शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
2
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
3
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
4
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
5
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
6
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
7
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
8
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
9
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
10
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
11
Operation Sindoor Live Updates: हरियाणात मुसळधार पाऊस, पाहा व्हिडीओ
12
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
13
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
14
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
15
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
16
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
17
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
18
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
19
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
20
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी

राष्ट्रवादीही रस्त्यावर

By admin | Updated: January 10, 2017 00:08 IST

केंद्राच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेधअमरावती : केंद्राच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या अन्यायी निर्णयाबद्दल भाजप शासनाचा निषेध करण्यासाठी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रस्त्यावर उतरून आंदोलन केले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे इर्विन चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना राकाँचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, शहराध्यक्ष बाबा राठोड व ज्येष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन दिले. आर्थिक स्थैर्यासाठी काळा पैसा नष्ट केला जात असेल तर अशा निर्णयाचे राकाँने स्वागतच केले. परंतु पूर्वनियोजन नसल्याने या निर्णयामुळे सामान्य जनतेची कोंडी झाली आहे, अशा प्रतिक्रिया राकाँच्या नेत्यांनी मोर्चाला संबोधित करताना व्यक्त केल्यात. शेतकऱ्यांचा आक्रोशअमरावती : नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असून सर्व व्यापार तसेच दैनंदिन व्यवहार मंदावले आहेत. अतिरिक्त कामाच्या बोजामुळे बँकेचे कर्मचारी हैराण झाले आहेत. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी आक्रोश व्यक्त करीत आहेत. शासनाच्या या धोरणांच्या निषेधार्थ राकाँच्यावतीने ९ जानेवारीला रोजी दुपारी १ वाजता जिल्हाकचेरीवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, शहराध्यक्ष बाबा राठोड, माजीमंत्री शरद तसरे, वसुधा देशमुख, माजी अध्यक्ष विजय भैसे, अरूण गावंडे, बाबूराव बेलसरे, प्रल्हाद सुंदरकर, शेखर भोयर, निलिमा महल्ले, गणेश रॉय, गजानन रेवाळकर, विजय बाभुळकर, दीपक नागपुरे, आनंद गुल्हाने, सुचिता वनवे, भास्कर ठाकरे, प्रवीण मेश्राम, जानराव डहाके, स्मिता घोगरे, राजेंद्र अग्रवाल, विनोद तलवारे, मनोहर गुल्हाने, सय्यद शकील, विश्वासराव मोरे, मातकर, ज्योती वानखडे, मोहन जाखड आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)नोटाबंदीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडलीकापूस, सोयाबीन उत्पादकांसह ग्रामीण जनता नोटबंदीमुळे हैराण झाली आहे. शेतकऱ्यांची दुरवस्था झाली आहे. त्यांच्या शेतमालाला मिळत असलेला अत्यल्प भाव, बँकांचे खोळंबलेले व्यवहार यामुळे ग्रामीणांचे कंबरडे मोडले आहे. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदी करण्यात आल्याचा दावा सरकार करीत असले तरी आतापर्यंत किती काळा पैसा जमा झाला, असा सवाल राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे यांनी उपस्थित केला. नोटाबंदीच्या काळात जिल्ह्यात किती काळा पैसा जमा झाला,असा प्रश्न यावेळी राकाँच्या नेत्यांनी उपस्थित केला.नोटाबंदीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पीक भरपूर आले असताना सुद्धा भाव नसल्याने शेतकरी आत्महत्यांचा मार्ग स्वीकारत असल्याचा आरोप सुनील वऱ्हाडे यांनी केला आहे.