शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
7
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
8
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
9
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
10
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
11
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
12
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
13
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
14
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
15
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
16
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
17
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
18
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
19
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
20
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली

नवीन सोयाबीन बाजारात दाखल

By admin | Updated: September 22, 2015 00:18 IST

सतत ३ ते ४ वर्षांपासून अस्मानी संकट व शासनाच्या धोरणामुळे आर्थिकदृष्ट्या रसातळला गेलेल्या शेतकऱ्यांची आस ...

शासनाचे हमीभावाने शेतकऱ्याची थट्टा : एका वर्षात ४० रुपयांनी वाढसुमित हरकूट  चांदूरबाजारसतत ३ ते ४ वर्षांपासून अस्मानी संकट व शासनाच्या धोरणामुळे आर्थिकदृष्ट्या रसातळला गेलेल्या शेतकऱ्यांची आस यावर्षीदेखील नैसर्गिक अकृपेमुळ वाया जात असल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांना आधार देणारे नगदी पीक सोयाबीन आता हाती येऊनदेखील होणाऱ्या सोयाबीनच्या उत्पन्नाची टक्केवारी पाहता त्याला आलेला खर्च निघणार की नाही या विवंचनांमध्ये सापडलेला असताना स्थानिक बाजार समितीमध्ये सोयाबीन खरेदीचा शुभमुहूर्त करण्यात आले. या शुभमुहूर्तावर शेतकऱ्याला ३३५१ रुपये क्विंटल भाव मिळाले असले तरी होणाऱ्या उत्पन्नाला बघता खर्च निघनेही कठीण होत असल्याचे दिसत आहे. स्थानिक बाजार समितीमध्ये सोयाबीन खरेदीच्या शुभमुहूर्तावर ब्राह्मणवाडा थडी येथील शेतकरी शरद जयपुरे यांनी आणलेले नवीन सोयाबीन सर्वप्रथम नवनिर्वाचित संचालक तथा अडते अमोल लंगोटे यांच्याकडे आल. या सोयाबीनला ३३५१ रुपये भाव देऊन स्थानिक व्यापारी पंकज नांगलिया, सुरेश नांगलीया, नीलेश चौधरी यांनी खरेदी केले. यावेळी बाजार समितीचे सचिव मनीष भारंबे यांनी सोयाबीनचे पूजन करुन शेतकरी शरद जयपुरे यांना टोपी, नारळ, दुपट्टयाने गौरविले. यावर्षी सोयाबीन आवक कमी राहणार अशी चर्चा व्यापारी वर्गामध्ये होती. तालुक्यातील सोयाबीनचे पीक पाण्याअभावी पिवळे पडत आहे. तालुक्यात सर्विकडेच सोयाबीनची शेंगा भरत असतानाच हे पीक रोगामुळे नष्ट झाले आहे. शासनातर्फे गतवर्षी सोयाबीनचे हमीभाव हे २५६० रुपये होेते. यामध्ये फक्त ४० रुपयांची किरकोळ वाढ करून यावर्षी २६०० रुपये शासनाने हमी भाव दिले. हे भाव एक तऱ्हेने शेतकऱ्यांची थट्टा करणारेच असल्याचे मत उपस्थित शेतकऱ्यांनी केले आहे.दरवर्षीप्रमाणे शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचे चढ्या दराने भाव मिळतात, त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन हे चांदूरबाजार समितीत विक्रीस आणावे.- मनीष भांरबे, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती.