शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
3
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
4
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
5
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
6
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
7
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
8
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
9
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
10
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
11
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
12
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
13
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
14
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
15
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
16
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
17
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
18
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
19
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
20
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

२७ हजार हेक्टर क्षमतेचे १८ सिंचन प्रकल्प अधांतरी

By admin | Updated: November 29, 2014 00:18 IST

जिल्ह्यात राज्य शासनाने सन २००४ ते २००९ या सहा वर्षांच्या कालावधीत आठ तालुक्यांतील १८ प्रकल्प सिंचन प्रकल्पांना मंजुरी दिली होती.

जितेंद्र दखने अमरावतीजिल्ह्यात राज्य शासनाने सन २००४ ते २००९ या सहा वर्षांच्या कालावधीत आठ तालुक्यांतील १८ प्रकल्प सिंचन प्रकल्पांना मंजुरी दिली होती. यामध्ये निम्नपेढी या मोठ्या प्रकल्पांसह तीन मध्यम व १४ लघु प्रकल्पांचा समावेश आहे.या प्रकल्पांना शासनाने सुधारित प्रशासकीय मान्यता न दिल्याने २७ हजार २१८ हेक्टरचे सिंचन क्षेत्र सुजलाम् सुफलाम् होण्यापासून अद्यापही कोसोदूर आहेत. या अधांतरी पडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी शासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. मागील काही वर्षांपासून अमरावतीसह विदर्भातील सिंचन अनुशेषाच्या मुद्यावर वादळ उठत आहे. या सिंचनाच्या अनुशेषामध्ये सर्वाधिक सिंचनाचा अनुशेष विशेषत: अमरावती जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यातील निम्नपेढी सिंचन प्रकल्पाला सन २००४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सुमारे १६१.१७ कोटी रूपयांच्या सर्वात मोठ्या सिंचन प्रकल्पांना मंजुरी देऊन या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली होती. मात्र ११ वर्ष लोटून गेल्यानंतरही हा प्रकल्प अद्यापही पूर्ण होऊ शकला नाही. परिणामी खारपाणपट्ट्यातील शेती केवळ सिंचनाच्या सुविधा नसल्यामुळे विकासापासुन दूर आहे.त्यानंतर चांदूरबाजार तालुक्यातील बोर्डी नाला प्रकल्पाला सन २००६ मध्ये मंजुरी दिली. शासनाने या कामासाठी सुमारे १००.८० कोटी रूपयांची प्रशासकीय मंजुरी त्यावेळी देण्यात आली. अशाच प्रकारे अमरावती तालुक्यातील पेढी बॅरेज प्रकल्पाला सन २००८ मध्ये मंजुरी देऊन या प्रकल्पाच्या ६२.७७ रूपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. मात्र या प्रकल्पांची कामे अपूर्ण स्थितीत आहेत. घुगंशी बॅरेज प्रकल्पसुध्दा २००८ मध्ये मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठीच्या कामाला त्यावेळी १७०.१५ कोटी रूपये किमतीचा हा प्रकल्प सद्यस्थितीत सुमारे ३८९.९१ कोटी रूपयांपर्यंत पोहचला आहे. याशिवाय तिवसा तालुक्यातील शिवणगाव लघु प्रकल्पाला सन २००९ मध्ये ६.५४ कोटी रूपयांच्या कामांना मंजुरी दिली होती. आता हा लघु प्रकल्प अपूर्ण असल्यामुळे कामे रखडली व प्रकल्प १६.३७ कोटी रूपये किमतीने वाढला आहेत. वरूडमधील निम्नचारघड १११.१३ कोटी, नागठाणा ३२.५२, भिमंडी १४.२७ झटामझिरी १०.९०, पवनी ५.७४, बहादा ७.५३ कोटी रूपयाचे हे सहा लघु प्रकल्प भूसंपादन , वनजमिनी, बुडीतक्षेत्र, माती आणि सुप्रमा आदी विविध कारणांमुळे अडचणीत सापडले आहेत. परिणामी या प्रकल्पाची काही कामे अर्धवट स्थितीत तर काहींची कामे सुरूही होऊ शकली नाहीत, ही शोकांतिका आहे.