शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
3
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
4
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
5
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
6
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
7
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
8
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
9
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
10
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
11
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
12
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
13
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
14
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
15
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
16
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
17
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
18
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
19
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
20
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची उपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:10 IST

आसेगाव पूर्णा : राज्य सरकारने दोन वेळा वेगवेगळ्या योजनांतर्गत दोन लाखांपर्यंतची शेतकऱ्यांची कर्ज माफ केली, तर कर्जाची प्रामाणिकपणे परतफेड ...

आसेगाव पूर्णा : राज्य सरकारने दोन वेळा वेगवेगळ्या योजनांतर्गत दोन लाखांपर्यंतची शेतकऱ्यांची कर्ज माफ केली, तर कर्जाची प्रामाणिकपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार होते. मात्र, दोन वर्षे पूर्ण होत आली तरी या शेतकऱ्यांच्या खात्यावर एक रुपयाही आला नाही. याबाबत शासनाने शेतकऱ्यांना ठेंगा दाखविला आहे.

कोरोणाच्या संकटसमयी शासनाने प्रामाणिक शेतकऱ्यांना मदत करावी, अशी चांदूर बाजार तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकऱ्यांसमोर गारपीट, अतिवृष्टी, नापिकी अशी विविध संकटे समोर आलेली असतानाही या शेतकऱ्यांनी उसनवारी करीत, घरातील दागिने विक्री करून डोक्यावर कर्ज नको म्हणून बँकेचे कर्ज फेडले. अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळणे आवश्यक होते. मात्र, त्यांची दखल शासन घ्यायला तयार नाही. आजही या शेतकऱ्यांसमोर अडचणींचा मोठा डोंगर आहे. रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमती, डिझेल दरवाढीमुळे ट्रॅक्टरचालकांनी मशागतीच्या कामाचे वाढविलेले दर यामुळे हे शेतकरी अडचणीत आले आहेत. नियमितपणे कर्जाची परतफेड करूनही त्यांच्या पदरी निराशाच आली आहे. आगामी हंगाम पाहता शेतकऱ्यांची आर्थिक अडचण टाळण्यासाठी नियमित फेड करणाऱ्या कर्जदाराच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

***********

इंडियन बँकेच्या आसेगाव पूर्णा शाखेतून १५-२० वर्षांपासून पीक कर्जाची नियमित उचल व भरणा करीत आहे. दोन वर्षे पूर्ण होत आले तरी अद्यापही माझ्या खात्यावर कोणत्याही योजनेतील रक्कम परतफेडीनंतर जमा झाली नाही. शासनाने कोरोनासारख्या महामारीत खचलेल्या शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य देऊन आता तरी मदत करावी.

- अजय तायडे, शेतकरी, टाकरखेडा पूर्णा

-------------

शासनाने प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून शासनाकडून पन्नास हजार रुपये दिले. मात्र, अद्यापही माझ्या खात्यावर ते जमा झालेले नाही. मी उलाढाल करून व दागदागिने गहाण ठेवून बँकेतील कर्जाची परतफेड केली. मात्र, शासनाने शेतकऱ्यांची दिशाभूल करून शेतकऱ्यांना ठेंगा दाखविला.

- अंबादास पाटील, शेतकरी, आसेगाव पूर्णा