शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

एमपीचे वांझोटे बियाणे शेतकऱ्यांची माथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 22:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरिपात सोायाबीनची क्षेत्रवाढ झाल्याने बियाण्यांची मागणी वाढली. टंचाई असल्याने महाबीजनेही मध्यप्रदेशातून बियाणे आणले . मात्र यापैकी काही बॅगच्या टॅगवर उगवणशक्ती तपासणी, बीज प्रमाणिकरणाचा कोणताही उल्लेख नसतांना महाबीजचा शिक्का मारून शेतकऱ्यांच्या माथी मारले. या बियाण्यांची उगवण कमी असल्याने शेतकºयांवर आता दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.दर्यापूर तालुक्यात ...

ठळक मुद्देबीज प्रमाणिकरणाचा टॅगवर उल्लेख नाही : महाबीजद्वारा फसवणूक झाल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरिपात सोायाबीनची क्षेत्रवाढ झाल्याने बियाण्यांची मागणी वाढली. टंचाई असल्याने महाबीजनेही मध्यप्रदेशातून बियाणे आणले . मात्र यापैकी काही बॅगच्या टॅगवर उगवणशक्ती तपासणी, बीज प्रमाणिकरणाचा कोणताही उल्लेख नसतांना महाबीजचा शिक्का मारून शेतकऱ्यांच्या माथी मारले. या बियाण्यांची उगवण कमी असल्याने शेतकºयांवर आता दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.दर्यापूर तालुक्यात महाबीजद्वारा मध्यप्रदेशातील सुंदरम कंपनीचे बियाणे विक्री करण्यात आले. बियाण्यांच्या बॅगवर या कंपनीचे टॅग लागलेले आहेत. विशेष म्हणजे यावर बियाण्यांच्या प्रमाणिकरण प्रमाणपत्र व बीज परिक्षणाच्या तारखेचा उल्लेख नाही. केवळ मध्यप्रदेशातील भोपाळ येथील मध्यप्रदेश राज्य बीज प्रमाणिकरण संस्था असा उल्लेख आहे. महाबीजद्वारा हे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध केल्याने शेतकऱ्यांनी विश्वास ठेवून खरेदी केले. मात्र दोन आठवड्यानंतरही उगवण न झाल्याने महाबीजने घात केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.यंदा जिल्ह्यात सोयाबीनचे अडीच लाख हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. गतवर्षी कपाशीचे पीक बोंडअळीने उध्वस्त झाल्यामुळे यंदा सोयाबीनकडे कल अधिक आहे. उशिरा पावसाने ६० दिवसांच्या अल्प कालावधीतील मूग, उडदाचे पीक बाद होवून सोयाबीनमध्ये क्षेत्र रूपांतरित होत आहे. त्यामुळे बाजारात सोायाबीनच्या बियाण्यांची मागणी वाढली व बियाण्यांचे नियोजन कोलमडले. अचलपूर, भातकुली व दर्यापूर तालुक्यात महाबीजसह इतरही खासगी कंपन्यांच्या विरोधात शेतकºयांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत.सोयाबीन बियाण्यांच्या वाणाची उगवण फारच कमी झाल्याने शेतकºयांवर दुबार पेरणीची वेळ आलेली आहे. त्यामुळे महाबीजने बियाणे उपलब्ध करून भरपाई द्यावी, अशी शेतकºयांची मागणी आहे.कृषी विभाग करणार का पोलीस केस ?कृषी आयुक्तांच्या निर्देशानुसार ,बियाणे नकली असल्यास, किंवा बियाण्यांची फसवणूक करीत असल्यास किंवा एखाद्या कंपनीच्या नावाने नकली बियाणे विक्री करीत असल्यास अशा प्रकरणांमध्ये पोलीस केस दाखल करण्यात याव्यात व उर्वरित प्रकरणात बियाणे कायदा १९६६, बियाणे नियम १९६८, बियाणे नियंत्रण आदेश, १९८३ अन्वये कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. शेतकºयांची बियाण्यांमध्ये फसवणूक झाली असल्याने कृषी विभाग कृषी आयुक्तांचे आदेश समजून पोलीस कारवाई करणार का, असा शेतकºयांचा सवाल आहे.बातम्या आल्यानेच तक्रारी वाढल्याचा जावईशोधमहाबीजने यंदा ४० हजार क्विंटल सोयाबीन बियाण्यांची विक्री केली त्यातुलनेत केवळ अर्धा- एक टक्का शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. केवळ महाबीजचे नव्हे तर इतरही खासगी कंपन्यांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. मात्र, माध्यमांद्वारे बातम्या प्रसिद्ध केल्या जात असल्यामुळेच शेतकऱ्यांद्वारे तक्रारींचा ओघ वाढत असल्याचा जावईशोध महाबीजचे अधिकाºयांनीं लावला आहे. काही तालुक्यातच तक्रारी दाखल झाल्या असल्याचे त्यांनी सांगीतले.टॅगवर सर्व उल्लेख बंधनकारक आहेत. एखाद्या बॅगवर अनावधानाने उल्लेख राहून जातो. काही तालुक्यात सोयाबीन संदर्भात तक्रारी आहेत. जिल्हास्तरीय समितीद्वारे त्यांची चौकशी करण्यात येत आहे.- प्रवीण देशमुखजिल्हा व्यवस्थापक, महाबीज