शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

बाजार समित्यांमध्ये मुगाचे मातेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 21:58 IST

मुगाच्या हंगामाला या आठवड्यात सुरुवात झाली. अडचणीतील शेतकºयांनी बाजार समित्यांमध्ये मूग विकायला आणला. मात्र, हमीभाव ६,९७५ रुपये प्रतिक्विंटल असताना चार हजार रुपये दर व्यापारी देत आहेत. याप्रकरणी किती व्यापाºयांवर कारवाई केली अन् हेच का अच्छे दिन, असा शेतकºयांचा सवाल आहे.

ठळक मुद्देहमीपेक्षा तीन हजारांनी कमी : हेच का अच्छे दिन? शेतकऱ्यांचा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मुगाच्या हंगामाला या आठवड्यात सुरुवात झाली. अडचणीतील शेतकºयांनी बाजार समित्यांमध्ये मूग विकायला आणला. मात्र, हमीभाव ६,९७५ रुपये प्रतिक्विंटल असताना चार हजार रुपये दर व्यापारी देत आहेत. याप्रकरणी किती व्यापाºयांवर कारवाई केली अन् हेच का अच्छे दिन, असा शेतकºयांचा सवाल आहे.यंदाच्या हंगामात खरिपाचा पाऊस उशिरा आल्यामुळे दोन महिने कालावधीच्या मूग व उडदाचे पेरणीक्षेत्र कमी झाले. पीक फुलोऱ्यावर आल्यावर व शेंगा भरण्याच्या वेळी पावसाने दडी मारल्याने सरासरी उत्पादन घटले. बँका कर्ज नाकारत असल्यामुळे अडचणीतील शेतकºयांनी मूग बाजारात विक्रीसाठी आणला असता, व्यापाºयांनी भाव पाडले आहत. यंदाच्या खरिपासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाद्वारा ११ जुलै रोजी मुगाला ६,९७५ रुपये हमीभाव जाहीर केला. त्यापेक्षा कमी दर अपेक्षित नसताना प्रत्यक्षात बाजार समित्यांमध्ये ३८०० ते ४३०० रुपये यादरम्यान भाव बाजार समितीत मिळत आहे.यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस असल्यामुळे मुगाचे सरसरी एकरी दोन क्विंटल उत्पादन झाले. यामध्ये पेरणी, बियाणे, खत, निंदन , डवरणी, सोंगणी व काढणीचा खर्च गृहीत धरता, उत्पादनखर्चाच्या निम्मे रक्कमदेखील शेतकºयांच्या हाती पडत नसल्यामुळे तो आर्थिक संकटात सापडला आहे. बाजार समित्यांमध्ये आता मुगाची आवक वाढल्याने व्यापाऱ्यांनी भाव पाडले. याला बाजार समिती संचालक मंडळासह जिल्हा उपनिबंधकांचा अटकाव नसल्यामुळे व्यापारी शिरजोर झाले आहेत.उत्पादनात घट, भाव कमीयंदाच्या खरिपात जिल्ह्यात २२ हजार ३०० हेक्टर मुगाचे क्षेत्र आहे. यामध्येही १८ हजार हेक्टर क्षेत्र एकट्या दर्यापूर तालुक्यात आहे. त्यामुळे यंदा मुगाच्या उत्पादनात घट होणार, हे वास्तव आहे. मागणी जास्त आणि उत्पादनात घट यामुळे भाववाढ अपेक्षित असताना हमीभावापेक्षा तीन हजार रूपयांनी मुगाची विक्री होत आहे. अमरावती बाजार समितीमध्ये ३५०० ते ५००० या भावाने मंगळवारी मुगाची खरेदी झाली.शासकीय खरेदी केव्हा?बाजार समित्यांमध्ये हमीभावाच्या आत शेतमाल विकला जात असेल, तर शासनाद्वारे आधारभूत किमतीने शेतमालाची खरेदी होते. यंदा मूग बाजारात हमीभावापेक्षा तीन हजार रुपये कमी दराने विकला जात आहे. त्यामुळे नाफेडद्वारे खरेदीची प्रतीक्षा आहे. मात्र, शासनस्तरावर त्याबाबत हालचाली नाहीत. अनेक जिल्ह्यांमधून बाजार समित्यांनी पत्र दिले असताना शासनाने अद्याप केंद्राला प्रस्ताव पाठविलेला नसल्याची माहिती आहे.