शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

तळवेल ग्रामपंचायतीचे नऊ सदस्य अपात्र

By admin | Updated: January 31, 2015 01:00 IST

तालुक्यातील तळवेल ग्रामपंचायतच्या ११ पैकी ९ सदस्यांनी विहित मुदतीत खर्च सादर केला नसल्याची बाब जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या समक्ष सादर केलेल्या ....

चांदूरबाजार : तालुक्यातील तळवेल ग्रामपंचायतच्या ११ पैकी ९ सदस्यांनी विहित मुदतीत खर्च सादर केला नसल्याची बाब जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या समक्ष सादर केलेल्या अहवालावरून स्पष्ट झाल्यामुळे ९ सदस्यांना अपात्र ठरविण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी २८ जानेवारी रोजी पारित करून या अपात्र सदस्यांना आदेशाच्या तारखेपासून पुढील पाच वर्षापर्यंत ग्रामपंचायतची निवडणूक लढण्यास ‘अनई’ घोषित केले आहे. या ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या गटाचे प्राबल्य असल्याचे मानले जाते. एकाच ग्रामपंचायतमधील ११ पैकी ९ सदस्य अपात्र ठरल्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी असेही राजकीय तज्ज्ञ सांगतात. येत्या एप्रिलमध्ये तालुक्यातील सर्वाधिक ४२ ग्रामपंचायतीच्या निवडणूका होऊ घातल्या आहे. तळवेल ग्रामपंचायती बाबतीत लागलेल्या निकालामुळे ग्रामपंचायत वर्तुळात खळबळ माजली आहे.तळवेल येथील रोहण जयवंत गवई यांनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (ब) मधील तरतुदीनुसार तळवेल ग्रामपंचायतमधील सर्व ११ सदस्यांनी विहित मुदतीत खर्च सादर केला नसल्यामुळे या सदस्यांना अपात्र घोषित करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयात अर्ज सादर केला होता. यावर दोन्ही बाजूकडून लेखी स्वरुपात साक्षीपुरावे सादर करण्यात आले. त्यात ग्रामपंचायत सदस्याकडून विहित मुदतीत खर्चाचे विवरण सादर केल्याचे व सर्व अभिलेख तहसील कार्यालयात सादर केल्याचे सांगून त्यासोबत शपथपत्रासह दाखल केल्याचे नमूद केले.या प्रकरणात चांदूरबाजारच्या तहसीलदारांचा अहवाल मागविण्यात आला. त्यांनी ९ जून २०१४ रोजी सादर केलेल्या अहवालात तळवेल येथील ग्रामपंचायतच्या निवडणकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ३० दिवसाच्या आत उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर केल्याची नोंद तहसील दप्तरी आढळून आली नाही तर अशा उमेदवारांची यादीही तहसील कार्यालयाने जिल्हाधिकारी यांचेसमोर सादर केली. तद्नंतर या प्रकरणात तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी ईर्शादउल्लाखान यांना अहवाल मागविण्यात आला. त्यांच्या अहवालानुसार दीपक मेटकर व सुजाता वानखडे यांनी निवडणूक खर्चाचा हिशेब सादर केल्याचे नमूद केले. यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी हिशेब सादर न करणाऱ्या हिराबाई चंडिकापूरे, प्रवीण काळे, पद्मा मोहोड, शुद्धोधन वानखडे, चंद्रशेखर बोंडे, लता भोयर, कल्पना काळे, रामेश्वर भोवते, प्रतिभा गेडाम यांना शासन अधिनियम १६ अन्वये मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मध्ये सुधारणेनुसार आदेशाच्या दिनांकापासून पुढील पाच वर्षे ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यास अनर्ह घोषित केले आहे. तसेच या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचे आदेश दिले आहे. (तालुका प्रतिनिधी)