शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

पाणीप्रश्नावर मोझरी ग्रामपंचायतीत खडाजंगी,  ग्रामस्थांनी विचारला सरपंच, सचिवांना जाब

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 19:24 IST

राष्ट्रसंतांच्या कर्मभूमीत पाणीटंचाईची समस्या भीषण झाली आहे. पाण्यासाठी दाहीदिशा भटकंतीची वेळ आल्याने ग्रामस्थांनी शुक्रवारी मोझरी ग्रामपंचायत प्रशासनास धारेवर धरले

अमरावती : राष्ट्रसंतांच्या कर्मभूमीत पाणीटंचाईची समस्या भीषण झाली आहे. पाण्यासाठी दाहीदिशा भटकंतीची वेळ आल्याने ग्रामस्थांनी शुक्रवारी मोझरी ग्रामपंचायत प्रशासनास धारेवर धरले. सरपंच व ग्रामसचिवांना जाब विचारला. खडाजंगीही झाली. मात्र, आश्वासनाशिवाय ग्रामस्थांच्या हाती काहीही लागले नाही. 

अनियमित पाणीपुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गुरुवारी मतदानाच्या रात्री सरपंचाच्या घरी धाव घेतली. लोकांच्या भावना तीव्र असल्याने अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले. आश्वासनानुसार सरपंचांनी शुक्रवारी ग्रामपंचायतची बैठक बोलावली. येथे सुमारे ६०० ग्रामस्थ दाखल झाले. ग्रामसेवक उशिरा आल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन ग्रामस्थांना शांत केले. नंतर नियोजित सभा सुरू झाली. 

जि.प. सदस्य गौरी देशमुख, लढा संघटनेचे संजय देशमुख, पं.स. सदस्य रंजना पोजगे, सरपंच विद्या बोडखे, उपसरपंच संजय पाटणकर, ग्रामसेवक विनोद कांबळे, पोलीस पाटील शुभांगी फलके व समस्त सदस्य, पाणीपुरवठा कर्मचारी ग्रामपंचायतीच्या सभेला उपस्थित होते. यावेळी टंचाईग्रस्त नागरिकांनी आक्रमकपणे समस्या मांडल्या. ग्रामपंचायतकडून पाणीटंचाईबाबत एक  पत्रही प्राप्त झाले नसल्याची बाब जि.प. सदस्य गौरी देशमुख यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिली. त्यावर महिलांनी सरपंच व ग्रामसेवकांवर प्रश्नांची सरबत्ती झाली. सचिव मुख्यालयी राहत नसल्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. त्याबरोबर त्यांच्या कार्यालयीन उपस्थितबाबत आक्षेप घेण्यात आला. 

मोझरी ग्रामपंचायतने अधिग्रहित केलेल्या दोन्ही विहिरी शेतात आहेत. तेथील वीजपुरवठा आठ तास आहे. त्यामुळे अतिरिक्त पाणीपुरवठा करण्यास अडसर निर्माण झाला. महावितरणकडे याबाबत पाठपुरावा केला असून, वीजपुरवठा आठ तासांपेक्षा अधिक झाल्यास गावात तीन ते चार दिवसांआड पाणीपुरवठा करणे शक्य होईल, असे ग्रामसेवक कांबळे यांनी सांगितले. ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकाºयांची शनिवारी पुन्हा बैठक बोलावली आहे.

मोझरी विकास आराखड्यातून अंदाजे एक कोटी रुपये खर्चून संपूर्ण गावात पाणीपुरवठ्यासाठी पाइप लाइन नव्याने टाकण्यात आली. ती सदोष आहे. गावातील ८४४ नळ दोन टाकीवर विभागून देण्यात आले आहेत. पाणीसमस्येवर तातडीने तोडगा काढू.- विनोद कांबळे, ग्रामसेवक, मोझरी

पाणीप्रश्नाबाबत दररोज शेकडो महिला-पुरुष माझ्या घरावर हल्लाबोल करतात. असभ्य भाषेत रोष व्यक्त करतात. त्यांच्या भावना समजू शकते. पण महावितरणकडून विलंब होत आहे. येत्या काही दिवसांत यावर तोडगा काढू.- विद्या बोडखे, सरपंच, मोझरी

टॅग्स :AmravatiअमरावतीWaterपाणी