शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शासकीय वसाहतीत नळाच्या पाण्यात नारुसदृश जंतू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 22:45 IST

कांतानगरातील शासकीय वसाहतीमधील सार्वजनिक नळाच्या पाण्यात नारूसदृश जीवजंतू आढळून आल्याने रविवारी सकाळी खळबळ उडाली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार क्षेत्रात असणाऱ्या पाण्याच्या टाकीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणी पुरवठा केला जातो.

ठळक मुद्देआरोग्य धोक्यात : विभागीय आयुक्तांच्या बंगल्यासमोरच टाकी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कांतानगरातील शासकीय वसाहतीमधील सार्वजनिक नळाच्या पाण्यात नारूसदृश जीवजंतू आढळून आल्याने रविवारी सकाळी खळबळ उडाली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार क्षेत्रात असणाऱ्या पाण्याच्या टाकीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणी पुरवठा केला जातो. महापालिका क्षेत्रातील ३३ टक्के पाणीनमूने दूषित आढळून आल्याच्या अनुषंगाने अन्य भागात होणाºया पाणीपुरवठ्यामध्ये नारुसदृश जीव असण्याची शक्यता वाढली आहे.नळाच्या पाण्यात नारू सदृश जीवजंतू आढळणे, ही बाब नागरिकांच्या आरोग्यास धोक्यात आणणारी आहे. कांतानगरात शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचेच वास्तव्य आहे. रविवारी सकाळी आऊट हाऊस परिसरातील सार्वजनिक नळाच्या पाण्यात मोठ्या आकाराचा जीवजंतू दिसताच उपस्थित नागरिक भयभीत झाले. पाच ते सहा महिन्यांपूर्वी नजिकच्या वसाहतीत नळाच्या पाण्यातून नारूसदृष्य जीव निघाला होता. त्यामुळे रविवारी पुन्हा नारुसदृश जीव दिसताच नागरिकांनी त्यास बॉटलीत कैद केले. पाण्याच्या या टाकीवरून अनेकदा दूषित पाणी पुरवठा होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया यावेळी उपस्थितांनी दिली. याासंदर्भात नागरिकांनी मजीप्रा व साबांविभागाकडे तक्रारी नोंदविल्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्या गेल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कांतानगर सारख्या शासकीय वसाहतीत तब्बल अडीचशे क्वार्टर्स आहेत. सुमारे हजार ते दीड हजार नागरिकांना एकाच टाकीवरून पाणी पुरवठा होत असून याशिवाय उच्चपदस्थ अधिकाºयांच्या बंगल्यावरही पाणी पुरवठा होतो. ही बाब गंभीर असून, याकडे प्रशासनाने लक्ष पुरवावे, अशी अपेक्षा नागरिकांनी वर्तविली आहे.कांतानगरातील टाकीपर्यंत मजीप्राकडून पाणी पुरवठा केला जाते. ती टाकी ‘बीएन्डसी’च्या अधिकार क्षेत्रातील असल्याने त्यांच्याकडेच देखभाल आहे. पाण्याचे नमुने घेऊन तपासणीला पाठवू.- किशोर रघुवंशी,उपविभागीय अभियंता, मजीप्रा.पाण्याची टाकी शासकीय वसाहतीत आहे. पाण्यात जीवजंतू आढळल्याची माहिती नाही. मात्र, याबाबत संबधित अधिकाऱ्याला विचारणा करु. सोबतच महापालिकेलाही पत्र देऊ.- सदानंद शेंडगे,कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.दूषित पाण्यात नारू आढळून येतो, नारुसदृश जीवजंतू पाण्याद्वारे पोटात गेल्यास उलटी, अतिसार, काविळ, पोटदुखीसारखे आजार बळावतात. यासाठी पाणी स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.- ऋषिकेश नागलकर, वैद्यकीय अधिकारी, इर्विन