शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

विभागात नऊ मध्यम प्रकल्प अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2016 00:09 IST

जलसंपदा विभाग अमरावतीअंतर्गत केलेल्या मंजूर १२ मध्यम प्रकल्पांपैकी नऊ प्रकल्प अद्यापही बांधकामाधीन असून ...

२ हजार ५२४ कोटींचा खर्च : अमरावतीत सर्वाधिक प्रकल्पसंदीप मानकर अमरावतीजलसंपदा विभाग अमरावतीअंतर्गत केलेल्या मंजूर १२ मध्यम प्रकल्पांपैकी नऊ प्रकल्प अद्यापही बांधकामाधीन असून त्यापैकी ६ मध्यम प्रकल्प अमरावती जिल्ह्यातील रखडले आहेत. १२ प्रकल्पांवर आतापर्यंत २,५२४ कोटी रुपये खर्च झाला आहे. एकट्या अमरावती जिल्ह्यात होत असलेल्या ६ मध्यम प्रकल्पांवर आतापर्यंत २ हजार ३६ कोटींचा खर्च करण्यात आल्याचे जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. शासनाने अमरावती विभागात १२ मध्यम प्रकल्पाला मान्यता दिली होती. त्यापैकी अडाण, वाशिम, तोरणा व मन (बुलडाणा) या चार प्रकल्पांचे काम पूर्णत्वास गेले आहे. मात्र, चंद्रभागा, पूर्णा, सपन, पंढरी, वासनी, गर्गा (अमरावती), नवरगाव (यवतमाळ), उतावळी (बुलडाणा) काटेपूर्णा बॅरेज (अकोला) आदी प्रकल्प अपूर्ण आहेत. जमीन संपादन, कालव्यांचे काम व निधीची कमतरता व अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे सदर मध्यम प्रकल्प अपूर्ण आहेत. १२ मध्यम प्रकल्पांची मूळ किंमत १९०५.२७ कोटी रुपये होती. सदर प्रकल्प मुदतीत पूर्ण न झाल्यामुळे त्यांची अद्ययावत किंमत ३,६५८.४९ कोटी एवढी झाली आहे. काम मुदतीत पूर्ण न केल्यामुळे या प्रकल्पाची तीनपट किंमत वाढली आहे.त्यामुळे बांधकामाधीन असलेल्या प्रकल्पांचा आर्थिक बोझा शासनाच्या तिजोरीवर पडणार आहे. मार्च २०१६ पर्यंत सदर प्रकल्पावर २५१०.१६० कोटी रुपये निधी खर्च करण्यात आला होता. २१४ कोटी रुपये उपलब्ध निधी होता. गेल्या तीन महिन्यांत १४ कोटी या प्रकल्पांवर जलसंपदा विभागाने खर्च केले. आतापर्यंत एकूण २,५२४.७११ कोटी खर्च झाले आहेत. सर्वाधिक प्रकल्प हे दहा वर्षांपूर्वीचे आहेत. पिण्याच्या पाण्याची विविध योजना, औद्यगिक प्रकल्पांसाठी वापर, शेती क्षेत्रफळ सिंचनाखाली आले पाहिजे व भूजल पातळी वाढावी सिंचन क्षेत्र वाढावे, अशा विविध कारणांनी सदर प्रकल्पाचे काम करण्यात आले आहे. मात्र शासनाने वेळोवेळी निधीसाठी हात आवरता घेतले. अनेक प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन करण्यात आले. पण अनेक प्रकल्पांत अद्यापही त्यांना जमिनीचा पाहिजे तसा मोबदला मिळाला नाही. अनेक प्रकल्प पूर्णत्वास आले आहेत. काही प्रकल्पांची जमीन भूसंपादन सुरू आहे. कालव्याचे कामे करण्यात येत आहे. तीन वर्षांत ही कामे पूर्णत्वास नेण्याचा आमचा प्रयत्न राहील. - रवींद्र लांडेकर,अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग, अमरावती