शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नव्या आघाडीमुळे पदाधिकाऱ्यांची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 06:01 IST

मित्रपक्ष अथवा विरोधकांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होणारी आघाडी जनतेसाठी नवीन नाही. परंतु, यंदा राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी त्यांचाच मित्रपक्ष शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेससोबत एकत्र आली आणि महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन करण्यात आली. या आघाडीने आता राज्याच्या सत्तेची सूत्रेदेखील हाती घेतली आहेत.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : समन्वय साधताना तिन्ही पक्षांच्या नेत्यांची होणार दमछाक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडीने बहुमत जिंकल्याने राज्यभरात जल्लोष होत आहे. महाराष्ट्र विकास आघाडीच्या फॉर्म्युल्यामुळे स्थानिक राजकारणाची गणिते मात्र बदलणार आहेत. हे बदल स्वीकारताना, समन्वय साधताना तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा कस लागणार आहे.मित्रपक्ष अथवा विरोधकांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होणारी आघाडी जनतेसाठी नवीन नाही. परंतु, यंदा राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी त्यांचाच मित्रपक्ष शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेससोबत एकत्र आली आणि महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन करण्यात आली. या आघाडीने आता राज्याच्या सत्तेची सूत्रेदेखील हाती घेतली आहेत. पाच वर्षे किमान समान कार्यक्रमावर सरकार चालविण्याचा विश्वास आघाडीची नेतेमंडळी व्यक्त करीत आहेत. मात्र, त्याचवेळी राज्य मुख्यालयातील हे चित्र ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगर परिषदेसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत टिकविण्याची जबाबदारी आघाडीतील तिन्ही स्थानिक पदाधिकाºयांच्या खांद्यावर येऊन ठेपली आहे.मुळातच मागील काही वर्षांत राज्यातील राजकारणाने कूस बदलली आहे. एखाद्या पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रसंगी परस्परविरोधी विचारांशी हात मिळविण्यापर्यंत राजकीय पक्षांची मजल गेली आहे. याचे उत्तम उदाहरण द्यायचे झाल्यास येथील जिल्हा परिषद व काही पंचायत समित्यांमध्ये सध्या काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सत्तेत आहे, तर भाजप व इतर मित्रपक्ष विरोधकांची भूमिका बजावत आहेत. राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्येदेखील अशाच प्रकारच्या युती, आघाड्या कायम आहेत. आता सरकारकडून राबविण्यात येणाºया लोकाभिमुख योजना स्थानिक पातळीवर समाजातील शेवटच्या घटकापर्यत पोहचविण्याची जबाबदारी तिन्ही पक्षांवर असल्याने पदाधिकाºयांची चांगलीच दमछाक होणार, हे मात्र नक्की.

टॅग्स :zpजिल्हा परिषद