शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची उपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:10 IST

आसेगाव पूर्णा : राज्य सरकारने दोन वेळा वेगवेगळ्या योजनांतर्गत दोन लाखांपर्यंतची शेतकऱ्यांची कर्ज माफ केली, तर कर्जाची प्रामाणिकपणे परतफेड ...

आसेगाव पूर्णा : राज्य सरकारने दोन वेळा वेगवेगळ्या योजनांतर्गत दोन लाखांपर्यंतची शेतकऱ्यांची कर्ज माफ केली, तर कर्जाची प्रामाणिकपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार होते. मात्र, दोन वर्षे पूर्ण होत आली तरी या शेतकऱ्यांच्या खात्यावर एक रुपयाही आला नाही. याबाबत शासनाने शेतकऱ्यांना ठेंगा दाखविला आहे.

कोरोणाच्या संकटसमयी शासनाने प्रामाणिक शेतकऱ्यांना मदत करावी, अशी चांदूर बाजार तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकऱ्यांसमोर गारपीट, अतिवृष्टी, नापिकी अशी विविध संकटे समोर आलेली असतानाही या शेतकऱ्यांनी उसनवारी करीत, घरातील दागिने विक्री करून डोक्यावर कर्ज नको म्हणून बँकेचे कर्ज फेडले. अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळणे आवश्यक होते. मात्र, त्यांची दखल शासन घ्यायला तयार नाही. आजही या शेतकऱ्यांसमोर अडचणींचा मोठा डोंगर आहे. रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमती, डिझेल दरवाढीमुळे ट्रॅक्टरचालकांनी मशागतीच्या कामाचे वाढविलेले दर यामुळे हे शेतकरी अडचणीत आले आहेत. नियमितपणे कर्जाची परतफेड करूनही त्यांच्या पदरी निराशाच आली आहे. आगामी हंगाम पाहता शेतकऱ्यांची आर्थिक अडचण टाळण्यासाठी नियमित फेड करणाऱ्या कर्जदाराच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

***********

इंडियन बँकेच्या आसेगाव पूर्णा शाखेतून १५-२० वर्षांपासून पीक कर्जाची नियमित उचल व भरणा करीत आहे. दोन वर्षे पूर्ण होत आले तरी अद्यापही माझ्या खात्यावर कोणत्याही योजनेतील रक्कम परतफेडीनंतर जमा झाली नाही. शासनाने कोरोनासारख्या महामारीत खचलेल्या शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य देऊन आता तरी मदत करावी.

- अजय तायडे, शेतकरी, टाकरखेडा पूर्णा

-------------

शासनाने प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून शासनाकडून पन्नास हजार रुपये दिले. मात्र, अद्यापही माझ्या खात्यावर ते जमा झालेले नाही. मी उलाढाल करून व दागदागिने गहाण ठेवून बँकेतील कर्जाची परतफेड केली. मात्र, शासनाने शेतकऱ्यांची दिशाभूल करून शेतकऱ्यांना ठेंगा दाखविला.

- अंबादास पाटील, शेतकरी, आसेगाव पूर्णा