शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

सर्वाधिक मोबाईल चोरी सार्वजनिक ठिकाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 06:00 IST

गतवर्षी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर दरम्यान १८८३ मोबाईल हरविल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असल्या तरी शोध लागलेले ३१४ मोबाइलच सापडलेले आहेत. त्याची २५ लाख १३ हजार १०० रुपये रक्कम आहे. २०१८ मध्ये १ एप्रिल ते ३१ डिसेंबर दरम्यान ७२० मोबाइल हरविल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ४२३ मोबाइलचा शोध पोलिसांनी लावला. हा मुद्देमाल ४३ लाख १० हजार ३०९ रुपयांचा आहे.

ठळक मुद्देशहरात १८८३ ‘मिसिंग’ : तक्रार नोंदविण्यास अनेकांची टाळाटाळ

संदीप मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मोबाइल चोरी गेल्याची तक्रार भादंविच्या कलम ३७९ अन्वये दाखल करून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येतो. मात्र, सायबर पोलीस मोबाइल हरविल्याची तक्रार घेऊन तांत्रिक तपासात धन्यता मानत आहेत. त्यामुळे गतवर्षी तब्बल १८८३ मोबाइल हरविल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या, तर त्यापैकी ३१४ संचांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. गर्दीच्या सार्वजनिक मोबाइलचोरांपासून सावध राहा, असे आवाहन करण्यास मात्र हा विभाग विसरत नाही.गतवर्षी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर दरम्यान १८८३ मोबाईल हरविल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असल्या तरी शोध लागलेले ३१४ मोबाइलच सापडलेले आहेत. त्याची २५ लाख १३ हजार १०० रुपये रक्कम आहे. २०१८ मध्ये १ एप्रिल ते ३१ डिसेंबर दरम्यान ७२० मोबाइल हरविल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ४२३ मोबाइलचा शोध पोलिसांनी लावला. हा मुद्देमाल ४३ लाख १० हजार ३०९ रुपयांचा आहे. तक्रारकर्ते ठाण्याच्या पायऱ्या झिजवितात. पण, ‘चोरी’ आणि ‘गहाळ’च्या चक्रात त्याची येरझारा करण्यातच दमछाक होते.महिनाभरात पोलिसांनी शोधले १०७ मोबाइलपोलीस आयुक्तांच्या आदेशावरून राबविलेल्या मोहिमेत महिनाभरात पोलिसांनी विविध ठाण्यांच्या हद्दीतून आरोपींकडून १०७ हरविलेल्या मोबाइलचा शोध घेतला. त्याची रक्कम १० लाख एवढी आहे.मोबाइल शोधण्याकरिता सायबर पोलीस ठाण्यात दोन पथके स्थापन केली आहेत.मोबाइल लंपास; मात्र तक्रार हरविल्याचीअनेकदा मोबाइल चोरीला जातो किंवा खिशातून किंवा पर्समधून अलगद काढून घेतला जातो. अनेकदा चोरीचा गुन्हा तातडीने दाखल करीत नाही. त्यामुळे चोरी झाली असतानाही तक्रारदाराकडूनच मोबाइल हरविल्याची तक्रार लिहून घेतली जाते. परिणामी मोबाइल चोरल्याचे गुन्हे कमी व हरविलेल्याची प्रकरणे जास्त आहेत. मोबाइलचे लोकेशन इतर राज्यात दाखवित असेल, तर पोलीसदेखील फारसा रस घेत नाहीत.मोबाइलचोरीच्या ११ गुन्ह्यांतील १६ संच शोधलेविविध ठाण्यांच्या हद्दीत मोबाइलचोरीच्या ११ दाखल गुन्ह्यांचा तपास सायबर पोलिसांकडे आला होता. त्यांनी त्याचा तांत्रिक तपास करून ११ गुन्ह्यांतील १६ मोबाइल आरोपींकडून जप्त केले. यासंदर्भात पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.येथून चोरी होण्याचा सर्वाधिक धोकाबस स्थानक, रेल्वे स्थानक, शाळा-महाविद्यालये, परीक्षा केंद्र, बँक, बसच्या गर्दीत तसेच मुख्य चौकांत सार्वजनिक ठिकाणी मोबाइल गहाळ होण्याच्या सर्वाधिक घटना घडतात. मात्र, याकडे नागरिकांचे दुर्लक्ष असते. संपर्काचे माध्यम व त्यामुळेच दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा घटक असल्याने आपल्याकडील मोबाइलबाबत प्रत्येकाने सतर्क राहणे गरजेचे आहे.वर्षभरात १८८३ मोबाइल हरविल्याच्या तक्रारी झाल्या आहेत. पैकी ३१४ मोबाईलचा शोध लावून ते नागरिकांना परत केले. चोरीला गेलेल्या मोबाइलचा तपास संबंधित पोलीस ठाण्यात सुरू आहे. तांत्रिकदृष्ट्या आमचे सहकार्य असते. इतर तक्रारींचा तपास सुरू आहे.- प्रवीण काळेपोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशनसर्तकता बाळगाउघड्यावर मोबाइल चार्जिंगला ठेवू नका. कुठल्याही अनोळखी व्यक्तीला तो देऊ नका. वरच्या खिशात ठेवू नका. पर्समध्ये मोबाइल ठेवून बस, ट्रेन किंवा गर्दीच्या ठिकाणी वावरताना सावधगिरी बाळगली पाहिजे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

टॅग्स :Mobileमोबाइल