शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग होणार खड्डेमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:23 IST

पान २ चे लिड मोहन राऊत धामणगाव रेल्वे : सर्वाधिक खड्ड्यांमुळे अपघातप्रवण झालेल्या नागपूर- औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती ...

पान २ चे लिड

मोहन राऊत

धामणगाव रेल्वे : सर्वाधिक खड्ड्यांमुळे अपघातप्रवण झालेल्या नागपूर- औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती केली जाणार आहे. त्या कामाची जबाबदारी भारतीय राज्य महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) कडे सोपविण्यात आली आहे. या २८५ किलोमीटरच्या रस्ता दुरुस्तीकरिता ८४.१५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

नागपूर-औरंगाबाद-सिन्नर-घोटी-मुंबई या ७५३-सी राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती १८ वर्षांपूर्वी रस्ते विकास महामंडळाने केली. त्यानंतर शासनाने दोन वर्षांपूर्वी या महामार्गाच्या दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली होती. एकीकडे नागपूरहून मुंबईला जाणारा नागपूर-मुंबई क्रमांक ६ हा राष्ट्रीय महामार्ग अमरावती अकोला खामगाव पर्यंत अद्यापही नादुरुस्त आहे. त्यात रस्त्याने टोल अधिक पडत असल्यामुळे सर्वाधिक जड वाहतूक ही नागपूर-औरंगाबाद या महामार्गााने होते, नव्हे तर ती या मार्गाने वळविली गेली. त्यामुळे रस्त्यावर अधिक खड्डे पडले. त्या खड्ड्यांमुळे अपघातात वाढ झाली. आतापर्यंत दीडशेच्या आसपास लोकांना खड्डा चुकवताना झालेल्या अपघातात प्राण गमवावे लागले. या रस्त्यावरील वाढत्या अपघातांमुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी हा महामार्ग भारतीय राज्य महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे सोपविला आहे.

रस्त्याची संपूर्ण डागडुजी

भारतीय राज्य महामार्ग प्राधिकरणाने मंजूर ८४.१५ कोटी रुपयांत जालना ते पुलगाव अशा २८५ किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्ती कामाला सुरुवात केली आहे. खड्ड्यामुळे अनेक दिवसांपासून बंद असलेल्या मेहकर ते लोणार या कामाला युद्धस्तरावर सुरुवात झाली. अमरावती जिल्ह्यातील ३४ किलोमीटरचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विशेष प्रकल्प विभागाने एक वर्षांपूर्वी पूर्ण केले आहे. मात्र, त्याव्यतिरिक्त खड्डे असल्याने भारतीय राज्य महामार्ग प्राधिकरण दुसऱ्या टप्प्यात पुढील आठवड्यात जिल्ह्यातील कामाला सुरुवात करणार असल्याचे प्राधिकरण विभागाने सांगितले.

१२५ पुलांचे होणार ऑडिट

अठरा वर्षांपूर्वी बांधलेल्या नागपूर-औरंगाबाद या मार्गावरील काही ठिकाणी पुलांची स्थिती दयनीय आहे. त्यामुळे या महामार्गावरील १२५ पुलांची स्थिती पाहण्यासाठी एक पथक नुकतेच या मार्गावर येऊन पाहणी करून गेले. सर्व पुलांचे ऑडिट करण्यात येणार करून, त्याबाबतचा अहवाल शासनाला दिला जाणार आहे.

कोट

जालना ते पुलगाव या २८५ किलोमीटरच्या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात अमरावती जिल्ह्यातील रस्त्याची दुरुस्ती करून हा मार्ग खड्डेमुक्त करण्यात येणार आहे. दरम्यान, पुलाच्या ऑडिटलाही गती आली आहे.

बी. एम. कसबे

उपविभागीय अभियंता

भारतीय राज्य महामार्ग प्राधिकरण

-------------