शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
2
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
3
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
4
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
5
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
6
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
7
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
8
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
9
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
10
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
11
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
12
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
13
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
14
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
15
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
16
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
17
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
18
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
19
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
20
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?

राष्ट्रवादीला दोनच मतदारसंघ मिळणार!

By admin | Updated: August 18, 2014 23:15 IST

येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीची औपचारिक घोषणा झाली असली तरी दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची तयारी चालविली आहे.

गणेश वासनिक - अमरावतीयेत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीची औपचारिक घोषणा झाली असली तरी दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची तयारी चालविली आहे. मात्र, आघाडी झाल्यास जिल्ह्यातील आठ मतदारसंघांपैकी बडनेरा व मोर्शी हे दोनच मतदारसंघ राष्ट्रवादीला देण्याची काँग्रेसची तयारी आहे.रविवारी मुंबई येथील टिळक भवनात काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यात जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारही सहभागी झाले होते. अमरावती, अचलपूर, मेळघाट, दर्यापूर, धामणगाव रेल्वे व तिवसा या मतदारसंघांसाठी काँग्रेसच्या मुलाखती पार पडल्या. बडनेरा व मोर्शी विधानसभा मतदारसंघ वगळता सहाही मतदारसंघांकरिता मुलाखती घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ दोनच मतदारसंघ देण्याची काँग्रेसची तयारी असल्याचे स्पष्ट होत आहे.जिल्ह्यात सध्या काँग्रेसचे चार आमदार असून या आमदारांचे चारही मतदारसंघ काँग्रेसकडेच कायम राहतील. मात्र, ज्या मतदारसंघात काँग्रेसची ताकद पूर्वीपेक्षा वाढली आहे, ते अचलपूर आणि दर्यापूर हे दोन मतदारसंघ काँग्रेसच्याच वाट्याला यावेत, यासाठी स्थानिक नेत्यांनी वरिष्ठांकडे ‘लॉबिंग’ चालविली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचा अचलपूर मतदारसंघावर डोळा असल्याने हा मतदारसंघ काँग्रेसच्याच ताब्यात राहावा, यासाठी स्थानिक काँग्रेस नेत्यांनी ही बाब मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आवर्जून मांडल्याची माहिती आहे. एवढेच नव्हे, तर अचलपूर मतदारसंघ राष्ट्रवादीला देणार नाही, असा शब्द काँग्रेसच्या वरिष्ठांनी दिल्याने या मतदारसंघात इच्छुकांची तूर्तास ‘बल्ले बल्ले’ आहे.राष्ट्रवादीची राजकीय ताकद बघता दोन मतदारसंघ त्यांच्यासाठी पुरेसे असल्याचे मत काँग्रेसच्या नेत्यांचे आहे. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपरिषदेतील संख्याबळ आणि सर्वाधिक आमदार काँग्रेसचे असल्याने विधानसभा निवडणुकीत अधिक मतदारसंघ मिळावेत, अशी काँग्रेसच्या नेत्यांची अपेक्षा आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मिळालेली मतांची टक्केवारी काँग्रेसच्या मदतीनेच गाठता आल्याचे स्थानिक नेत्यांचे मत आहे. जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची ताकद अधिक असल्याने आठही मतदारसंघात उमेदवार रिंगणात उतरविण्याची तयारी आहे. मात्र, आघाडी झाल्यास राष्ट्रवादीला केवळ मोर्शी व बडनेरा हे दोनच मतदारसंघ देण्याची मानसिकता काँग्रेसची असल्याचे दिसून येते.काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी राज्यातील विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय घेत आघाडी कायम ठेवण्याचे ठरविले होते. मात्र, एखाद्या मतदारसंघात सलग दोन वेळा पराभव झाला असल्यास व यावेळी हा मतदारसंघ मित्रपक्षाने मागितल्यास तो सोडावा लागेल, असे सूत्रही ठरविले. त्यामुळे नव्या निकषानुसार अचलपूर मतदारसंघ राष्ट्रवादीने ताब्यात घेण्याची तयारी सुरु केली आहे. जागा वाटपाच्या वेळी आघाडीच्या नेत्यांमध्ये अचलपूर मतदारसंघासाठी बरीच रस्सीखेच होण्याचे संकेत आहेत. अशातच लोकसभा निवडणुकीत मेळघाटात राष्ट्रवादीच्या उमेदवारांना अधिक मते मिळाल्याने हा मतदारसंघ मिळविण्याची जोरदार तयारी राकाँने चालविली आहे. अचलपूर आणि मेळघाट मतदारसंघाच्या वाटपावरुन आघाडीत बराच वाद उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षातील नेत्यांची आघाडी व्हावी, अशी इच्छा आहे. मात्र, जागा वाटपाचे परंपरागत सूत्र कायम राहूनच आघाडी व्हावी, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. राष्ट्रवादीनेदेखील दोनपेक्षा अधिक जागा पदरात पाडून घेण्याची रणनीती आखली असून यात किती यश येते हे लवकरच स्पष्ट होईल.