शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
3
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
4
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
5
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
6
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
7
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
8
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
9
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
10
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
11
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
12
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
13
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
14
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
15
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
16
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
17
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
18
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
19
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
20
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

नवतपाचा उकाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 23:25 IST

सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेशाताच २५ मे पासून नवतपाला सुरुवात झाली आहे. त्याचा परिणाम जाणवत असून वाढत्या उष्म्यामुळे अंगाची लाही-लाही होत आहे. कुलर निकामी ठरत असून घराबाहेर निघताच अंग घामाने डबडबून जात आहे. उन्हाच्या दाहकतेमुळे सायंकाळीही गरम लाटा लागत आहे.

ठळक मुद्देअंगाची लाही-लाहीपारा ४५ अंशांवर

लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेशाताच २५ मे पासून नवतपाला सुरुवात झाली आहे. त्याचा परिणाम जाणवत असून वाढत्या उष्म्यामुळे अंगाची लाही-लाही होत आहे. कुलर निकामी ठरत असून घराबाहेर निघताच अंग घामाने डबडबून जात आहे. उन्हाच्या दाहकतेमुळे सायंकाळीही गरम लाटा लागत आहे. यातून उकाडा किती याचा अनुभव येत आहे. अशात नवतपा आणखी किती भाजणार आहे याची धसकी सर्वांनी घेतली आहे. नवतपाचे हे दिवस एकदाचे निघून जावे याचीच सर्व वाट बघत आहेत.तुर्तास धारणीचा पारा ४४ ते ४५ अंशावर पोहचला आहे. या तापमानात जीव कासावीस होऊ लागल्याने सर्वांनाच एक-एक दिवस जड होऊ लागला. त्यात उन्हाळ्याचा खरा महिना म्हणजे मे महिना असतो. मे च्या सुरूवातीपासूनच सूर्यदेवाने कोप दाखविला. त्यात महिन्याच्या शेवटी २५ मे पासून नवतपा सुरू झाला व तापमानाने हद पार केली. नवतपातील पहिल्या रविवारी रात्रीच्या वेळी अंगाला चटके लागायचे व उष्ण वारे वाहत असल्याचा अनुभव यंदा मिळाला. उन्हाचे चटके आजही लागत असल्याने घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. कित्येक तर दिवसा बाहेर निघणे टाळत आहेत. यामुळे दुपारच्या वेळी अघोषित संचारबंदी दिसून येते. सायंकाळी कसे तरी नागरिक दिवसभराचे काम आटोपायला निघतात. आता लोकांची सहनशीलता संपली असून कधी पाऊस पडतो व या उकाड्यपासून मुक्तता मिळते याची वाट सर्वच बघत आहेत. सकाळी १० ते दुपारी ५ वाजेपर्यंत घराबाहेर जाणे टाळावे, जायचेच असेल तर तोंड सुती कपड्याने बांधून घ्यावे, सुती व पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत, गॉगल घालावा, चप्पल न वापरता बुट वापरण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. धारणी तालुक्याचा मेळघाट व्याघ्र प्रकल्पात समावेश असताना चिखलदºया तापमानाचा पारा ४५ अंशावर गेल्याने मेळघाटचे पर्याावरण असंतुलित झाले आहे.काय आहे नवतपा?नवतपा म्हणजे सूर्य जेव्हा रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो, त्या कालावधीला नवतपा म्हणतात. हे नऊ दिवस असतात. ज्याची सुरुवात शनिवारी २५ मे पासून झाली आहे आणि ते ३ जूनला संपणार आहेत. नवतपा सुरू झाल्यापासून अंगाची लाहीलाही होत आहे. सकाळपासूनच उकाडा जाणवत असून रात्री उशिरापर्यंत उष्ण वातावरण आहे. रविवारी धारणीत कमाल ४४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले.