शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
4
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
5
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
6
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
7
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
8
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
9
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
10
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
11
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
12
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
13
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
14
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
15
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
16
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
18
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
19
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा

चांदूररेल्वे तालुक्यात १० वर्षांत ९१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: December 29, 2014 03:00 IST

चांदूररेल्वे तालुक्यातील ४४ गावांत गेल्या १० वर्षांत ९१ शेतकऱ्यांनी नापिकीला कंटाळून आत्महत्या केली असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.

प्रभाकर भगोले चांदूररेल्वेचांदूररेल्वे तालुक्यातील ४४ गावांत गेल्या १० वर्षांत ९१ शेतकऱ्यांनी नापिकीला कंटाळून आत्महत्या केली असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. ३४ शेतकरी लाभपात्र ठरले असून ५८ शेतकरी कुटुंब मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. जमीन कोरडवाहू त्यातही उत्पादित खर्चाच्या तुलनेत शेतमालाला योग्य भाव नाही. पुढील हंगाम साथ देईल या आशेवर कर्ज काढून शेती फुलविली; मात्र नापिकीलाच सामोरे जाण्याची वेळ दरवर्षी येत असल्याने कर्जाचा डोंगर वाढत गेला. सावकाराचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत अखेरचा मार्ग म्हणून शेतकरी आत्महत्येला प्राधान्य देत असल्याचे तालुक्यात चित्र आहे. यामुळे नैराश्य जिवावर बेतून ९१ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. ९१ शेतकऱ्यांपैकी ३४ शेतकरी लाभपात्र ठरले. उर्वरित अपात्र कसे राहिले. दहा वर्षांपासून गंभीर बाबीकडे लक्ष पुरविण्यास संबंधित यंत्रणा अपयशी ठरते. तालुक्यात १८ टक्के ओलीत क्षेत्र ८२ टक्के कोरडवाहू क्षेत्र आहे. कोरडवाहू क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी शासनाने चाळीस वर्षांत उपाययोजना केली नाही. सिंचन प्रकल्प नाही, निधी नाही, ठरावीक शेतकऱ्यांना विहिरींचे अनुदान, राजकीय कार्यकर्त्यांना महागडे बियाणे याबाबत खोलवर विचार करणे गरजेचे आहे. शेतकरी शेतात राब राब राबतात. सर्व शेतीला अनुदानअनुदान देणे गरजेचे आहे. यासाठी शासनाने अद्यापही दखल घेतली नाही. यामुळे शेतकरी अडचणीत येऊन आत्महत्याकडे वळतात. स्वातंत्र्य काळापासून शेती व्यवसायात प्रगल्भता आलेली नाही. ओलिताची संपूर्ण सोय, सर्वांना अनुदान, शेत तेथे विहीर, कुंपणाची सोय इत्यादी बाबींवर आर्थिक तरतूद करून पर्यायी दीर्घकालीन सोईसुविधा करणे गरजेचे झाले आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयासाठी अनुदान वाढविणे गरजेचे नसून जिवंत शेतकऱ्यांना मदत करणे अपेक्षित आहे. चालू वर्षातही २१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून आत्महत्याचे सत्र सरकारच्या नाकर्तेपणाने यात वाढ सातत्याने वाढत आहे.