शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
4
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
5
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
6
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
7
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
8
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
9
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
10
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
11
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
12
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
13
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
14
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
15
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
16
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
17
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
18
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
19
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
20
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रध्वज सन्मान : प्लास्टिक तिरंगा बंदीवर न्यायालयाचे शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 00:50 IST

दरवर्षी राष्ट्रीय कार्यक्रमासह सांस्कृतिक महोत्सव व क्रीडा सामन्यांच्या वेळी विद्यार्थी व नागरिकांकडून कागदाच्या व प्लास्टिकच्या तिरंग्याचा वापर होतो. कार्यक्रम पार पडल्यानंतर हे तिरंगे पायदळी तुडविले जातात.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दरवर्षी राष्ट्रीय कार्यक्रमासह सांस्कृतिक महोत्सव व क्रीडा सामन्यांच्या वेळी विद्यार्थी व नागरिकांकडून कागदाच्या व प्लास्टिकच्या तिरंग्याचा वापर होतो. कार्यक्रम पार पडल्यानंतर हे तिरंगे पायदळी तुडविले जातात. प्लास्टिक कागदाच्या तिरंग्याच्या वापरावर न्यायालयाने बंदी घातली आहे. राष्ट्रध्वजाचा सन्मान करणे प्रत्येकाचे कर्तव्य असून अवमान झाल्यास गुन्हा दाखल करण्याची कायद्यात तरतूद आहे.ध्वजसंहितेच्या कलम १ (२) ते १ (५) मध्ये राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याची तरतूद आहे. प्लास्टिकच्या तिरंग्यावर बंदी असून कागदाच्या राष्ट्रध्वजाचा वापर थांबविण्यासाठी गृहविभाग पुढे सरसावला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर याविषयीजागृती करण्यात आली. राष्ट्रध्वज हे राष्ट्राबाबतच्या अभिमानाचे प्रतिक आहे.देशाच्या खेळाडूने पदक मिळविले किंवा एखाद्या सामन्यात विजय मिळविल्यानंतर तो आपल्या देशाचा ध्वज देऊन उभा राहतो. तेव्हा अभिमानाने ऊर भरून येतो. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनी शालेय गणवेश परिधान केलेली लहान मुले हाती राष्ट्रध्वज घेऊन धावतात. तेव्हा आनंद व समाधान वाटते. परंतु आनंद साजरा करीत असताना अनवधानाने राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ शकतो, याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.राष्ट्रध्वजाचा अवमान, विटंबना हे बोधचिन्ह व नावे (अनुसूचित वापरास प्रतिबंध) अधिनियम, १९५० व राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम १९७१ तसेच ध्वजसंहितेच्या तरतुदीनुसार दंडनीय गुन्हा ठरतो, याविषयी ध्वजसंहितेमध्ये नमुद आहे.अवमान रोखण्यासाठी शासनाच्या गृहविभागाने अशा सूचना जिल्हा, तालुका पातळीवर अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कागदी व प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी तालुका व जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी व तहसीलदारांना अशासकीय संस्था, विद्यार्थी, स्थानिक केबल आॅपरेटर व प्रसार माध्यमांच्या मदतीने जनजागृती करण्याच्या सूचना १४ जून २०१४ च्या परिपत्रकान्वये देवूने अनुपालन निर्देश दिले आहेत.ध्वजसंहितेत प्लास्टिकचा तिरंगा नमूद नाहीवापरातील प्लास्टिक नष्ट होत नाही. ते बरेच दिवस पडून राहते. ध्वजसंहितेच्या कलम २.२ (७) मधील प्रयोजनासाठीच कागदी तिरंगा वापरता येतो. प्लास्टिक तिरंग्याच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये काहीही नमूद नाही. प्लास्टिकच्या तिरंग्याचा वापर करू नये, अशा गृहविभागाच्या सूचना आहेत.अशी लावावी विल्हेवाटखराब झालेले, धूळ लागलेले राष्ट्रध्वज गोणी किंवा कपड्यांमध्ये व्यवस्थित बांधून, शिवून बंद करावे व ते राष्ट्रध्वज सूर्यास्त किंवा सूर्योदयापूर्वी जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक जाळून नष्ट करावेत व पूर्ण जळेपर्यंत सर्वांनी तेथेच उभे राहावे.जिल्हाधिकारी, तहसीलदारांकडे सुपूर्द करावेतराष्ट्रीय सण व राष्ट्रीय कार्यक्रमांसाठी राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. कार्यक्रमानुसार खराब झालेले, माती लागलेले तिरंगेञमैदानात, रस्त्यावर व कार्यक्रमस्थळी पडलेले असतात. हे तिरंगे गोळा करून जिल्हाधिकारी, तहसीलदारांकडे सुपूर्द करण्याचे अधिकार तालुका, जिल्हास्तरावर नेमलेल्या अशासकीय यंत्रणेस देण्यात आले आहेत.व्यावसायिकदृष्ट्या वापर हा अवमानचराष्ट्रध्वजाचा सन्मान एक दिवसासाठी नव्हे, तर निरंतर कायम असणे आवश्यक आहे. राष्ट्रध्वज फाटू नये, वाहनांवर लावल्यानंतर तो उडून जाणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. शाळेत जाताना मुलांच्या हाती प्लास्टिकचा, कागदाचा तिरंगा देऊ नये. राष्ट्रध्वजावर पाणी टाकणे, जमिनीवर पाडणे, फाडणे, जाळणे, त्यावर लिहिणे, व्यावसायिकदृष्ट्या वापर करणे हा राष्ट्रध्वजाचा अवमान समजला जातो. त्यामुळे नागरिकांनी याची विशेष दक्षता बाळगणे गरजेचे आहे.

टॅग्स :National Flagराष्ट्रध्वज