शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात नऊ हजार हेक्टर बाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 21:25 IST

विभागीय आयुक्तांचा प्राथमिक अहवाल ; अवकाळीचा फटका, पिके बाधित .

अमरावती : पश्चिम विदर्भात १० व ११ फेब्रुवारी रोजी झालेल्या अवकाळीचा फटका अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील ८७९९ हेक्टरला बसला. या आपत्तीमध्ये खरिपातील तूर, रब्बीचा गहू, हरभरा याशिवाय भाजीपाला व फळपिकांचे मोठे नुकसान झाल्याचा विभागीय आयुक्तांचा प्राथमिक अहवाल आहे.

यापूर्वी २६ नोव्हेंबर ते ७ फेब्रुवारी २०२३ दरम्यान अवकाळीचा फटका विभागाला बसला होता. यामध्ये ११.१० लाख शेतकऱ्यांच्या ६.३२ लाख हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीसाठी आवश्यक ६७२ कोटींची शासन मदत शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही. त्यातच पुन्हा १० व ११ फेब्रुवारी रोजी विभागातील दोन जिल्ह्यांत अवकाळी व काही ठिकाणी गारपीट झाली. या आपत्तीत काढणीवर आलेल्या तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शिवाय रब्बीचा गहू जमिनीवर आडवा झाला. सोंगणीवर आलेल्या हरभऱ्याचे मोठे नुकसान झाले. महसूल व कृषी विभागाच्या पथकाद्वारे बाधित क्षेत्राची पाहणी करण्यात आली व नुकसानीचा प्राथमिक अहवाल विभागीय आयुक्तांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सादर केला. असे झाले नुकसान१) अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वे तालुक्यात तळेगाव दशासर येथे १० तारखेला गारपीट झालेली आहे. यात २८१५ हेक्टरमधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.२) यवतमाळ जिल्ह्यात बाभूळगाव तालुक्यात २४९४, कळंब तालुक्यात ५५ हेक्टर व उमरखेडा तालुक्यात ३४३५ हेक्टरमध्ये अवकाळी पावसाचा फटका बसला.

टॅग्स :Amravatiअमरावती