शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वाधिक मोबाईल चोरी सार्वजनिक ठिकाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 06:00 IST

गतवर्षी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर दरम्यान १८८३ मोबाईल हरविल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असल्या तरी शोध लागलेले ३१४ मोबाइलच सापडलेले आहेत. त्याची २५ लाख १३ हजार १०० रुपये रक्कम आहे. २०१८ मध्ये १ एप्रिल ते ३१ डिसेंबर दरम्यान ७२० मोबाइल हरविल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ४२३ मोबाइलचा शोध पोलिसांनी लावला. हा मुद्देमाल ४३ लाख १० हजार ३०९ रुपयांचा आहे.

ठळक मुद्देशहरात १८८३ ‘मिसिंग’ : तक्रार नोंदविण्यास अनेकांची टाळाटाळ

संदीप मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मोबाइल चोरी गेल्याची तक्रार भादंविच्या कलम ३७९ अन्वये दाखल करून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येतो. मात्र, सायबर पोलीस मोबाइल हरविल्याची तक्रार घेऊन तांत्रिक तपासात धन्यता मानत आहेत. त्यामुळे गतवर्षी तब्बल १८८३ मोबाइल हरविल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या, तर त्यापैकी ३१४ संचांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. गर्दीच्या सार्वजनिक मोबाइलचोरांपासून सावध राहा, असे आवाहन करण्यास मात्र हा विभाग विसरत नाही.गतवर्षी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर दरम्यान १८८३ मोबाईल हरविल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असल्या तरी शोध लागलेले ३१४ मोबाइलच सापडलेले आहेत. त्याची २५ लाख १३ हजार १०० रुपये रक्कम आहे. २०१८ मध्ये १ एप्रिल ते ३१ डिसेंबर दरम्यान ७२० मोबाइल हरविल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ४२३ मोबाइलचा शोध पोलिसांनी लावला. हा मुद्देमाल ४३ लाख १० हजार ३०९ रुपयांचा आहे. तक्रारकर्ते ठाण्याच्या पायऱ्या झिजवितात. पण, ‘चोरी’ आणि ‘गहाळ’च्या चक्रात त्याची येरझारा करण्यातच दमछाक होते.महिनाभरात पोलिसांनी शोधले १०७ मोबाइलपोलीस आयुक्तांच्या आदेशावरून राबविलेल्या मोहिमेत महिनाभरात पोलिसांनी विविध ठाण्यांच्या हद्दीतून आरोपींकडून १०७ हरविलेल्या मोबाइलचा शोध घेतला. त्याची रक्कम १० लाख एवढी आहे.मोबाइल शोधण्याकरिता सायबर पोलीस ठाण्यात दोन पथके स्थापन केली आहेत.मोबाइल लंपास; मात्र तक्रार हरविल्याचीअनेकदा मोबाइल चोरीला जातो किंवा खिशातून किंवा पर्समधून अलगद काढून घेतला जातो. अनेकदा चोरीचा गुन्हा तातडीने दाखल करीत नाही. त्यामुळे चोरी झाली असतानाही तक्रारदाराकडूनच मोबाइल हरविल्याची तक्रार लिहून घेतली जाते. परिणामी मोबाइल चोरल्याचे गुन्हे कमी व हरविलेल्याची प्रकरणे जास्त आहेत. मोबाइलचे लोकेशन इतर राज्यात दाखवित असेल, तर पोलीसदेखील फारसा रस घेत नाहीत.मोबाइलचोरीच्या ११ गुन्ह्यांतील १६ संच शोधलेविविध ठाण्यांच्या हद्दीत मोबाइलचोरीच्या ११ दाखल गुन्ह्यांचा तपास सायबर पोलिसांकडे आला होता. त्यांनी त्याचा तांत्रिक तपास करून ११ गुन्ह्यांतील १६ मोबाइल आरोपींकडून जप्त केले. यासंदर्भात पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.येथून चोरी होण्याचा सर्वाधिक धोकाबस स्थानक, रेल्वे स्थानक, शाळा-महाविद्यालये, परीक्षा केंद्र, बँक, बसच्या गर्दीत तसेच मुख्य चौकांत सार्वजनिक ठिकाणी मोबाइल गहाळ होण्याच्या सर्वाधिक घटना घडतात. मात्र, याकडे नागरिकांचे दुर्लक्ष असते. संपर्काचे माध्यम व त्यामुळेच दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा घटक असल्याने आपल्याकडील मोबाइलबाबत प्रत्येकाने सतर्क राहणे गरजेचे आहे.वर्षभरात १८८३ मोबाइल हरविल्याच्या तक्रारी झाल्या आहेत. पैकी ३१४ मोबाईलचा शोध लावून ते नागरिकांना परत केले. चोरीला गेलेल्या मोबाइलचा तपास संबंधित पोलीस ठाण्यात सुरू आहे. तांत्रिकदृष्ट्या आमचे सहकार्य असते. इतर तक्रारींचा तपास सुरू आहे.- प्रवीण काळेपोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशनसर्तकता बाळगाउघड्यावर मोबाइल चार्जिंगला ठेवू नका. कुठल्याही अनोळखी व्यक्तीला तो देऊ नका. वरच्या खिशात ठेवू नका. पर्समध्ये मोबाइल ठेवून बस, ट्रेन किंवा गर्दीच्या ठिकाणी वावरताना सावधगिरी बाळगली पाहिजे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

टॅग्स :Mobileमोबाइल