शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
3
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
4
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
5
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
6
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
7
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
8
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
9
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
10
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
11
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
12
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
13
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
14
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
15
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
16
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
17
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
18
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
19
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
20
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल

चांदूररेल्वे तालुक्यात १० वर्षांत ९१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: December 29, 2014 03:00 IST

चांदूररेल्वे तालुक्यातील ४४ गावांत गेल्या १० वर्षांत ९१ शेतकऱ्यांनी नापिकीला कंटाळून आत्महत्या केली असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.

प्रभाकर भगोले चांदूररेल्वेचांदूररेल्वे तालुक्यातील ४४ गावांत गेल्या १० वर्षांत ९१ शेतकऱ्यांनी नापिकीला कंटाळून आत्महत्या केली असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. ३४ शेतकरी लाभपात्र ठरले असून ५८ शेतकरी कुटुंब मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. जमीन कोरडवाहू त्यातही उत्पादित खर्चाच्या तुलनेत शेतमालाला योग्य भाव नाही. पुढील हंगाम साथ देईल या आशेवर कर्ज काढून शेती फुलविली; मात्र नापिकीलाच सामोरे जाण्याची वेळ दरवर्षी येत असल्याने कर्जाचा डोंगर वाढत गेला. सावकाराचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत अखेरचा मार्ग म्हणून शेतकरी आत्महत्येला प्राधान्य देत असल्याचे तालुक्यात चित्र आहे. यामुळे नैराश्य जिवावर बेतून ९१ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. ९१ शेतकऱ्यांपैकी ३४ शेतकरी लाभपात्र ठरले. उर्वरित अपात्र कसे राहिले. दहा वर्षांपासून गंभीर बाबीकडे लक्ष पुरविण्यास संबंधित यंत्रणा अपयशी ठरते. तालुक्यात १८ टक्के ओलीत क्षेत्र ८२ टक्के कोरडवाहू क्षेत्र आहे. कोरडवाहू क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी शासनाने चाळीस वर्षांत उपाययोजना केली नाही. सिंचन प्रकल्प नाही, निधी नाही, ठरावीक शेतकऱ्यांना विहिरींचे अनुदान, राजकीय कार्यकर्त्यांना महागडे बियाणे याबाबत खोलवर विचार करणे गरजेचे आहे. शेतकरी शेतात राब राब राबतात. सर्व शेतीला अनुदानअनुदान देणे गरजेचे आहे. यासाठी शासनाने अद्यापही दखल घेतली नाही. यामुळे शेतकरी अडचणीत येऊन आत्महत्याकडे वळतात. स्वातंत्र्य काळापासून शेती व्यवसायात प्रगल्भता आलेली नाही. ओलिताची संपूर्ण सोय, सर्वांना अनुदान, शेत तेथे विहीर, कुंपणाची सोय इत्यादी बाबींवर आर्थिक तरतूद करून पर्यायी दीर्घकालीन सोईसुविधा करणे गरजेचे झाले आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयासाठी अनुदान वाढविणे गरजेचे नसून जिवंत शेतकऱ्यांना मदत करणे अपेक्षित आहे. चालू वर्षातही २१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून आत्महत्याचे सत्र सरकारच्या नाकर्तेपणाने यात वाढ सातत्याने वाढत आहे.