शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

कर्जमाफीच्या प्रमाणपत्रानंतर दोन महिन्यांनी यादीत नावे, दिवाळीच्या पूर्वसंध्येला पालकमंत्र्यांनी केला होता सत्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2017 16:41 IST

दिवाळीच्या पूर्वसंध्येला पालकमंत्र्यांच्या हस्ते कर्जमाफी प्रमाणपत्र देऊन सत्कार केलेल्या ३३ पैकी जेमतेम २४ शेतकऱ्यांची नावे शुक्रवारी तात्पुरत्या पात्र लाभार्थी यादीत आली. त्यांच्या कर्जखात्यात आता कुठे रक्कम जमा होणार आहे.

- गजानन मोहोडअमरावती- दिवाळीच्या पूर्वसंध्येला पालकमंत्र्यांच्या हस्ते कर्जमाफी प्रमाणपत्र देऊन सत्कार केलेल्या ३३ पैकी जेमतेम २४ शेतकऱ्यांची नावे शुक्रवारी तात्पुरत्या पात्र लाभार्थी यादीत आली. त्यांच्या कर्जखात्यात आता कुठे रक्कम जमा होणार आहे. अशा स्थितीमुळे आम्हाला किती प्रतीक्षा करावी लागणार, असा सवाल कर्जमाफीकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांनी केला आहे.

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याचे आश्वासन शासनाने अद्याप पूर्ण केले नाही. दरम्यान, सहकार विभागाला वेठीस धरून प्रत्येक जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांची यादी केली. यापैकी एकाचा मुंबई येथे सह्याद्री अतिथिगृहात दिवाळीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व उर्वरित शेतकऱ्यांचा जिल्हास्तरावर संबंधित पालकमंत्र्यांच्या हस्ते कर्जमाफीचे प्रमाणपत्र व शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. अमरावती जिल्ह्यात सत्कार झालेल्या ३३ पैकी २४ शेतकऱ्यांची नावे शुक्रवारी यादीत आली असल्याने त्यांच्या खात्यावर आता बँकेमार्फत कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येणार आहे.

आता योजनेच्या निकषात बदल केले आहेत. त्यानुसार आता दीड लाखांपर्यंत कर्जमाफी किंवा २५ हजारांपर्यंत प्रोत्साहन अनुदान यापैकी एकाचाच लाभ मिळणार आहे. प्रोत्साहन अनुदान मात्र पती व पत्नी या दोघांनाही मिळणार आहे. शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत कुटुंबातील एकच व्यक्ती कर्जमाफीसाठी पात्र असेल, असे यापूर्वी जाहीर केले होते. आता मात्र यामध्ये अंशत: बदल केला. मुद्दल व व्याजासह दीड लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना समझोता योजना (ओटीएस) नुसार ३० जून २०१६ रोजी थकबाकी रकमेतून बँकांना परतफेड केल्यानंतर  ही रक्कम वगळून ३१ जुलै २०१७ पर्यंत मुद्दल व व्याजासह परतफेड न झालेली थकबाकी दीड लाखांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी पात्र आहे. मात्र, पात्र लाभार्थ्यांनी त्यांची थकबाकी ३१ मार्च २०१८ पर्यंत बँकांमध्ये जमा केल्यानंतर त्या लाभार्थी शेतकऱ्यास दीड लाखांपर्यत कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे.

कर्जमाफीच्या निकषात अंशत: बदलसन २०१५-१६ या वर्षात घेतलेल्या कर्जाची परतफेड ३१ जुलै २०१७ पर्यत केली असल्यास, अशा शेतकऱ्यांना २०१५-१६ या कालावधीसाठी पीक कर्जाच्या २५ टक्के किंवा २५ हजारापर्यंत यापैकी जी रक्कम कमी असेल, ती शासनाकडून मिळणार आहे. ही रक्कम १५ हजारांपेक्षा कमी असल्यास  संपूर्ण रक्कम शेतकºयांना परत केली जाईल. सन २०१६-१७ या कालावधीतील पीक कर्जाचा देय दिनांक ३१ जुलै २०१७ नंतर असल्यास, अशा लाभार्थींना परतफेडीवर याच स्वरूपाचा कर्जमाफीचा लाभ देण्यात येईल, असा सुधारित बदल सहकार विभागाने केला.