शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

एमपीचे वांझोटे बियाणे शेतकऱ्यांची माथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 22:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरिपात सोायाबीनची क्षेत्रवाढ झाल्याने बियाण्यांची मागणी वाढली. टंचाई असल्याने महाबीजनेही मध्यप्रदेशातून बियाणे आणले . मात्र यापैकी काही बॅगच्या टॅगवर उगवणशक्ती तपासणी, बीज प्रमाणिकरणाचा कोणताही उल्लेख नसतांना महाबीजचा शिक्का मारून शेतकऱ्यांच्या माथी मारले. या बियाण्यांची उगवण कमी असल्याने शेतकºयांवर आता दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.दर्यापूर तालुक्यात ...

ठळक मुद्देबीज प्रमाणिकरणाचा टॅगवर उल्लेख नाही : महाबीजद्वारा फसवणूक झाल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरिपात सोायाबीनची क्षेत्रवाढ झाल्याने बियाण्यांची मागणी वाढली. टंचाई असल्याने महाबीजनेही मध्यप्रदेशातून बियाणे आणले . मात्र यापैकी काही बॅगच्या टॅगवर उगवणशक्ती तपासणी, बीज प्रमाणिकरणाचा कोणताही उल्लेख नसतांना महाबीजचा शिक्का मारून शेतकऱ्यांच्या माथी मारले. या बियाण्यांची उगवण कमी असल्याने शेतकºयांवर आता दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.दर्यापूर तालुक्यात महाबीजद्वारा मध्यप्रदेशातील सुंदरम कंपनीचे बियाणे विक्री करण्यात आले. बियाण्यांच्या बॅगवर या कंपनीचे टॅग लागलेले आहेत. विशेष म्हणजे यावर बियाण्यांच्या प्रमाणिकरण प्रमाणपत्र व बीज परिक्षणाच्या तारखेचा उल्लेख नाही. केवळ मध्यप्रदेशातील भोपाळ येथील मध्यप्रदेश राज्य बीज प्रमाणिकरण संस्था असा उल्लेख आहे. महाबीजद्वारा हे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध केल्याने शेतकऱ्यांनी विश्वास ठेवून खरेदी केले. मात्र दोन आठवड्यानंतरही उगवण न झाल्याने महाबीजने घात केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.यंदा जिल्ह्यात सोयाबीनचे अडीच लाख हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. गतवर्षी कपाशीचे पीक बोंडअळीने उध्वस्त झाल्यामुळे यंदा सोयाबीनकडे कल अधिक आहे. उशिरा पावसाने ६० दिवसांच्या अल्प कालावधीतील मूग, उडदाचे पीक बाद होवून सोयाबीनमध्ये क्षेत्र रूपांतरित होत आहे. त्यामुळे बाजारात सोायाबीनच्या बियाण्यांची मागणी वाढली व बियाण्यांचे नियोजन कोलमडले. अचलपूर, भातकुली व दर्यापूर तालुक्यात महाबीजसह इतरही खासगी कंपन्यांच्या विरोधात शेतकºयांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत.सोयाबीन बियाण्यांच्या वाणाची उगवण फारच कमी झाल्याने शेतकºयांवर दुबार पेरणीची वेळ आलेली आहे. त्यामुळे महाबीजने बियाणे उपलब्ध करून भरपाई द्यावी, अशी शेतकºयांची मागणी आहे.कृषी विभाग करणार का पोलीस केस ?कृषी आयुक्तांच्या निर्देशानुसार ,बियाणे नकली असल्यास, किंवा बियाण्यांची फसवणूक करीत असल्यास किंवा एखाद्या कंपनीच्या नावाने नकली बियाणे विक्री करीत असल्यास अशा प्रकरणांमध्ये पोलीस केस दाखल करण्यात याव्यात व उर्वरित प्रकरणात बियाणे कायदा १९६६, बियाणे नियम १९६८, बियाणे नियंत्रण आदेश, १९८३ अन्वये कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. शेतकºयांची बियाण्यांमध्ये फसवणूक झाली असल्याने कृषी विभाग कृषी आयुक्तांचे आदेश समजून पोलीस कारवाई करणार का, असा शेतकºयांचा सवाल आहे.बातम्या आल्यानेच तक्रारी वाढल्याचा जावईशोधमहाबीजने यंदा ४० हजार क्विंटल सोयाबीन बियाण्यांची विक्री केली त्यातुलनेत केवळ अर्धा- एक टक्का शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. केवळ महाबीजचे नव्हे तर इतरही खासगी कंपन्यांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. मात्र, माध्यमांद्वारे बातम्या प्रसिद्ध केल्या जात असल्यामुळेच शेतकऱ्यांद्वारे तक्रारींचा ओघ वाढत असल्याचा जावईशोध महाबीजचे अधिकाºयांनीं लावला आहे. काही तालुक्यातच तक्रारी दाखल झाल्या असल्याचे त्यांनी सांगीतले.टॅगवर सर्व उल्लेख बंधनकारक आहेत. एखाद्या बॅगवर अनावधानाने उल्लेख राहून जातो. काही तालुक्यात सोयाबीन संदर्भात तक्रारी आहेत. जिल्हास्तरीय समितीद्वारे त्यांची चौकशी करण्यात येत आहे.- प्रवीण देशमुखजिल्हा व्यवस्थापक, महाबीज