शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
4
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
5
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
6
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
7
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
8
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
9
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
10
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
11
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
12
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
13
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
14
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
15
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
16
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
17
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
18
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
19
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
20
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!

महापालिकेत ८० कोटींचा अपहार!

By admin | Updated: April 19, 2015 00:10 IST

महापालिकेत गेल्या दोन वर्षांत शासन अनुदान, करातून येणाऱ्या रकमेची उधळपट्टी करुन निकृष्ट दर्जाची विकासकामे करण्यात आली आहेत.

पत्रपरिषद : सुनील देशमुख यांचा आरोप, शासन अनुदानाची उधळपट्टीअमरावती : महापालिकेत गेल्या दोन वर्षांत शासन अनुदान, करातून येणाऱ्या रकमेची उधळपट्टी करुन निकृष्ट दर्जाची विकासकामे करण्यात आली आहेत. यात सुमारे ८० कोटी रुपयांचा अपहार झाला आहे. यासाठी अभियंते, कंत्राटदार आणि अधिकारी दोषी आहेत. गुणवत्ता पडताळणीच्या अहवालानुसार ही बाब स्पष्ट झाल्यामुळे दोषींवर आता थेट कारवाई अपेक्षित आहे. तसे न झाल्यास सिव्हील कोर्टात जाऊन फौजदारी दाखल करु, असा इशारा आ. सुनील देशमुख यांनी शनिवारी येथे दिला.येथील एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. आ. देशमुखांनी केलेल्या आरोपानुसार विधानसभा निवडणुकीच्या काळात प्रचारदरम्यान फिरत असताना झालेल्या विकासकामांबाबत नागरिकांनी त्यांच्याकडे अनेक तक्रारी केल्यात. रस्ते निर्मिती, डांबरीकरण, सिमेंट, काँक्रीटीकरणाच्या विविध कामांमध्ये अतिशय निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले गेले. रस्ते निर्मिती, डांबरीकरणाच्या कामात तर प्रचंड घोटाळे झाल्याचा आरोप यावेळी देशमुखांनी केला. निवडणुकीच्या निकालानंतर जी कामे झालीत, त्या कामांची गुणवत्ता तपासणी करण्याचे ठरविले. तत्कालीन आयुक्तांच्या नावे पत्र देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दक्षता व गुण नियंत्रण मंडळाकडून प्रायोगिक तत्त्वावर १० रस्त्यांची गुणवत्ता तपासण्याचे शुल्क भरण्यात आले. बेलोरा विमानतळ, इर्विन, वाहतुकीवरही चर्चानिवडणुकीनंतर पहिल्यांदाच पत्रपरिषद घेऊन शहराच्या विकासात्मक विषयांवर जाहीरपणे मत प्रदर्शित करणाऱ्या आ. सुनील देशमुखांनी बेलोरा विमानतळ, जिल्हा सामान्य रुग्णालय, वाहतूक समस्येवरही चर्चा केली. बेलोरा विमातळाचा प्रश्न सोडविण्यासाठी २३ व २४ एप्रिल रोजी सर्वच आमदारांची बैठक होऊ घातली आहे. मुंबईकडे ये-जा करण्यासाठी विमानसेवा सुरु करण्यावर भर दिला जाणार आहे. इर्विन रुग्णालयात सिटी स्कॅन मशीन, एमआयआरची उपलब्धता तसेच वाहतूक समस्या सोडविण्यासाठी तत्पर राहू, असे आ. देशमुख म्हणाले. विद्यापीठ गुणवाढ प्रकरणी खरा सूत्रधार पोलिसांनी पुढे आणला पाहिजे, असेही ते म्हणाले.विकास कामांना दर्जा असलाच पाहिजे. यापूर्वी माझ्या प्रभागातील गोपालनगर ते एमआयडीसी रस्त्याच्या निकृष्ट बांधकामाची तक्रार प्रशासनाकडे स्वत: दिली होती. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही. आ. देशमुखांनी उचललेले पाऊल नागरिकांच्या हिताचेच आहे.-चरणजितकौर नंदा, महापौर, महापालिका.शासन निधीतील कामांची चौकशी झालीच पाहिजे. दोषींना कठोर शिक्षा व्हावी. गुणवत्ता तपासणीमुळे मस्तवाल कंत्राटदारांना वठणीवर आणता येईल. अधिकारी, कंत्राटदारांच्या मनमानी कारभारावर अंकुश लावणे सोयीचे होईल. आ. देशमुखांचे पाऊल स्वागतार्हच म्हणावे लागेल. -बबलू शेखावत, पक्षनेता, काँग्रेस.