शहरं
Join us  
Trending Stories
1
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
2
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
3
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
4
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
5
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
6
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
7
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
8
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
9
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
10
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
11
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
12
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
13
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
14
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
15
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
16
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
17
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
18
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
20
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून

नवतपाचा उकाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 23:25 IST

सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेशाताच २५ मे पासून नवतपाला सुरुवात झाली आहे. त्याचा परिणाम जाणवत असून वाढत्या उष्म्यामुळे अंगाची लाही-लाही होत आहे. कुलर निकामी ठरत असून घराबाहेर निघताच अंग घामाने डबडबून जात आहे. उन्हाच्या दाहकतेमुळे सायंकाळीही गरम लाटा लागत आहे.

ठळक मुद्देअंगाची लाही-लाहीपारा ४५ अंशांवर

लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेशाताच २५ मे पासून नवतपाला सुरुवात झाली आहे. त्याचा परिणाम जाणवत असून वाढत्या उष्म्यामुळे अंगाची लाही-लाही होत आहे. कुलर निकामी ठरत असून घराबाहेर निघताच अंग घामाने डबडबून जात आहे. उन्हाच्या दाहकतेमुळे सायंकाळीही गरम लाटा लागत आहे. यातून उकाडा किती याचा अनुभव येत आहे. अशात नवतपा आणखी किती भाजणार आहे याची धसकी सर्वांनी घेतली आहे. नवतपाचे हे दिवस एकदाचे निघून जावे याचीच सर्व वाट बघत आहेत.तुर्तास धारणीचा पारा ४४ ते ४५ अंशावर पोहचला आहे. या तापमानात जीव कासावीस होऊ लागल्याने सर्वांनाच एक-एक दिवस जड होऊ लागला. त्यात उन्हाळ्याचा खरा महिना म्हणजे मे महिना असतो. मे च्या सुरूवातीपासूनच सूर्यदेवाने कोप दाखविला. त्यात महिन्याच्या शेवटी २५ मे पासून नवतपा सुरू झाला व तापमानाने हद पार केली. नवतपातील पहिल्या रविवारी रात्रीच्या वेळी अंगाला चटके लागायचे व उष्ण वारे वाहत असल्याचा अनुभव यंदा मिळाला. उन्हाचे चटके आजही लागत असल्याने घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. कित्येक तर दिवसा बाहेर निघणे टाळत आहेत. यामुळे दुपारच्या वेळी अघोषित संचारबंदी दिसून येते. सायंकाळी कसे तरी नागरिक दिवसभराचे काम आटोपायला निघतात. आता लोकांची सहनशीलता संपली असून कधी पाऊस पडतो व या उकाड्यपासून मुक्तता मिळते याची वाट सर्वच बघत आहेत. सकाळी १० ते दुपारी ५ वाजेपर्यंत घराबाहेर जाणे टाळावे, जायचेच असेल तर तोंड सुती कपड्याने बांधून घ्यावे, सुती व पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत, गॉगल घालावा, चप्पल न वापरता बुट वापरण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. धारणी तालुक्याचा मेळघाट व्याघ्र प्रकल्पात समावेश असताना चिखलदºया तापमानाचा पारा ४५ अंशावर गेल्याने मेळघाटचे पर्याावरण असंतुलित झाले आहे.काय आहे नवतपा?नवतपा म्हणजे सूर्य जेव्हा रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो, त्या कालावधीला नवतपा म्हणतात. हे नऊ दिवस असतात. ज्याची सुरुवात शनिवारी २५ मे पासून झाली आहे आणि ते ३ जूनला संपणार आहेत. नवतपा सुरू झाल्यापासून अंगाची लाहीलाही होत आहे. सकाळपासूनच उकाडा जाणवत असून रात्री उशिरापर्यंत उष्ण वातावरण आहे. रविवारी धारणीत कमाल ४४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले.