शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
3
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
4
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
5
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
6
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
7
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
8
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
9
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
10
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
11
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
12
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
13
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
14
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
15
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
16
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
17
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
18
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
19
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
20
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?

नऊ सिंचन प्रकल्पांची जूनअखेर घळभरणी

By admin | Updated: December 15, 2015 00:28 IST

नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती जिल्ह्यातील समस्यांचा विस्तृत आढावा घेतला.

पत्रपरिषद : जिल्हाधिकारी किरण गित्ते यांची माहितीअमरावती : नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती जिल्ह्यातील समस्यांचा विस्तृत आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प, जलयुक्त शिवार योजना, कृषी योजना, जलसंपदा, वीज वितरण कंपनी अन्य विविध योजनांची माहिती घेतली. याप्रसंगी अमरावती जिल्ह्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्याची कामे जूनअखेरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. यासाठी पुरेसा निधीसुध्दा शासनामार्फ त उपलब्ध होणार असल्याची माहिती सोमवारी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी पत्रपरिषदेत दिली. पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यात ९० सिंचन प्रकल्पाचे कामे मंजूर आहेत.जिल्ह्यात अनुशेषांतर्गत ३२ सिंचन प्रकल्प आहेत. त्यापैकी ८ प्रकल्पांची घळभरणी झाली आहे. उर्वरित प्रकल्पांचे काम येत्या तीन वर्षांत टप्प्या टप्प्याने पूर्ण करण्यात येईल, असे सांगून अनुशेषांतर्गत यासाठी कालबध्द कार्यक्रम हाती घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विद्युत पंप बसविण्यासाठी १०,६९२ एवढा लक्षांक होता. त्यापैकी ३,४७३ जोडण्या पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित मार्च,२०१६ पर्यंत होईल. सोलरसाठी १७०० सोलरपंप मंजूर असून २०३ अर्ज प्राप्त झाले आहेत. महसूल विभागातील रिक्त जागा जवळपास पूर्ण भरण्यात आली आहेत. जलसंपदा विभागातील १२00 अभियंत्यांची पदे भरण्याची परवानगी देण्यात आल्याचे सांगत जिल्ह्यातील २९४ पदांपैकी ९४ पदे रिक्त असल्याचाही उल्लेख त्यांनी केला. मेळघाटातील प्रश्न सोडविण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची १५ पदे भरली आहेत. मध्य प्रदेशातील नेपानगरपासून धारणीपर्यंत ५५ कि.मी. ट्रान्समिशन लाईनचे काम मार्च, २०१५पासून सुरू असून १६ कोटी ५७ लक्ष रुपये व उपकेंद्राकरिता ८ कोटी ९२ लक्ष रुपये असा एकूण २५कोटी ४९ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.