शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

राष्ट्रध्वज सन्मान : प्लास्टिक तिरंगा बंदीवर न्यायालयाचे शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 00:50 IST

दरवर्षी राष्ट्रीय कार्यक्रमासह सांस्कृतिक महोत्सव व क्रीडा सामन्यांच्या वेळी विद्यार्थी व नागरिकांकडून कागदाच्या व प्लास्टिकच्या तिरंग्याचा वापर होतो. कार्यक्रम पार पडल्यानंतर हे तिरंगे पायदळी तुडविले जातात.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दरवर्षी राष्ट्रीय कार्यक्रमासह सांस्कृतिक महोत्सव व क्रीडा सामन्यांच्या वेळी विद्यार्थी व नागरिकांकडून कागदाच्या व प्लास्टिकच्या तिरंग्याचा वापर होतो. कार्यक्रम पार पडल्यानंतर हे तिरंगे पायदळी तुडविले जातात. प्लास्टिक कागदाच्या तिरंग्याच्या वापरावर न्यायालयाने बंदी घातली आहे. राष्ट्रध्वजाचा सन्मान करणे प्रत्येकाचे कर्तव्य असून अवमान झाल्यास गुन्हा दाखल करण्याची कायद्यात तरतूद आहे.ध्वजसंहितेच्या कलम १ (२) ते १ (५) मध्ये राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याची तरतूद आहे. प्लास्टिकच्या तिरंग्यावर बंदी असून कागदाच्या राष्ट्रध्वजाचा वापर थांबविण्यासाठी गृहविभाग पुढे सरसावला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर याविषयीजागृती करण्यात आली. राष्ट्रध्वज हे राष्ट्राबाबतच्या अभिमानाचे प्रतिक आहे.देशाच्या खेळाडूने पदक मिळविले किंवा एखाद्या सामन्यात विजय मिळविल्यानंतर तो आपल्या देशाचा ध्वज देऊन उभा राहतो. तेव्हा अभिमानाने ऊर भरून येतो. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनी शालेय गणवेश परिधान केलेली लहान मुले हाती राष्ट्रध्वज घेऊन धावतात. तेव्हा आनंद व समाधान वाटते. परंतु आनंद साजरा करीत असताना अनवधानाने राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ शकतो, याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.राष्ट्रध्वजाचा अवमान, विटंबना हे बोधचिन्ह व नावे (अनुसूचित वापरास प्रतिबंध) अधिनियम, १९५० व राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम १९७१ तसेच ध्वजसंहितेच्या तरतुदीनुसार दंडनीय गुन्हा ठरतो, याविषयी ध्वजसंहितेमध्ये नमुद आहे.अवमान रोखण्यासाठी शासनाच्या गृहविभागाने अशा सूचना जिल्हा, तालुका पातळीवर अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कागदी व प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी तालुका व जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी व तहसीलदारांना अशासकीय संस्था, विद्यार्थी, स्थानिक केबल आॅपरेटर व प्रसार माध्यमांच्या मदतीने जनजागृती करण्याच्या सूचना १४ जून २०१४ च्या परिपत्रकान्वये देवूने अनुपालन निर्देश दिले आहेत.ध्वजसंहितेत प्लास्टिकचा तिरंगा नमूद नाहीवापरातील प्लास्टिक नष्ट होत नाही. ते बरेच दिवस पडून राहते. ध्वजसंहितेच्या कलम २.२ (७) मधील प्रयोजनासाठीच कागदी तिरंगा वापरता येतो. प्लास्टिक तिरंग्याच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये काहीही नमूद नाही. प्लास्टिकच्या तिरंग्याचा वापर करू नये, अशा गृहविभागाच्या सूचना आहेत.अशी लावावी विल्हेवाटखराब झालेले, धूळ लागलेले राष्ट्रध्वज गोणी किंवा कपड्यांमध्ये व्यवस्थित बांधून, शिवून बंद करावे व ते राष्ट्रध्वज सूर्यास्त किंवा सूर्योदयापूर्वी जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक जाळून नष्ट करावेत व पूर्ण जळेपर्यंत सर्वांनी तेथेच उभे राहावे.जिल्हाधिकारी, तहसीलदारांकडे सुपूर्द करावेतराष्ट्रीय सण व राष्ट्रीय कार्यक्रमांसाठी राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. कार्यक्रमानुसार खराब झालेले, माती लागलेले तिरंगेञमैदानात, रस्त्यावर व कार्यक्रमस्थळी पडलेले असतात. हे तिरंगे गोळा करून जिल्हाधिकारी, तहसीलदारांकडे सुपूर्द करण्याचे अधिकार तालुका, जिल्हास्तरावर नेमलेल्या अशासकीय यंत्रणेस देण्यात आले आहेत.व्यावसायिकदृष्ट्या वापर हा अवमानचराष्ट्रध्वजाचा सन्मान एक दिवसासाठी नव्हे, तर निरंतर कायम असणे आवश्यक आहे. राष्ट्रध्वज फाटू नये, वाहनांवर लावल्यानंतर तो उडून जाणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. शाळेत जाताना मुलांच्या हाती प्लास्टिकचा, कागदाचा तिरंगा देऊ नये. राष्ट्रध्वजावर पाणी टाकणे, जमिनीवर पाडणे, फाडणे, जाळणे, त्यावर लिहिणे, व्यावसायिकदृष्ट्या वापर करणे हा राष्ट्रध्वजाचा अवमान समजला जातो. त्यामुळे नागरिकांनी याची विशेष दक्षता बाळगणे गरजेचे आहे.

टॅग्स :National Flagराष्ट्रध्वज