात दरदिवशी कोविड, सारी व इतर आजारांनी ८ ते १३ व्यक्ती दगावत आहेत.  परिणामी अंत्यविधीसाठी हिंदू स्मशान संस्थेच्या प्रशासनावर ताण येत आहे. ओटे उपलब्ध नसल्यास खुल्या जागेवर मृतदेहाचे अंत्यविधी सोपस्कार आटोपले जात आहेत. शुक्रवारी एकूण २६ मृतदेहांवर अंत्यविधी पार पडले. कोरोना संसर्ग, सारी, दमा अशा गंभीर आजाराने मृत्यू झालेल्या व्यक्तींचे अंत्यविधी गॅस दाहिनी प्रकल्पात करण्यात येत आहे. गॅस दाहिनीत एका मृतदेहासाठी  किमान दोन तास लागतात. मृतदेहांची संख्या वाढत असल्याने गॅस दाहिनीत अंत्यविधीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. बरेचदा प्रतीक्षा सोयीची ठरत नसल्याने अंत्यविधी खुल्या जागेवर करण्यात येत असल्याची माहिती प्रबंधक एकनाथ इंगळे यांनी दिली. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी गुरुवारी स्मशानभूमीची पाहणी केली असता, हेच चित्र निदर्शनास आले. शुक्रवारी सायंकाळी ८ वाजता कोरोना, सारी व इतर आजाराने दगावलेले १६ रुग्ण, तर नैसर्गिकरीत्या दगावलेल्या १० जणांचा अंत्यविधी आटोपला. 

एप्रिलमध्ये १५ दिवसांत कोरोनाचे ७५ बळीएप्रिल महिन्यात कोरोनाने ७५ बळी घेतले. यात १ ते १५ एप्रिलपर्यंतचा समावेश आहे. मृतांमध्ये तरुणांचाही समावेश असल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले. १ ते ९ एप्रिल दरम्यान एक अंकी, तर १० ते १५ एप्रिल दरम्यान कोरोनाने बळींचा आकडा दोन अंकी झाला. शुक्रवारी तिघांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले असले तरी येथील हिंदू स्मशानभूमीत १६ कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

शुक्रवारी ६८० संक्रमित, तिघांचा मृत्यूशुक्रवारी ६८० कोरोना संक्रमित निष्पन्न झाले, तर गत २४ तासांत तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. आतापर्यंत ३ लाख ६८ हजार ८४९ नमुने तपासणी करण्यात आले. आतापर्यंत ५५,१७७ रुग्ण संक्रमित झाले आहेत. १५१० उपाचारार्थ दाखल आहेत. दिवसभरात १०१ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले. आतापर्यंत ५०,२६१ जणांनी कोरोनावर मात केली. गृह विलगीकरणात महापालिका क्षेत्रात ६९२, तर ग्रामीण भागात १९६२ रुग्ण आहेत. कोरोनाचे आतापर्यंत ७५२ बळी झाले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण ४,१५४, रिकव्हरी रेट ९१.०९ टक्के आहे.

लाकूड ओले, सरण जळण्यास विलंब

हिंदू स्मशानभूमीत कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना प्रशासनाची दमछाक होत आहे. ओट्यांची संख्या तोकडी आहे. त्यातच लाकूड ओले असल्याने आधी जमिनीवर डिझेल टाकावे लागते. त्यानंतर सरण जळते. त्यातही बराच वेळ लागतो, असे मृत रुग्णांच्या नातेवाइकांनी सांगितले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या