शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची उपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:10 IST

आसेगाव पूर्णा : राज्य सरकारने दोन वेळा वेगवेगळ्या योजनांतर्गत दोन लाखांपर्यंतची शेतकऱ्यांची कर्ज माफ केली, तर कर्जाची प्रामाणिकपणे परतफेड ...

आसेगाव पूर्णा : राज्य सरकारने दोन वेळा वेगवेगळ्या योजनांतर्गत दोन लाखांपर्यंतची शेतकऱ्यांची कर्ज माफ केली, तर कर्जाची प्रामाणिकपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार होते. मात्र, दोन वर्षे पूर्ण होत आली तरी या शेतकऱ्यांच्या खात्यावर एक रुपयाही आला नाही. याबाबत शासनाने शेतकऱ्यांना ठेंगा दाखविला आहे.

कोरोणाच्या संकटसमयी शासनाने प्रामाणिक शेतकऱ्यांना मदत करावी, अशी चांदूर बाजार तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकऱ्यांसमोर गारपीट, अतिवृष्टी, नापिकी अशी विविध संकटे समोर आलेली असतानाही या शेतकऱ्यांनी उसनवारी करीत, घरातील दागिने विक्री करून डोक्यावर कर्ज नको म्हणून बँकेचे कर्ज फेडले. अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळणे आवश्यक होते. मात्र, त्यांची दखल शासन घ्यायला तयार नाही. आजही या शेतकऱ्यांसमोर अडचणींचा मोठा डोंगर आहे. रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमती, डिझेल दरवाढीमुळे ट्रॅक्टरचालकांनी मशागतीच्या कामाचे वाढविलेले दर यामुळे हे शेतकरी अडचणीत आले आहेत. नियमितपणे कर्जाची परतफेड करूनही त्यांच्या पदरी निराशाच आली आहे. आगामी हंगाम पाहता शेतकऱ्यांची आर्थिक अडचण टाळण्यासाठी नियमित फेड करणाऱ्या कर्जदाराच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

***********

इंडियन बँकेच्या आसेगाव पूर्णा शाखेतून १५-२० वर्षांपासून पीक कर्जाची नियमित उचल व भरणा करीत आहे. दोन वर्षे पूर्ण होत आले तरी अद्यापही माझ्या खात्यावर कोणत्याही योजनेतील रक्कम परतफेडीनंतर जमा झाली नाही. शासनाने कोरोनासारख्या महामारीत खचलेल्या शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य देऊन आता तरी मदत करावी.

- अजय तायडे, शेतकरी, टाकरखेडा पूर्णा

-------------

शासनाने प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून शासनाकडून पन्नास हजार रुपये दिले. मात्र, अद्यापही माझ्या खात्यावर ते जमा झालेले नाही. मी उलाढाल करून व दागदागिने गहाण ठेवून बँकेतील कर्जाची परतफेड केली. मात्र, शासनाने शेतकऱ्यांची दिशाभूल करून शेतकऱ्यांना ठेंगा दाखविला.

- अंबादास पाटील, शेतकरी, आसेगाव पूर्णा