शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

समाजाच्या प्रगतीसाठी एकत्र येणे काळाची गरज

By admin | Updated: December 26, 2016 00:36 IST

समाजाच्या प्रगतीसाठी विखुरलेल्या घटकांना एकाछताखाली आणून समाजाचे हित जोपासण्यासाठी

रवींद्र मुंदे : घाटोळे, कुणबी समाजाचा मेळावा अमरावती : समाजाच्या प्रगतीसाठी विखुरलेल्या घटकांना एकाछताखाली आणून समाजाचे हित जोपासण्यासाठी एकत्र येणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य तथा घाटोळे कुणबी पाटील समाज संघटनेचे जिल्हाअध्यक्ष रवींद्र मुंदे यांनी केले. ते रविवार रोजी आयोजित घाटोळे समाजाच्या उपवर युवक-युवती परिचय मेळाव्यात प्रास्तावीत कार्यक्रमाला संबोधित करताना बोलत होते. यावेळी व्यासपिठकावर माजी आमदार ज्ञानेश्र्वर धाने पाटील , माजी उपमहापौर चेतन पवार, साहेबराव काठोळे, गणेश तनपुरे, अनिल पाटील, सुधाकर मुरादे, बारड साहेब, सुभाष लळे, गुलाबराव बोरकर,रेवतीनाथ रंगाचार्य, महादेव अळसपुरे आदीची उपस्थिती होती. रविवारी दुपारी १२ वाजता साईनगर ते अकोली मार्गावरील एका मंगल कार्यालयात मेळाव्या निमित्ताने समाज एकत्र आले होते.पुढे बोलतांना मुंदे म्हणाले घाटोळे समाजाची संख्या अमरावतीच नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्यात मोठया संख्येने आहे. परंतु आता पर्यत समाज पाहीजे तशा प्रमाणात एकत्र येत नव्हता त्यामुळे विखुरलेल्या समाज बांधवाना एकत्र आणून त्याची समाज बांधवाशी आदन पदान करण्यासाठी मागील काही वर्षापासून घाटोळे कुणबी पाटील समाजाचा युवक-युवती मेळावा आयोजित करण्यात येत आहे. दिवसेंदिवस या मेळाव्याची व्याप्ती वाढत आहे. ही सर्व फलश्रुती समाज बांधवाच्या सहकाऱ्याचे फलित असल्याचे मुंदे म्हणालेत. यावेळी विविध भागातून आलेल्या सुमारे दोनशे युवक -युवतींनी परिचय मेळाव्यात सहभाग घेतला. यावेळी उपस्थित मान्यवरांनीसुद्धा मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन ओम मुंदे, अनिल लळे, खुशाल अळसपुरे यांनी, तर आभार प्रदर्शन प्रवीण डांगे, संजय शेटे यांनी केले. मेळाव्याला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. (प्रतिनिधी)