शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

लिंबू पिकाची क्षेत्रवाढ गरजेची

By admin | Updated: September 15, 2015 00:10 IST

सर्व ऋतूत व वर्षभर उपलब्ध असणाऱ्या लिंबांना मोठ्या प्रमाणावर मागणी व बाजारपेठ उपलब्ध असताना जिल्ह्यात केवळ २६७.५६ हेक्टर लिंबूचे क्षेत्र आहे.

कृषी विभागाने घ्यावा पुढाकार : जिल्ह्यात केवळ २६७ हेक्टर क्षेत्रलोकमत विशेषअमरावती : सर्व ऋतूत व वर्षभर उपलब्ध असणाऱ्या लिंबांना मोठ्या प्रमाणावर मागणी व बाजारपेठ उपलब्ध असताना जिल्ह्यात केवळ २६७.५६ हेक्टर लिंबूचे क्षेत्र आहे. इतर फळपिकांपेक्षा कमी पाणी व मध्यम प्रकारच्या जमिनीतही हे पीक सहज घेता येते. वातावरणातील बदल व कीडरोगामुळे अन्य फळपिकांच्या सरासरी उत्पादनात घट येत असताना लिंबूने शेतकऱ्यांना साथ दिली आहे. लिंबूच्या क्षेत्रवाढीसाठी कृषी विभागाने पुढाकार घेतल्यास ही स्थिती कायम राहणार आहे. दररोजच्या जेवणात लिंबू हा अविभाज्य घटक आहे, सौंदर्यप्रसाधनांसाठी लिंबाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. लिंबांपासून लोणचे व विविध खाद्यपदार्थ बनतात, उन्हाळ्यात तर लिंबाला जोरदार मागणी असते. मात्र, त्या तुलनेत जिल्ह्यात लिंबांची उत्पादकता कमी असल्याने लिंबाची भाववाढ व टंचाई असते. लिंबू हे बारमाही पीक असल्याने अन्य पिकांच्या तुलनेत लिंबूचे उत्पादन मात्र हमखास होते. जिल्ह्यातील सर्व प्रकारची जमीन ही लिंबूवर्गीय पिकांसाठी अनुकूल आहे. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानात लिंबू लागवडीसाठी योजना असताना जिल्ह्यातील क्षेत्रवाढ झालेली नाही. जिल्ह्यात सद्यस्थितीत २६७.५६ हेक्टरमध्ये लिंबूची लागवड आहे. २४०७.५ मेट्रिक टन उत्पादकता आहे. तालुकानिहाय क्षेत्र पाहता अमरावती तालुक्यात १४.२५ हेक्टर, भातकुली ८.५३ हेक्टर, चांदूररेल्वे १२.१० हेक्टर, धामणगाव ८.३८, नांदगाव खंडेश्वर ८३.९६ हेक्टर, मोर्शी २६.४१ हेक्टर, वरूड ६.५५ हेक्टर, तिवसा ३५.०३ हेक्टर, चांदूरबाजार ३.२४ हेक्टर, अचलपूर २ हेक्टर, अंजनगाव सुर्जी ५८.२१ हेक्टर, चिखलदरा ४० आर, धारणी ४.५० हेक्टर क्षेत्र आहे. या पिकाची क्षेत्रवाढ झाल्यास प्रतिकूल स्थितीत शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल. (प्रतिनिधी)लिंबू या फळपिकाचे तीन बहर घेता येतात. उन्हाळ्याच्या सोयीने बहराचे नियोजन केल्यास अधिक भाव मिळतो, कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या वाणाची लागवड केल्यास शेतकऱ्यांना फायदा होतो.- योगेश इंगळे,कृषी शास्त्रज्ञ, प्रादेशिक संशोधन केंद्र.