शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

काँग्रेसवर नियंत्रणासाठी राष्ट्रवादीची ‘समिती’

By admin | Updated: April 24, 2016 00:34 IST

जिल्हा परिषदेत सत्ताधारी असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये विकासकामांवरून धूसफुस सुरू झाली आहे.

जिल्हा परिषदेत धुसफूस : राष्ट्रवादीने केली समन्वय समितीची अनौपचारिक घोषणाप्रशांत देसाई भंडाराजिल्हा परिषदेत सत्ताधारी असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये विकासकामांवरून धूसफुस सुरू झाली आहे. काँग्रेसच्या असहकार्याने त्रस्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सत्तेतील अस्तित्त्व टिकवून ठेवण्यासाठी नुकतीच बैठक बोलविली. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व त्यांचे समर्थक जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. यात काँग्रेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक अनौपचारिक समिती तयार केली आहे. समितीच्या माध्यमातून काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.मिनीमंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत सध्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. मात्र, सत्तेला एक वर्षाचा कालावधी लोटत नाही, तोच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी विकास काम तथा जिल्ह्याच्या नियोजनात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सहभागी करून न घेता एकहाती सत्ता असल्याच्या अविर्भावात काम सुरू केले. त्यामुळे सत्तेत असूनही काँग्रेसचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना समानतेची वागणूक न देता अविश्वासाचे राजकारण करीत असल्याने मागील काही दिवसांपासून दोन्ही सत्ताधाऱ्यांमध्ये अंतर्गत धूसफुस सुरू आहे.विकासकामांचे वाटप करताना दुय्यम वागणूक मिळत असल्याने अर्थसंकल्पीय सभा तथा या महिन्यात झालेल्या स्थायी समितीच्या सभेवर राष्ट्रवादी काँग्रेसने बहिर्गमन करून काँग्रेसला धारेवर धरले होते. यावरूनच त्यांच्यात अंतर्गत कलह असल्याचे दिसून आले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचा असंतोष दूर करण्यासाठी काँग्रेसने मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‘बुंद से गयी, वह हौद से नही आती’ या उक्तीनुसार राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचा प्रस्ताव धूळकावला. काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पुन्हा असे होणार नाही, असे अभिवचन दिले. मात्र, काँग्रेसकडून पुन्हा डावलण्याचे षडयंत्र होऊ शकते, असे गृहीत धरून राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, बाहेरून पाठिंबा देणारे शिवसेनेसह अन्य तीन सदस्य अशा १९ सदस्यांच्या बैठकीत काँग्रेसच्या भूमिकेचा कडाडून विरोध केला. यावेळी काँग्रेसकडून पुन्हा विकासकामे असो किंवा अन्य कुठलेही कामे असो त्यात आपल्याला डावलणार नाहीत याची खबरदारी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची अनौपचारीक समिती बनविली आहे. ही समिती काँग्रेसच्या पदाधिऱ्यांच्या हालचालिंवर नजर ठेऊन कामांचे समसमान नियोजन व्हावे, यादृष्टिने प्रयत्न करणार आहे. काँग्रसवर नियंत्रणासाठी समिती तयार केली असली तरी, काँग्रेसचे पदाधिकारी त्यांना कितपत सहकार्य करतात, हे येणारा काळच सांगेल.