शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

कुणीही नाही राहणार उपाशी;शिधापत्रिकाधारकांना मिळणार धान्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:11 IST

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना; मोफत धान्यामुळे कार्डधारकांना दिलासा अमरावती : कोरोनाच्या कालावधीत अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होत असल्याने ...

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना; मोफत धान्यामुळे कार्डधारकांना दिलासा

अमरावती : कोरोनाच्या कालावधीत अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होत असल्याने त्यांच्या अन्नधान्याचा प्रश्न मिटावा याकरिता कार्डधारकांना मोफत धान्य वाटपाची योजना सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत मे महिन्यात मोफत धान्याचे वाटप केले जात आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १९ लाख ४० हजार ५७८ इतक्या लाभार्थ्यांना मोफत धान्याचे वाटप केले जाणार आहे. त्यानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत मे महिन्यात अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना २५ किलो गहू व १० किलो तांदूळ असे एकूण ३५ किलो धान्य प्रतिकार्ड तर प्राधान्यक्रम कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना ३ किलो गहू,२ किलो तांदूळ असे एकूण ५ किलो प्रतिलाभार्थी याप्रमाणे मोफत धान्य वाटप केले जाणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट असलेल्या अंत्योदय व प्राधान्यक्रम कुटुंब योजनेतील पात्र लाभार्थ्यांना ३ किलो गहू व २ किलो तांदूळ असे एकूण ५ किलो मोफत धान्य दिले जाणार आहे. याबाबत जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे.

बॉक्स

जिल्ह्यातील एकूण रेशन कार्ड धारक

१९४०५७८

प्राधान्यगट- २८५७८२

अंत्योदय -१२१८४४

केसरी ८००२८

बॉक्स

काय मिळणार?

प्रतिमानसी

३ किलो गहू

२ किलो तांदूळ

बीपीएलच्या -२८५७८२

सदस्यांना लाभ

१)राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत मे महिन्यात अंत्योदय योजनेतील लाभार्थ्याना २५ किलो गहू १० किलो तांदूळ अशी एकूण ३५ किलो धान्य प्रतिकार्ड

२)प्राधान्यक्रम कुटुंबे योजनेतील लाभार्थ्यांना ३ किलो गहू ,२ किलो तांदूळ असे एकूण ५ किलो प्रति लाभार्थी याप्रमाणे मोफत धान्य वाटप केले आहे.

३) केंद्र शासनाकडून अंत्योदय आणि प्राधान्य गटातील रेशन कार्डधारकांना दोन महिन्याचे धान्य मोफत दिले जाणार आहे.याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

बॉक्स

केसरीच्या ४०६८५० लाभार्थ्याना मिळणार लाभ

केसरीकार्ड असलेल्यांना देखील या योजनेत मोफत धान्याचा लाभ मिळणार आहे. ग्रामीण आणि शहरी कार्डधारकांना लागू करण्यात आलेल्या उत्पन्नानुसार कार्डवरील धान्य उपलब्ध होत असते. कोरोनाच्या काळात मात्र आता सर्व कार्डधारकांना मोफत धान्य लाभ होणार आहे.

कोट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत मे २०२० च्या अन्नधान्याचे मोफत वाटप करण्याच्या घोषणेनुसार, जिल्ह्यातील सुमारे १९ लाखांवर लाभार्थ्यांना मोफत धान्य वाटप करण्यात येणार आहे.

- अनिल टाकसाळे,

जिल्हा पुरवठा अधिकारी