शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

कुणीही नाही राहणार उपाशी;शिधापत्रिकाधारकांना मिळणार धान्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:11 IST

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना; मोफत धान्यामुळे कार्डधारकांना दिलासा अमरावती : कोरोनाच्या कालावधीत अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होत असल्याने ...

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना; मोफत धान्यामुळे कार्डधारकांना दिलासा

अमरावती : कोरोनाच्या कालावधीत अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होत असल्याने त्यांच्या अन्नधान्याचा प्रश्न मिटावा याकरिता कार्डधारकांना मोफत धान्य वाटपाची योजना सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत मे महिन्यात मोफत धान्याचे वाटप केले जात आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १९ लाख ४० हजार ५७८ इतक्या लाभार्थ्यांना मोफत धान्याचे वाटप केले जाणार आहे. त्यानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत मे महिन्यात अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना २५ किलो गहू व १० किलो तांदूळ असे एकूण ३५ किलो धान्य प्रतिकार्ड तर प्राधान्यक्रम कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना ३ किलो गहू,२ किलो तांदूळ असे एकूण ५ किलो प्रतिलाभार्थी याप्रमाणे मोफत धान्य वाटप केले जाणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट असलेल्या अंत्योदय व प्राधान्यक्रम कुटुंब योजनेतील पात्र लाभार्थ्यांना ३ किलो गहू व २ किलो तांदूळ असे एकूण ५ किलो मोफत धान्य दिले जाणार आहे. याबाबत जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे.

बॉक्स

जिल्ह्यातील एकूण रेशन कार्ड धारक

१९४०५७८

प्राधान्यगट- २८५७८२

अंत्योदय -१२१८४४

केसरी ८००२८

बॉक्स

काय मिळणार?

प्रतिमानसी

३ किलो गहू

२ किलो तांदूळ

बीपीएलच्या -२८५७८२

सदस्यांना लाभ

१)राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत मे महिन्यात अंत्योदय योजनेतील लाभार्थ्याना २५ किलो गहू १० किलो तांदूळ अशी एकूण ३५ किलो धान्य प्रतिकार्ड

२)प्राधान्यक्रम कुटुंबे योजनेतील लाभार्थ्यांना ३ किलो गहू ,२ किलो तांदूळ असे एकूण ५ किलो प्रति लाभार्थी याप्रमाणे मोफत धान्य वाटप केले आहे.

३) केंद्र शासनाकडून अंत्योदय आणि प्राधान्य गटातील रेशन कार्डधारकांना दोन महिन्याचे धान्य मोफत दिले जाणार आहे.याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

बॉक्स

केसरीच्या ४०६८५० लाभार्थ्याना मिळणार लाभ

केसरीकार्ड असलेल्यांना देखील या योजनेत मोफत धान्याचा लाभ मिळणार आहे. ग्रामीण आणि शहरी कार्डधारकांना लागू करण्यात आलेल्या उत्पन्नानुसार कार्डवरील धान्य उपलब्ध होत असते. कोरोनाच्या काळात मात्र आता सर्व कार्डधारकांना मोफत धान्य लाभ होणार आहे.

कोट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत मे २०२० च्या अन्नधान्याचे मोफत वाटप करण्याच्या घोषणेनुसार, जिल्ह्यातील सुमारे १९ लाखांवर लाभार्थ्यांना मोफत धान्य वाटप करण्यात येणार आहे.

- अनिल टाकसाळे,

जिल्हा पुरवठा अधिकारी