शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
2
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
4
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
5
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
6
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
7
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
8
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
9
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
10
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
11
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
12
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
13
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
14
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
15
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
16
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
17
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
18
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
19
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
20
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!

रेड्डी म्हणतात, माझी बदली नैसर्गिक न्यायतत्त्वाने नाही, वनखात्याला दिले चॅलेंज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:07 IST

राजाच्या अतिरक्त सचिवांच्या जोरावर मुजोरी, मार्च एन्डला बदली रोखण्याची कसरत अमरावती : राज्य सेवेतील एका अतिरिक्त मुख्य सचिवांच्या जोरावर ...

राजाच्या अतिरक्त सचिवांच्या जोरावर मुजोरी, मार्च एन्डला बदली रोखण्याची कसरत

अमरावती : राज्य सेवेतील एका अतिरिक्त मुख्य सचिवांच्या जोरावर मेळघाट व्याघ्र प्रकल्पासह पश्चिम विदर्भातील अभयारण्य काबीज करणारे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांनी नागपूर येथे मुख्यालयात झालेली बदली रद्द करण्यासाठी राज्याच्या वनखात्याला पत्र लिहून चॅलेंज केले आहे. माझी कोणत्याही प्रकारे चौकशी न करता तडकाफडकी बदली करणे, हे नैसर्गिक न्यायतत्त्वानुसार नाही. याबाबत पुनर्विचार करून बदली रद्द करावी, असे रेड्डी यांनी पत्रात म्हटले आहे. त्यामुळे बदलीला चॅलेंज करणारे रेड्डी हे आयएफएस लॉबीला जुमानत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी सुसाईड नोटनुसार एम.एस. रेड्डी यांच्यावरही संशयाची सुई वळली आहे. परिणामी राज्याच्या वन मंत्रालयातील मुख्य वनसंरक्षक अरविंद आपटे यांनी २६ मार्च रोजी रेड्डी यांची अमरावती अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक पदावरून नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) यांच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेशित केले आहे. परंतु, रेड्डी यांना मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून बदली नको आहे. मार्च एन्डला बदली कशी, याबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे रेड्डी यांनी २७ मार्च रोजी पत्राद्धारे नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) पी. साईप्रसाद यांना बदलीसंदर्भात पुनर्विचार करावा, असे नमूद केले आहे.

गत पाच वर्षांपासून एम. एस. रेड्डी हे सन २००७ ते २००९ पर्यंत अकोट वन्यजीव विभागात उपवनसंरक्षक पदावर रुजू झाले. त्यानंतर त्यांची पेंच व्याघ्र प्रकल्पात बदली झाली. मुख्य वनसंरक्षकपदी बढती मिळाल्यानंतर सन २०१७ मध्ये रेड्डी हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालकपदी रुजू झाले. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालकपद हे राज्यातील इतर पाच व्याघ्र प्रकल्पांप्रमाणे मुख्य वनसंरक्षक दर्जाचे आहे. गत पाच वर्षांत रेड्डी यांनी पश्चिम विदर्भातील अभयारण्य काबीज केले. आता अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक पदावर बढती मिळाल्यानंतरही नागपूर, पुणे, मुंबई येथे न जाता राज्यातील अन्य आयएफएस लॉबीला चॅलेंज करून अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकपद अमरावती येथे निर्माण करून घेतले. बढती झाल्यानंतरही मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा मोह त्यांना दूर करू शकला नाही, हे स्पष्ट होते. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक पद हे राज्यस्तरावरील आहे. मात्र, केंद्र व राज्य शासनाची परवानगी न घेता मंत्रालयातील अतिरिक्त मुख्य सचिवांच्या बळावर अमरावती विभाग स्तरावर हे पद निर्माण करण्याची किमया रेड्डी यांनी केली आहे.

----------------

बदलीला विरोध का?

गत पाच वर्षांपासून एम. एस. रेड्डी यांना व्याघ्र प्रकल्प, अभयारण्यातील खडान्‌खडा माहिती आहे. वनसंवर्धन अधिनियम १९८० च्या कायद्याचा रेड्डी भंग केला आहे. केंद्र व राज्य सरकारची कोणतीही परवानगी न घेता जेसीबी व अन्य यंत्राच्या साह्याने मेळघाट व्याघ्र प्रकल्प, कारंजाचे सोहळ अभयारण्य, लोणार सरोवर, बुलडाणा येथील ज्ञानगंगा, यवतमाळचे टीपेश्वर, अकोला येथील पैनगंगा या अभयारण्यात वनसंवर्धनाचा फज्जा उडवीत पर्यटनाच्या नावाखाली संरक्षित क्षेत्रात जेसीबीने रस्ते, इमारती उभ्या केल्या आहेत. याप्रकरणाची चौकशी होऊ नये, यासाठी रेड्डी हे बदलीला विरोध करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.