शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

महापालिकेत ८० कोटींचा अपहार!

By admin | Updated: April 19, 2015 00:10 IST

महापालिकेत गेल्या दोन वर्षांत शासन अनुदान, करातून येणाऱ्या रकमेची उधळपट्टी करुन निकृष्ट दर्जाची विकासकामे करण्यात आली आहेत.

पत्रपरिषद : सुनील देशमुख यांचा आरोप, शासन अनुदानाची उधळपट्टीअमरावती : महापालिकेत गेल्या दोन वर्षांत शासन अनुदान, करातून येणाऱ्या रकमेची उधळपट्टी करुन निकृष्ट दर्जाची विकासकामे करण्यात आली आहेत. यात सुमारे ८० कोटी रुपयांचा अपहार झाला आहे. यासाठी अभियंते, कंत्राटदार आणि अधिकारी दोषी आहेत. गुणवत्ता पडताळणीच्या अहवालानुसार ही बाब स्पष्ट झाल्यामुळे दोषींवर आता थेट कारवाई अपेक्षित आहे. तसे न झाल्यास सिव्हील कोर्टात जाऊन फौजदारी दाखल करु, असा इशारा आ. सुनील देशमुख यांनी शनिवारी येथे दिला.येथील एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. आ. देशमुखांनी केलेल्या आरोपानुसार विधानसभा निवडणुकीच्या काळात प्रचारदरम्यान फिरत असताना झालेल्या विकासकामांबाबत नागरिकांनी त्यांच्याकडे अनेक तक्रारी केल्यात. रस्ते निर्मिती, डांबरीकरण, सिमेंट, काँक्रीटीकरणाच्या विविध कामांमध्ये अतिशय निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले गेले. रस्ते निर्मिती, डांबरीकरणाच्या कामात तर प्रचंड घोटाळे झाल्याचा आरोप यावेळी देशमुखांनी केला. निवडणुकीच्या निकालानंतर जी कामे झालीत, त्या कामांची गुणवत्ता तपासणी करण्याचे ठरविले. तत्कालीन आयुक्तांच्या नावे पत्र देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दक्षता व गुण नियंत्रण मंडळाकडून प्रायोगिक तत्त्वावर १० रस्त्यांची गुणवत्ता तपासण्याचे शुल्क भरण्यात आले. बेलोरा विमानतळ, इर्विन, वाहतुकीवरही चर्चानिवडणुकीनंतर पहिल्यांदाच पत्रपरिषद घेऊन शहराच्या विकासात्मक विषयांवर जाहीरपणे मत प्रदर्शित करणाऱ्या आ. सुनील देशमुखांनी बेलोरा विमानतळ, जिल्हा सामान्य रुग्णालय, वाहतूक समस्येवरही चर्चा केली. बेलोरा विमातळाचा प्रश्न सोडविण्यासाठी २३ व २४ एप्रिल रोजी सर्वच आमदारांची बैठक होऊ घातली आहे. मुंबईकडे ये-जा करण्यासाठी विमानसेवा सुरु करण्यावर भर दिला जाणार आहे. इर्विन रुग्णालयात सिटी स्कॅन मशीन, एमआयआरची उपलब्धता तसेच वाहतूक समस्या सोडविण्यासाठी तत्पर राहू, असे आ. देशमुख म्हणाले. विद्यापीठ गुणवाढ प्रकरणी खरा सूत्रधार पोलिसांनी पुढे आणला पाहिजे, असेही ते म्हणाले.विकास कामांना दर्जा असलाच पाहिजे. यापूर्वी माझ्या प्रभागातील गोपालनगर ते एमआयडीसी रस्त्याच्या निकृष्ट बांधकामाची तक्रार प्रशासनाकडे स्वत: दिली होती. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही. आ. देशमुखांनी उचललेले पाऊल नागरिकांच्या हिताचेच आहे.-चरणजितकौर नंदा, महापौर, महापालिका.शासन निधीतील कामांची चौकशी झालीच पाहिजे. दोषींना कठोर शिक्षा व्हावी. गुणवत्ता तपासणीमुळे मस्तवाल कंत्राटदारांना वठणीवर आणता येईल. अधिकारी, कंत्राटदारांच्या मनमानी कारभारावर अंकुश लावणे सोयीचे होईल. आ. देशमुखांचे पाऊल स्वागतार्हच म्हणावे लागेल. -बबलू शेखावत, पक्षनेता, काँग्रेस.