शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात मनरेगाचे सर्वाधिक मजूर अमरावतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 14:50 IST

मनरेगाच्या कामात शिथिलता देण्यात आल्याने अवघ्या महिनाभरात राज्यात सर्वाधिक अमरावती जिल्ह्यात मंगळवार ११ डिसेंबर रोजी तब्बल ४९ हजार ८१४ मजूर मनरेगाच्या जावून पोहचली आहे.

ठळक मुद्देदुष्काळाची झळसर्वाधिक मजूर मेळघाटात

जितेंद्र दखनेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दुष्काळाच्या गडद छायेत अवघा महाराष्ट्र झाकोळला जात असून, जिल्ह्यातील मजुरांनाही त्याची झळ पोहोचत आहे. मनरेगाच्या कामात शिथिलता देण्यात आल्याने अवघ्या महिनाभरात राज्यात सर्वाधिक अमरावती जिल्ह्यात मंगळवार ११ डिसेंबर रोजी तब्बल ४९ हजार ८१४ मजूर मनरेगाच्या जावून पोहचली आहे. येत्या काही महिन्यांत हा आकडा अधिक वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात २१ हजार ७८२ एवढी मजुरांची संख्या होती. यावर्षी दुष्काळाची छाया अधिक गडद असून, मनरेगाच्या कामावर १०० दिवस काम देण्याची हमी असल्याने अशा स्थितीत मजुरांची पावले मनरेगाच्या कामाकडे वळत आहेत. मध्यंतरी अनेक जिल्ह्यांतील तालुक्यांमध्ये मजुरांची संख्या कमी होती. कालांतराने ही संख्या वाढली. राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता मजुरांच्या स्थलांतराचा प्रश्न हाताळण्यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. यापूर्वीचा पूर्वानुभव पाहता वर्तमान स्थितीत मनरेगासाठी नोंदणी केलेल्या मजुरांना मागणीनुसार पुरेशी कामे उपलब्ध करण्यात आली आहेत. जेणेकरून मजुरांचे स्थलांतरण थांबेल. सद्यस्थितीत राज्यातील ३४ जिल्ह्यांपैकी अमरावती जिल्ह्यात ११ डिसेंबर रोजी सर्वाधिक ४९ हजार ८१४ मजूर मनरेगाच्या कामावर होते. त्यानंतर दुसºया क्रमांकावर मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात ११ हजार ८७९ मजूर कामावर असल्याची नोंद आॅनलाइन रिपोर्टमध्ये आहे.जिल्हानिहाय कामावरील मजूर संख्याअहमदनगर १०,३९०, अकोला ५,०७४, अमरावती ४९,८१४, औरंगाबाद ११,८७९, बीड ८,२२९, भंडारा ५८९०, बुलडाणा ९,१९०, चंद्रपूर ६,०३१, धुळे १०,५७५, गडचिरोली ५,३३५, गोंदिया ८५८९, हिंगोली ५,८२७, जळगाव ६,३४३, जालना ६,७०६, कोल्हापूर १,७१५, लातूर ५,८४३, नागपूर ६४६६, नांदेड १०,६२७, नंदूरबार ९,०७४, नाशिक ९,९५८, उस्मानाबाद ९,७०९, पालघर ८,४६३, परभणी ३,३३२, पुणे १,७०३, रायगड ८९२, रत्नागिरी ५७१५, सांगली ३७०९, सातारा ४४८९, सिंधूदूर्ग १९९३, सोलापूर १,८०५, ठाणे १,११३, वर्धा ४,७५५, वाशिम १०,८७९ आणि यवतमाळ १०,८७९ या प्रमाणे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर जिल्हानिहाय मजूर कामावर आहेत.मनरेगा अंतर्गत ११ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात विविध ठिकाणी ४९ हजारांवर मजूर कामावर होते. हा आकडा दररोज वाढत असून, मागील पंधरवड्यापेक्षा मजूर व कामांची संख्या वाढली. मनरेगा योजनेत पुरेशी कामे व रोजगार उपलब्ध आहे. मंगळवारी मजुरांचा हा आकडा राज्यात सर्वाधिक राहिला.- संदीप महाजन,उपजिल्हाधिकारी, मग्रारोहयो

टॅग्स :Governmentसरकार