शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

बोंड अळीची भरपाई, घोषणा नको कृती हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 22:19 IST

यंदा बीटी कपाशीवरील बोंड अळीने धोक्याच्या पातळीपेक्षा अधिक नुकसान झाले. या दशकात कृषी क्षेत्रातील मोठे संकट शेतकऱ्यांवर उदभवले आहे.

ठळक मुद्दे‘एनडीआरएफ’ची मदत : दशकातील सर्वात मोठ्या संकटाने शेतकरी हादरला

आॅनलाईन लोकमतअमरावती : यंदा बीटी कपाशीवरील बोंड अळीने धोक्याच्या पातळीपेक्षा अधिक नुकसान झाले. या दशकात कृषी क्षेत्रातील मोठे संकट शेतकऱ्यांवर उदभवले आहे. जिल्ह्यातील दीड लाख हेक्टरमधील कपाशी या बोंड अळीने उद्ध्वस्त झाली असताना केंद्र शासनाची मदत देण्याचे सुतोवाच शासनाने केले. ही केवळ अधिवेशनापूर्वीची घोषणा न ठरता प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.जिल्ह्यात प्रस्तावित क्षेत्राच्या १०७ टक्के म्हणजेच दोन लाख सहा हजार २७६ हेक्टरमध्ये कपाशीचे क्षेत्र आहे. कपाशी पात्या फुलांवर असताना बोंडअळी व रसशोषक किडीमुळे लाल्याचा मोठ्या प्रमाणावर अटॅक झाला, यामध्ये किमान दीड लाख हेक्टरमधील कपाशीचे ६० ते ७० टक्कयावर नुकसान झालेले आहे. काही ठिकाणी तर बोंड अळीमुळे ९६ टक्क्यांपर्यंत नुकसान झाले असल्याचे जिल्हास्तरीय समितीच्या अहवालावरून स्पष्ट झाले. बोंड अळीची प्रतिरोध क्षमता वाढल्यानेच बीटीे तंत्रज्ञान गेल्या दोन वर्षांपासून अपयशी ठरले आहे. यंदा तर सार्वत्रिक ६० ते ७० टक्के नुकसान झाले असल्याने शेतकºयांचा खरीप हंगामच वाया गेला. शेतकरी कपाशीच्या उभ्या पिकात रोटाव्हेटर फिरवीत असताना बोंडअळीच्या नुकसानीसाठी नैसगीक आपत्तीमधून मदत देणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.मात्र ही मदत कश्या प्रकारची राहणार हे शासनाने स्पष्ट केलेले नाही.केंद्राच्या मर्जीवरच राहणार भिस्तकृषी आयुक्तालयाकडून जिल्हा कृषी कार्यालयांना २८ नोव्हेंबरच्या पत्रानुसार बीटी बोंड अळीचे नुकसान हे ‘एनडीआरएफ’ व ‘एसडीआरएफ’च्या निकषात आहे. ३ जानेवारी २०१२ च्या परिपत्रकानुसार कीड व रोगांचे नुकसान पातळी ही ५० टक्क्यांवर असल्यास शेतकऱ्यांना निकषानुसार मदत मिळू शकते. मात्र, या मदतीसाठी केंद्र शासनाच्या मदतीवरच राज्य शासनाला निर्भर राहावे लागणार असल्याने शेतकरी साशंंकच आहे.बोंड अळीच्या नुकसानीसंदर्भात प्राप्त तक्रारींची क्षेत्रिय अधिकाºयांद्वारा पाहणी करून प्रपत्र भरण्यात येत आहे. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमधून आता भरपाई मिळू शकते. यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू.- सुभाष नागरे, कृषी सहसंचालक