शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

विडा घ्या हो नारायणा ! पानशौकिनांचे गाव

By admin | Updated: August 2, 2015 00:32 IST

शहरात अंदाजे दोनशे पान टपऱ्या असून बेरोजगारांना दररोजची रोजी रोटी उपलब्ध करुन देणारा हा हक्काचा व्यवसाय आहे.

अंजनगाव सुर्जी : शहरात अंदाजे दोनशे पान टपऱ्या असून बेरोजगारांना दररोजची रोजी रोटी उपलब्ध करुन देणारा हा हक्काचा व्यवसाय आहे. अंजनगाव परिसरात पूर्वी संपन्न पानमळे होते व शेकडो एकरावर लागवड होती. सध्या पान मळ्यांची संख्या शंभर एकरांच्या आत झाली आहे. पण पानमळे कमी झाले तरी या गावात पान शौकिनांची संख्या कमी नाही. अवघ्या पाच रुपयात मनपसंद पान देणारे अंजनगावचे पानटपरी धारक आपआपल्या परीने ग्राहकांचे समाधान करतात.यापूर्वी संपन्न पान मळ्यामुळे पानांची किंमतही स्वस्त होती. अवघ्या दहा पैशात पंचवीस वर्षांपूर्वी येथे पान खायला मिळत होते. काळाच्या ओघात महागाई वाढली तरीही इतर शहरांच्या तुलनेत स्वस्तात पान देण्याची परंपरा आजही कायम आहे. दोन रुपयांच्या साध्या पानापासून तर दहा रुपयांच्या मसाला पट्टी पान पर्यंत ग्राहकांच्या मागणीनुसार सजविलेले पान येथे उपलब्ध आहे. दोनशेवर बेरोजगारांना रोजगार मिळवून देणाऱ्या या व्यवसायात काही निवडक जागी एक्कावण्ण रुपयांचे मधुचंद्र पानसुध्दा मिळते. बदलत्या जीवनशैलीनुसार काही पानटपऱ्या ग्राहकांच्या सोयीनुसार त्यांना थंडपेयासह सर्व काही पुरवितात. पान स्वस्त असल्यामुळे नेहमीच्या प्रवासातील ग्राहकवर्ग येथे आवर्जून थांबतो. प्रामुख्याने प्रवासी वाहतूक व्यवसायाचे ग्राहक मोठ्या प्रमाणावर पानाचा आस्वाद घेतात. शहरातील रहिवाश्यांचीही पान शौकीन प्रतिमा या व्यवसायाला जिवंत ठेवला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या पान विक्रीच्या मंडईमुळे या भागाला पानअटाई या नावाने ओळखतात. पानांचे उत्पादन स्थानिक परिसरात रोडवले तरी इतर राज्यांतून दररोज पानांचे पेटारे या ठिकाणी येतात. खुल्या पानांच्या खरेदी- विक्रीचा हा सर्व व्यवसाय पानअटाई येथे बारी समाजातील महिला वर्ग सांभाळतात, हे या व्यवसायाचे वैशिष्ट्ये आहे. पान मळ्यांना स्थानिक भाषेत पानतांडे असे म्हणतात. शे-सव्वाशे पान वेलांचे वाफे असले तर त्याला कणंग म्हणतात. पानाच्या वेलीला नागवेली म्हणतात. नागवेलीचे पान दानवांच्या समुद्र मंथनातून बाहेर आले, अशी आख्यायिका आहे.