शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीच्या प्रमाणपत्रानंतर दोन महिन्यांनी यादीत नावे, दिवाळीच्या पूर्वसंध्येला पालकमंत्र्यांनी केला होता सत्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2017 16:41 IST

दिवाळीच्या पूर्वसंध्येला पालकमंत्र्यांच्या हस्ते कर्जमाफी प्रमाणपत्र देऊन सत्कार केलेल्या ३३ पैकी जेमतेम २४ शेतकऱ्यांची नावे शुक्रवारी तात्पुरत्या पात्र लाभार्थी यादीत आली. त्यांच्या कर्जखात्यात आता कुठे रक्कम जमा होणार आहे.

- गजानन मोहोडअमरावती- दिवाळीच्या पूर्वसंध्येला पालकमंत्र्यांच्या हस्ते कर्जमाफी प्रमाणपत्र देऊन सत्कार केलेल्या ३३ पैकी जेमतेम २४ शेतकऱ्यांची नावे शुक्रवारी तात्पुरत्या पात्र लाभार्थी यादीत आली. त्यांच्या कर्जखात्यात आता कुठे रक्कम जमा होणार आहे. अशा स्थितीमुळे आम्हाला किती प्रतीक्षा करावी लागणार, असा सवाल कर्जमाफीकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांनी केला आहे.

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याचे आश्वासन शासनाने अद्याप पूर्ण केले नाही. दरम्यान, सहकार विभागाला वेठीस धरून प्रत्येक जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांची यादी केली. यापैकी एकाचा मुंबई येथे सह्याद्री अतिथिगृहात दिवाळीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व उर्वरित शेतकऱ्यांचा जिल्हास्तरावर संबंधित पालकमंत्र्यांच्या हस्ते कर्जमाफीचे प्रमाणपत्र व शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. अमरावती जिल्ह्यात सत्कार झालेल्या ३३ पैकी २४ शेतकऱ्यांची नावे शुक्रवारी यादीत आली असल्याने त्यांच्या खात्यावर आता बँकेमार्फत कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येणार आहे.

आता योजनेच्या निकषात बदल केले आहेत. त्यानुसार आता दीड लाखांपर्यंत कर्जमाफी किंवा २५ हजारांपर्यंत प्रोत्साहन अनुदान यापैकी एकाचाच लाभ मिळणार आहे. प्रोत्साहन अनुदान मात्र पती व पत्नी या दोघांनाही मिळणार आहे. शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत कुटुंबातील एकच व्यक्ती कर्जमाफीसाठी पात्र असेल, असे यापूर्वी जाहीर केले होते. आता मात्र यामध्ये अंशत: बदल केला. मुद्दल व व्याजासह दीड लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना समझोता योजना (ओटीएस) नुसार ३० जून २०१६ रोजी थकबाकी रकमेतून बँकांना परतफेड केल्यानंतर  ही रक्कम वगळून ३१ जुलै २०१७ पर्यंत मुद्दल व व्याजासह परतफेड न झालेली थकबाकी दीड लाखांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी पात्र आहे. मात्र, पात्र लाभार्थ्यांनी त्यांची थकबाकी ३१ मार्च २०१८ पर्यंत बँकांमध्ये जमा केल्यानंतर त्या लाभार्थी शेतकऱ्यास दीड लाखांपर्यत कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे.

कर्जमाफीच्या निकषात अंशत: बदलसन २०१५-१६ या वर्षात घेतलेल्या कर्जाची परतफेड ३१ जुलै २०१७ पर्यत केली असल्यास, अशा शेतकऱ्यांना २०१५-१६ या कालावधीसाठी पीक कर्जाच्या २५ टक्के किंवा २५ हजारापर्यंत यापैकी जी रक्कम कमी असेल, ती शासनाकडून मिळणार आहे. ही रक्कम १५ हजारांपेक्षा कमी असल्यास  संपूर्ण रक्कम शेतकºयांना परत केली जाईल. सन २०१६-१७ या कालावधीतील पीक कर्जाचा देय दिनांक ३१ जुलै २०१७ नंतर असल्यास, अशा लाभार्थींना परतफेडीवर याच स्वरूपाचा कर्जमाफीचा लाभ देण्यात येईल, असा सुधारित बदल सहकार विभागाने केला.