शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीही रस्त्यावर

By admin | Updated: January 10, 2017 00:08 IST

केंद्राच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेधअमरावती : केंद्राच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या अन्यायी निर्णयाबद्दल भाजप शासनाचा निषेध करण्यासाठी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रस्त्यावर उतरून आंदोलन केले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे इर्विन चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना राकाँचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, शहराध्यक्ष बाबा राठोड व ज्येष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन दिले. आर्थिक स्थैर्यासाठी काळा पैसा नष्ट केला जात असेल तर अशा निर्णयाचे राकाँने स्वागतच केले. परंतु पूर्वनियोजन नसल्याने या निर्णयामुळे सामान्य जनतेची कोंडी झाली आहे, अशा प्रतिक्रिया राकाँच्या नेत्यांनी मोर्चाला संबोधित करताना व्यक्त केल्यात. शेतकऱ्यांचा आक्रोशअमरावती : नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असून सर्व व्यापार तसेच दैनंदिन व्यवहार मंदावले आहेत. अतिरिक्त कामाच्या बोजामुळे बँकेचे कर्मचारी हैराण झाले आहेत. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी आक्रोश व्यक्त करीत आहेत. शासनाच्या या धोरणांच्या निषेधार्थ राकाँच्यावतीने ९ जानेवारीला रोजी दुपारी १ वाजता जिल्हाकचेरीवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, शहराध्यक्ष बाबा राठोड, माजीमंत्री शरद तसरे, वसुधा देशमुख, माजी अध्यक्ष विजय भैसे, अरूण गावंडे, बाबूराव बेलसरे, प्रल्हाद सुंदरकर, शेखर भोयर, निलिमा महल्ले, गणेश रॉय, गजानन रेवाळकर, विजय बाभुळकर, दीपक नागपुरे, आनंद गुल्हाने, सुचिता वनवे, भास्कर ठाकरे, प्रवीण मेश्राम, जानराव डहाके, स्मिता घोगरे, राजेंद्र अग्रवाल, विनोद तलवारे, मनोहर गुल्हाने, सय्यद शकील, विश्वासराव मोरे, मातकर, ज्योती वानखडे, मोहन जाखड आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)नोटाबंदीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडलीकापूस, सोयाबीन उत्पादकांसह ग्रामीण जनता नोटबंदीमुळे हैराण झाली आहे. शेतकऱ्यांची दुरवस्था झाली आहे. त्यांच्या शेतमालाला मिळत असलेला अत्यल्प भाव, बँकांचे खोळंबलेले व्यवहार यामुळे ग्रामीणांचे कंबरडे मोडले आहे. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदी करण्यात आल्याचा दावा सरकार करीत असले तरी आतापर्यंत किती काळा पैसा जमा झाला, असा सवाल राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे यांनी उपस्थित केला. नोटाबंदीच्या काळात जिल्ह्यात किती काळा पैसा जमा झाला,असा प्रश्न यावेळी राकाँच्या नेत्यांनी उपस्थित केला.नोटाबंदीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पीक भरपूर आले असताना सुद्धा भाव नसल्याने शेतकरी आत्महत्यांचा मार्ग स्वीकारत असल्याचा आरोप सुनील वऱ्हाडे यांनी केला आहे.