शहरं
Join us  
Trending Stories
1
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
2
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
3
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
4
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
5
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
6
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
7
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
8
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
9
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
10
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
11
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
12
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
13
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
14
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
15
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
16
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
17
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
18
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
19
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
20
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा

राष्ट्रवादीही रस्त्यावर

By admin | Updated: January 10, 2017 00:08 IST

केंद्राच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेधअमरावती : केंद्राच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या अन्यायी निर्णयाबद्दल भाजप शासनाचा निषेध करण्यासाठी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रस्त्यावर उतरून आंदोलन केले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे इर्विन चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना राकाँचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, शहराध्यक्ष बाबा राठोड व ज्येष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन दिले. आर्थिक स्थैर्यासाठी काळा पैसा नष्ट केला जात असेल तर अशा निर्णयाचे राकाँने स्वागतच केले. परंतु पूर्वनियोजन नसल्याने या निर्णयामुळे सामान्य जनतेची कोंडी झाली आहे, अशा प्रतिक्रिया राकाँच्या नेत्यांनी मोर्चाला संबोधित करताना व्यक्त केल्यात. शेतकऱ्यांचा आक्रोशअमरावती : नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असून सर्व व्यापार तसेच दैनंदिन व्यवहार मंदावले आहेत. अतिरिक्त कामाच्या बोजामुळे बँकेचे कर्मचारी हैराण झाले आहेत. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी आक्रोश व्यक्त करीत आहेत. शासनाच्या या धोरणांच्या निषेधार्थ राकाँच्यावतीने ९ जानेवारीला रोजी दुपारी १ वाजता जिल्हाकचेरीवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, शहराध्यक्ष बाबा राठोड, माजीमंत्री शरद तसरे, वसुधा देशमुख, माजी अध्यक्ष विजय भैसे, अरूण गावंडे, बाबूराव बेलसरे, प्रल्हाद सुंदरकर, शेखर भोयर, निलिमा महल्ले, गणेश रॉय, गजानन रेवाळकर, विजय बाभुळकर, दीपक नागपुरे, आनंद गुल्हाने, सुचिता वनवे, भास्कर ठाकरे, प्रवीण मेश्राम, जानराव डहाके, स्मिता घोगरे, राजेंद्र अग्रवाल, विनोद तलवारे, मनोहर गुल्हाने, सय्यद शकील, विश्वासराव मोरे, मातकर, ज्योती वानखडे, मोहन जाखड आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)नोटाबंदीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडलीकापूस, सोयाबीन उत्पादकांसह ग्रामीण जनता नोटबंदीमुळे हैराण झाली आहे. शेतकऱ्यांची दुरवस्था झाली आहे. त्यांच्या शेतमालाला मिळत असलेला अत्यल्प भाव, बँकांचे खोळंबलेले व्यवहार यामुळे ग्रामीणांचे कंबरडे मोडले आहे. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदी करण्यात आल्याचा दावा सरकार करीत असले तरी आतापर्यंत किती काळा पैसा जमा झाला, असा सवाल राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे यांनी उपस्थित केला. नोटाबंदीच्या काळात जिल्ह्यात किती काळा पैसा जमा झाला,असा प्रश्न यावेळी राकाँच्या नेत्यांनी उपस्थित केला.नोटाबंदीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पीक भरपूर आले असताना सुद्धा भाव नसल्याने शेतकरी आत्महत्यांचा मार्ग स्वीकारत असल्याचा आरोप सुनील वऱ्हाडे यांनी केला आहे.