शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

लिंबू पिकाची क्षेत्रवाढ गरजेची

By admin | Updated: September 15, 2015 00:10 IST

सर्व ऋतूत व वर्षभर उपलब्ध असणाऱ्या लिंबांना मोठ्या प्रमाणावर मागणी व बाजारपेठ उपलब्ध असताना जिल्ह्यात केवळ २६७.५६ हेक्टर लिंबूचे क्षेत्र आहे.

कृषी विभागाने घ्यावा पुढाकार : जिल्ह्यात केवळ २६७ हेक्टर क्षेत्रलोकमत विशेषअमरावती : सर्व ऋतूत व वर्षभर उपलब्ध असणाऱ्या लिंबांना मोठ्या प्रमाणावर मागणी व बाजारपेठ उपलब्ध असताना जिल्ह्यात केवळ २६७.५६ हेक्टर लिंबूचे क्षेत्र आहे. इतर फळपिकांपेक्षा कमी पाणी व मध्यम प्रकारच्या जमिनीतही हे पीक सहज घेता येते. वातावरणातील बदल व कीडरोगामुळे अन्य फळपिकांच्या सरासरी उत्पादनात घट येत असताना लिंबूने शेतकऱ्यांना साथ दिली आहे. लिंबूच्या क्षेत्रवाढीसाठी कृषी विभागाने पुढाकार घेतल्यास ही स्थिती कायम राहणार आहे. दररोजच्या जेवणात लिंबू हा अविभाज्य घटक आहे, सौंदर्यप्रसाधनांसाठी लिंबाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. लिंबांपासून लोणचे व विविध खाद्यपदार्थ बनतात, उन्हाळ्यात तर लिंबाला जोरदार मागणी असते. मात्र, त्या तुलनेत जिल्ह्यात लिंबांची उत्पादकता कमी असल्याने लिंबाची भाववाढ व टंचाई असते. लिंबू हे बारमाही पीक असल्याने अन्य पिकांच्या तुलनेत लिंबूचे उत्पादन मात्र हमखास होते. जिल्ह्यातील सर्व प्रकारची जमीन ही लिंबूवर्गीय पिकांसाठी अनुकूल आहे. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानात लिंबू लागवडीसाठी योजना असताना जिल्ह्यातील क्षेत्रवाढ झालेली नाही. जिल्ह्यात सद्यस्थितीत २६७.५६ हेक्टरमध्ये लिंबूची लागवड आहे. २४०७.५ मेट्रिक टन उत्पादकता आहे. तालुकानिहाय क्षेत्र पाहता अमरावती तालुक्यात १४.२५ हेक्टर, भातकुली ८.५३ हेक्टर, चांदूररेल्वे १२.१० हेक्टर, धामणगाव ८.३८, नांदगाव खंडेश्वर ८३.९६ हेक्टर, मोर्शी २६.४१ हेक्टर, वरूड ६.५५ हेक्टर, तिवसा ३५.०३ हेक्टर, चांदूरबाजार ३.२४ हेक्टर, अचलपूर २ हेक्टर, अंजनगाव सुर्जी ५८.२१ हेक्टर, चिखलदरा ४० आर, धारणी ४.५० हेक्टर क्षेत्र आहे. या पिकाची क्षेत्रवाढ झाल्यास प्रतिकूल स्थितीत शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल. (प्रतिनिधी)लिंबू या फळपिकाचे तीन बहर घेता येतात. उन्हाळ्याच्या सोयीने बहराचे नियोजन केल्यास अधिक भाव मिळतो, कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या वाणाची लागवड केल्यास शेतकऱ्यांना फायदा होतो.- योगेश इंगळे,कृषी शास्त्रज्ञ, प्रादेशिक संशोधन केंद्र.