शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

विभागात नऊ मध्यम प्रकल्प अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2016 00:09 IST

जलसंपदा विभाग अमरावतीअंतर्गत केलेल्या मंजूर १२ मध्यम प्रकल्पांपैकी नऊ प्रकल्प अद्यापही बांधकामाधीन असून ...

२ हजार ५२४ कोटींचा खर्च : अमरावतीत सर्वाधिक प्रकल्पसंदीप मानकर अमरावतीजलसंपदा विभाग अमरावतीअंतर्गत केलेल्या मंजूर १२ मध्यम प्रकल्पांपैकी नऊ प्रकल्प अद्यापही बांधकामाधीन असून त्यापैकी ६ मध्यम प्रकल्प अमरावती जिल्ह्यातील रखडले आहेत. १२ प्रकल्पांवर आतापर्यंत २,५२४ कोटी रुपये खर्च झाला आहे. एकट्या अमरावती जिल्ह्यात होत असलेल्या ६ मध्यम प्रकल्पांवर आतापर्यंत २ हजार ३६ कोटींचा खर्च करण्यात आल्याचे जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. शासनाने अमरावती विभागात १२ मध्यम प्रकल्पाला मान्यता दिली होती. त्यापैकी अडाण, वाशिम, तोरणा व मन (बुलडाणा) या चार प्रकल्पांचे काम पूर्णत्वास गेले आहे. मात्र, चंद्रभागा, पूर्णा, सपन, पंढरी, वासनी, गर्गा (अमरावती), नवरगाव (यवतमाळ), उतावळी (बुलडाणा) काटेपूर्णा बॅरेज (अकोला) आदी प्रकल्प अपूर्ण आहेत. जमीन संपादन, कालव्यांचे काम व निधीची कमतरता व अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे सदर मध्यम प्रकल्प अपूर्ण आहेत. १२ मध्यम प्रकल्पांची मूळ किंमत १९०५.२७ कोटी रुपये होती. सदर प्रकल्प मुदतीत पूर्ण न झाल्यामुळे त्यांची अद्ययावत किंमत ३,६५८.४९ कोटी एवढी झाली आहे. काम मुदतीत पूर्ण न केल्यामुळे या प्रकल्पाची तीनपट किंमत वाढली आहे.त्यामुळे बांधकामाधीन असलेल्या प्रकल्पांचा आर्थिक बोझा शासनाच्या तिजोरीवर पडणार आहे. मार्च २०१६ पर्यंत सदर प्रकल्पावर २५१०.१६० कोटी रुपये निधी खर्च करण्यात आला होता. २१४ कोटी रुपये उपलब्ध निधी होता. गेल्या तीन महिन्यांत १४ कोटी या प्रकल्पांवर जलसंपदा विभागाने खर्च केले. आतापर्यंत एकूण २,५२४.७११ कोटी खर्च झाले आहेत. सर्वाधिक प्रकल्प हे दहा वर्षांपूर्वीचे आहेत. पिण्याच्या पाण्याची विविध योजना, औद्यगिक प्रकल्पांसाठी वापर, शेती क्षेत्रफळ सिंचनाखाली आले पाहिजे व भूजल पातळी वाढावी सिंचन क्षेत्र वाढावे, अशा विविध कारणांनी सदर प्रकल्पाचे काम करण्यात आले आहे. मात्र शासनाने वेळोवेळी निधीसाठी हात आवरता घेतले. अनेक प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन करण्यात आले. पण अनेक प्रकल्पांत अद्यापही त्यांना जमिनीचा पाहिजे तसा मोबदला मिळाला नाही. अनेक प्रकल्प पूर्णत्वास आले आहेत. काही प्रकल्पांची जमीन भूसंपादन सुरू आहे. कालव्याचे कामे करण्यात येत आहे. तीन वर्षांत ही कामे पूर्णत्वास नेण्याचा आमचा प्रयत्न राहील. - रवींद्र लांडेकर,अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग, अमरावती