शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
4
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
5
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
6
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
7
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
8
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
9
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
10
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
11
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
12
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
13
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
14
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
15
Gold Rates 13 May : एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
16
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
17
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
18
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
19
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
20
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?

हद्दीलगतची गावे लवकरच महापालिकेत

By admin | Updated: March 28, 2017 02:48 IST

हद्दीलगतच्या ३४ गावांत मोठ्या प्रमाणात अवैध बांधकामे झाली आहेत. त्यामुळे तेथील कचरा, रस्ते, पाणी हे प्रश्न

धायरी : हद्दीलगतच्या ३४ गावांत मोठ्या प्रमाणात अवैध बांधकामे झाली आहेत. त्यामुळे तेथील कचरा, रस्ते, पाणी हे प्रश्न सोडविण्यासाठी ही गावे महापालिकेत यावीत, यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असे प्रतिपादन खडकवासलाचे आमदार भीमराव तापकीर यांनी केले. हद्दीलगतच्या ३४ गावांतील अवैध बांधकामे पाडण्यासाठी पीएमआरडीएने कठोर पावले उचलली आहेत. अनेक बांधकाम व्यावसायिक व घरमालकांना नोटिसा देण्यात आल्याने चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर येथील दत्तकृष्णाई मंगल कार्यालयात भाजपातर्फे बांधकाम व्यावसायिक व नागरिकांचा सर्वपक्षीय मेळावा आयोजिण्यात आला. त्या वेळी तापकीर बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्या जयश्री पोकळे, जयश्री भूमकर, पंचायत समिती सदस्या वैशाली पोकळे, फुलाबाई कदम, नगरसेवक हरिदास चरवड, राजाभाऊ लायगुडे, नीता दांगट, राजश्री नवले, बाळासाहेब नवले, बाळासाहेब पोकळे, खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष अरुण राजवांडे, अरुण दांगट, बाळासाहेब जाधव, सचिन चव्हाण, विशाल कदम, दामोधर बांदल, रुपेश घुले व संयोजक गंगाधर भडावळे, किशोर पोकळे आदी उपस्थित होते. मेळाव्यात परिसरात बांधकाम व्यावसायिक व गुंठा दोन गुंठ्यांत घरे बांधलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पीएमआरडीएने पाठवलेल्या नोटिसांना कायदेशीरपणे उत्तर द्यावे लागेल व ही कामे नियमित कशी करता येतील, यासाठी सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात येईल, असे तापकीर यांनी सांगितले. नगरसेवक हरिदास चरवड म्हणाले, की ३४ गावांतील ही बांधकामे अवैध नाहीत. ग्रामपंचायतीच्या परवानगीनेच ही बांधकामे झाली आहेत. आता ही गावे पीएमआरडीएच्या अखत्यारित असल्याने ही कामे अवैध ठरवली जात आहेत. त्याविरुद्ध कायदेशीर मार्गाने दंड भरून ही कामे नियमित करण्यासाठी प्रयत्न केला जाईल, मात्र यापुढे अवैध कामे होणार नाहीत, याचीही आपणाला काळजी घ्यावी लागेल. राजाभाऊ लायगुडे यांनीही हा प्रश्न मनापासून हद्दीत ही गावे घेऊन सोडवता येऊ शकेल. त्यासाठी पाठपुरावा करू, असे सांगितले. राजवाडे यांनी बांधकाम नियमित करण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला. (वार्ताहर)नागरी सुविधाही हव्यातअवैध बांधकामांमुळे नाही, तर नागरी सुविधांसाठी ही ३४ गावे मनपा हद्दीत यावीत, यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर लवकरच निर्णय शासनाला घ्यावा लागेल. त्यामुळे अवैध बांधकामाचाही प्रश्न सुटेल, यासाठी आमचा लढा सुरूच राहील, अशी प्रतिक्रिया हवेली तालुका नागरी कृती समितीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण-पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.