शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

वाहन परवाना मिळविण्यासाठी नागरिकांना होतो रात्रीचा दिवस

By admin | Updated: February 28, 2015 00:38 IST

रस्त्यावर वाहन चालविणाऱ्या वाहनधारकांना परवाना विचारला जातो. परवाना नसल्यास त्यांना दंड आकारला जातो. त्यामुळे परवाना काढायला गेल्यास रात्र जागून ....

परतवाडा : रस्त्यावर वाहन चालविणाऱ्या वाहनधारकांना परवाना विचारला जातो. परवाना नसल्यास त्यांना दंड आकारला जातो. त्यामुळे परवाना काढायला गेल्यास रात्र जागून रांगेत उभे राहावे लागत असताना परतवाडा येथील आरटीओ कॅम्पमध्ये दिले जाणाऱ्या परवान्याची संख्या वाढवून देणे आवश्यक आहे. तसेच कॅम्पचेही दिवस वाढविणे गरजेचे आहे जेणेकरून नागरिकांना सोयीचे होईल.शासनाच्या नियम व कायद्याचे पालन व्हावे याकरिता नागरिक सकारात्मक पाऊल उचलत असताना अशा कार्यात प्रशासनाने याकरिता तातडीने कार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे. शासकीय योजना यशस्वी करणे आवश्यक असताना आरटीओ कॅम्पमध्ये वेगळे चित्र पहावयास मिळते. अचलपूर तालुक्यातील अनेक वाहन चालक नियमांची पायमल्ली होऊ नये म्हणून वाहन चालविण्याकरिता आवश्यक असणारा परवाना काढण्याकरिता परतवाडा येथील विश्रामगृह येथे होणाऱ्या आरटीओ कॅॅम्पमध्ये मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतात. परंतु आरटीओ विभागाने एका कॅम्पमध्ये केवळ १०० लर्निंग व ७० परमनंट असा आकडा निश्चित केला असल्याने यामध्ये आपला नंबर लागण्यासाठी अनेक नागरिक ठरलेल्या कॅम्पच्या आदल्याच दिवशी विश्रामगृहासमोरील मैदानात रात्र जागून काढताना दिसतात. शासन एकीकडे ई-प्रशासन ही संकल्पना राबवत असताना वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी नागरिकांना कशाप्रकारे त्रास सहन करावा लागतो या विश्रामगृहावर महिन्याच्या दहा आणि वीस तारखेला पाहायला मिळते.या परवाना मिळविण्याकरिता होत असलेल्या त्रासाबद्दल उपस्थित असलेल्या सर्वच नागरिकांना संतप्त भावना व्यक्त करीत या कॅम्पमधील परवाना मर्यादा वाढवून देण्यात यावी अन्यथा कॅप रोज घेण्यात यावा, अशी मागणीदेखील केली आहे. यात ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांनी आपली रोजंदारी पाडून परवान्याकरिता उपस्थित राहावे लागते. एकीकडे नागरिक शासनाचे नियम पाळताना दिसत असताना मात्र शासन त्यांना वेठीस धरत असल्याचे चित्र आहे. या ठिकाणी अचलपूर तालुक्याची लोकसंख्या पाहता आरटीओ विभागाचे स्थायी स्वरुपात उपविभागाचे कार्यालय स्थापित करून सुविधा उपलब्ध करणे आवश्यक झाले आहे. (प्रतिनिधी)