शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय वसाहतीत नळाच्या पाण्यात नारुसदृश जंतू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 22:45 IST

कांतानगरातील शासकीय वसाहतीमधील सार्वजनिक नळाच्या पाण्यात नारूसदृश जीवजंतू आढळून आल्याने रविवारी सकाळी खळबळ उडाली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार क्षेत्रात असणाऱ्या पाण्याच्या टाकीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणी पुरवठा केला जातो.

ठळक मुद्देआरोग्य धोक्यात : विभागीय आयुक्तांच्या बंगल्यासमोरच टाकी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कांतानगरातील शासकीय वसाहतीमधील सार्वजनिक नळाच्या पाण्यात नारूसदृश जीवजंतू आढळून आल्याने रविवारी सकाळी खळबळ उडाली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार क्षेत्रात असणाऱ्या पाण्याच्या टाकीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणी पुरवठा केला जातो. महापालिका क्षेत्रातील ३३ टक्के पाणीनमूने दूषित आढळून आल्याच्या अनुषंगाने अन्य भागात होणाºया पाणीपुरवठ्यामध्ये नारुसदृश जीव असण्याची शक्यता वाढली आहे.नळाच्या पाण्यात नारू सदृश जीवजंतू आढळणे, ही बाब नागरिकांच्या आरोग्यास धोक्यात आणणारी आहे. कांतानगरात शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचेच वास्तव्य आहे. रविवारी सकाळी आऊट हाऊस परिसरातील सार्वजनिक नळाच्या पाण्यात मोठ्या आकाराचा जीवजंतू दिसताच उपस्थित नागरिक भयभीत झाले. पाच ते सहा महिन्यांपूर्वी नजिकच्या वसाहतीत नळाच्या पाण्यातून नारूसदृष्य जीव निघाला होता. त्यामुळे रविवारी पुन्हा नारुसदृश जीव दिसताच नागरिकांनी त्यास बॉटलीत कैद केले. पाण्याच्या या टाकीवरून अनेकदा दूषित पाणी पुरवठा होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया यावेळी उपस्थितांनी दिली. याासंदर्भात नागरिकांनी मजीप्रा व साबांविभागाकडे तक्रारी नोंदविल्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्या गेल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कांतानगर सारख्या शासकीय वसाहतीत तब्बल अडीचशे क्वार्टर्स आहेत. सुमारे हजार ते दीड हजार नागरिकांना एकाच टाकीवरून पाणी पुरवठा होत असून याशिवाय उच्चपदस्थ अधिकाºयांच्या बंगल्यावरही पाणी पुरवठा होतो. ही बाब गंभीर असून, याकडे प्रशासनाने लक्ष पुरवावे, अशी अपेक्षा नागरिकांनी वर्तविली आहे.कांतानगरातील टाकीपर्यंत मजीप्राकडून पाणी पुरवठा केला जाते. ती टाकी ‘बीएन्डसी’च्या अधिकार क्षेत्रातील असल्याने त्यांच्याकडेच देखभाल आहे. पाण्याचे नमुने घेऊन तपासणीला पाठवू.- किशोर रघुवंशी,उपविभागीय अभियंता, मजीप्रा.पाण्याची टाकी शासकीय वसाहतीत आहे. पाण्यात जीवजंतू आढळल्याची माहिती नाही. मात्र, याबाबत संबधित अधिकाऱ्याला विचारणा करु. सोबतच महापालिकेलाही पत्र देऊ.- सदानंद शेंडगे,कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.दूषित पाण्यात नारू आढळून येतो, नारुसदृश जीवजंतू पाण्याद्वारे पोटात गेल्यास उलटी, अतिसार, काविळ, पोटदुखीसारखे आजार बळावतात. यासाठी पाणी स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.- ऋषिकेश नागलकर, वैद्यकीय अधिकारी, इर्विन