शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सात तालुक्यात कोसळल्या मृगधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 05:00 IST

चांदूर रेल्वे शहरातून पळसखेडकडे जाणाऱ्या रेल्वे अंडरब्रिज मार्ग पावसाने तुंबला होता. अशातच रेल्वे फाटक बंद असल्याने पुलाखालून वाहन काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने ते नाल्यात कोसळले. वर्धा मार्गावर रेल्वे रुळाचे काम सुरू असल्याने या पुलाखालून जाणाऱ्या एसटी बसेस फेऱ्या घेऊन पुढे रवाना करण्यात आल्या. चांदूर शहरात दुपारी १२ पावसाची सुरुवात झाली. तब्बल तीन तास पाऊस कोसळल्याने दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला.

ठळक मुद्देआनंदोत्सव : संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण, मृगाच्या प्रारंभीच दमदार सुरुवात, शेतकऱ्यांची लगबग

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पावसाची वाट पाहणाऱ्या अमरावतीकरांना गुरुवारी मान्सूनने सुवार्ता दिली. दुपारी १२ नंतर सुमारे २ ते ३ तास दमदार पाऊस कोसळला. धामणगाव रेल्वे, दर्यापूर तालुक्यातील नदी-नाले पावसाने प्रवाही झाले. अमरावती शहरात पहिल्याच पावसाने दाणादाण उडविली. नौकरदारांची चांगलीच तारांबळ उडाली. अमरावती, भातकुली, तिवसा, दर्यापूर, धामणगाव रेल्वे, अचलपूर, चांदूररेल्वे या तालु्क्यात गुरुवारी मुसळधार पावसाने खरीप हंगामाची धामधूम वाढविली. धामणगाव :  गुरुवारी संपूर्ण तालुक्यात  दुपारपासून पावसाने दमदार सुरुवात केल्याने नाले वाहू लागले आहेत.  विजेच्या कडकडाटासह पावसाने दमदार सुरुवात केली.  काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरणी सुरू केली होती. परंतु, मोठ्या प्रमाणात पाऊस आल्याने ते पेरणीविनाच परतले. धामणगावात दमदार पाऊस आल्याने बळीराजा सुखावला.  पहिल्यांदाच काही भागातील नाल्यांना पूर आला. आगामी तीन दिवस पावसाचे असल्याने तसेच जमिनीत ओलावा निर्माण झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी सागर इंगोले यांनी दिली. तिवसा : शहरात गुरुवारी दुपारी १२.२० वाजता वादळी पाऊस कोसळला. मान्सूनने हजेरी लावल्याने शेतकरी आनंदला आहे. सुमारे दोन तास पाऊस कोसळला. चांदूूररेल्वे : गुरुवारी अचानक बरसलेल्या पावसामुळे शहरातील नाले तुडुंब भरले होते. काही भागात  नाल्यातील पाणी अनेक ठिकाणी अडल्याने ते पाणी सखल भागात शिरले. काही नाल्यांमध्ये अनेक ठिकाणी झाडे तुटून पडली होती. चांदूर रेल्वेच्या नगराध्यक्षांनी स्वतः नाल्यांमध्ये जेसीबीच्या साह्याने तुडुंब भरलेले नाले मोकळे केले. वरूड : तालुक्यात दुपारी ३ वाजताच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. दर्यापूर तालुक्यात देखील दुपारनंतर अर्धा तास मान्सूनच्या सरी कोसळल्या.भातकुली : तालुक्यातील रामा, टाकरखेडा संभू, अळणगाव, गोपगव्हाण, निंभा, खारतळेगाव, वाठोडा भागात मृगधारा कोसळल्या. उर्विरत गावात ढगाळ वातावरण आहे.चांदूर रेल्वे शहरातून पळसखेडकडे जाणाऱ्या रेल्वे अंडरब्रिज मार्ग पावसाने तुंबला होता. अशातच रेल्वे फाटक बंद असल्याने पुलाखालून वाहन काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने ते नाल्यात कोसळले. वर्धा मार्गावर रेल्वे रुळाचे काम सुरू असल्याने या पुलाखालून जाणाऱ्या एसटी बसेस फेऱ्या घेऊन पुढे रवाना करण्यात आल्या. चांदूर शहरात दुपारी १२ पावसाची सुरुवात झाली. तब्बल तीन तास पाऊस कोसळल्याने दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला. 

दर्यापुरात मुसळधार पाऊस बरसलादर्यापूर :  तालुक्यात १८  तासात दोनदा मुसळधार पावसाने हजेरी लावली. बुधवारी रात्री ९ वाजता दरम्यान तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस बरसला. गुरुवारी दुपारी वाऱ्यांसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यामुळे शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना सुरुवात केली. गुरुवारी दुपारी शहरासह तालुक्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली होती.

शहरात धुवांधारशहरात दुपारी १२ ते २ या कालावधीत संततधार कोसळली. त्यामुळे अंबा नाला प्रवाही झाला. तर, चौधरी चौकातील रामलक्ष्मण संकुल,  मालविय चौकातील उड्डाणपुलालगतच्या भागातील सखल भागात पाणी साचले.

मोती कोळसा नदीला पूरतळेगाव दशासर : गुरुवारी दुपारी एक ते दीड वाजताच्या दरम्यान जोरदार पावसाला सुरुवात झाली. जवळपास तीन तास सारखा दमदार पाऊस कोसळल्याने तळेगाव येथील मोती कोळसा नदीला पूर आला होता.

जळू येथे वीज कोसळून तीन जनावरे दगावलीनांदगाव खंडेश्वर : तालुक्यात बुधवारी दुपारी ३ ते ५ दरम्यान जोरदार पाऊस कोसळला. जळू येथे दुपारी ३ च्या सुमारास वीज कोसळून तीन गाई दगावल्या. जळू येथील मनोहर गायकी हे गुरे चारून गावाकडे येत असताना पाऊस सुरू झाल्याने गावामागील वडाच्या झाडाखाली गाई थांबल्या. तेथे वीज कोसळल्याने तीन गाई जागीच ठार झाल्या. सुदैवाने मनोहर हे तेथून घरी आल्याने वाचले. याशिवाय येणस-काणस शिवारात लिंबाच्या आकाराची गार पडली. यामुळे आंबिया बहराची संत्री गळाली. या परिसरात वादळी पाऊस झाल्याने शेताचे बांध फुटले व कपाशीचे लागवड केलेले बियाणे मातीखाली दडपले, असे येणस येथील शेतकरी मनोज कडू यांनी सांगितले.

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर