शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

राज्यात मनरेगाचे सर्वाधिक मजूर अमरावतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 14:50 IST

मनरेगाच्या कामात शिथिलता देण्यात आल्याने अवघ्या महिनाभरात राज्यात सर्वाधिक अमरावती जिल्ह्यात मंगळवार ११ डिसेंबर रोजी तब्बल ४९ हजार ८१४ मजूर मनरेगाच्या जावून पोहचली आहे.

ठळक मुद्देदुष्काळाची झळसर्वाधिक मजूर मेळघाटात

जितेंद्र दखनेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दुष्काळाच्या गडद छायेत अवघा महाराष्ट्र झाकोळला जात असून, जिल्ह्यातील मजुरांनाही त्याची झळ पोहोचत आहे. मनरेगाच्या कामात शिथिलता देण्यात आल्याने अवघ्या महिनाभरात राज्यात सर्वाधिक अमरावती जिल्ह्यात मंगळवार ११ डिसेंबर रोजी तब्बल ४९ हजार ८१४ मजूर मनरेगाच्या जावून पोहचली आहे. येत्या काही महिन्यांत हा आकडा अधिक वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात २१ हजार ७८२ एवढी मजुरांची संख्या होती. यावर्षी दुष्काळाची छाया अधिक गडद असून, मनरेगाच्या कामावर १०० दिवस काम देण्याची हमी असल्याने अशा स्थितीत मजुरांची पावले मनरेगाच्या कामाकडे वळत आहेत. मध्यंतरी अनेक जिल्ह्यांतील तालुक्यांमध्ये मजुरांची संख्या कमी होती. कालांतराने ही संख्या वाढली. राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता मजुरांच्या स्थलांतराचा प्रश्न हाताळण्यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. यापूर्वीचा पूर्वानुभव पाहता वर्तमान स्थितीत मनरेगासाठी नोंदणी केलेल्या मजुरांना मागणीनुसार पुरेशी कामे उपलब्ध करण्यात आली आहेत. जेणेकरून मजुरांचे स्थलांतरण थांबेल. सद्यस्थितीत राज्यातील ३४ जिल्ह्यांपैकी अमरावती जिल्ह्यात ११ डिसेंबर रोजी सर्वाधिक ४९ हजार ८१४ मजूर मनरेगाच्या कामावर होते. त्यानंतर दुसºया क्रमांकावर मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात ११ हजार ८७९ मजूर कामावर असल्याची नोंद आॅनलाइन रिपोर्टमध्ये आहे.जिल्हानिहाय कामावरील मजूर संख्याअहमदनगर १०,३९०, अकोला ५,०७४, अमरावती ४९,८१४, औरंगाबाद ११,८७९, बीड ८,२२९, भंडारा ५८९०, बुलडाणा ९,१९०, चंद्रपूर ६,०३१, धुळे १०,५७५, गडचिरोली ५,३३५, गोंदिया ८५८९, हिंगोली ५,८२७, जळगाव ६,३४३, जालना ६,७०६, कोल्हापूर १,७१५, लातूर ५,८४३, नागपूर ६४६६, नांदेड १०,६२७, नंदूरबार ९,०७४, नाशिक ९,९५८, उस्मानाबाद ९,७०९, पालघर ८,४६३, परभणी ३,३३२, पुणे १,७०३, रायगड ८९२, रत्नागिरी ५७१५, सांगली ३७०९, सातारा ४४८९, सिंधूदूर्ग १९९३, सोलापूर १,८०५, ठाणे १,११३, वर्धा ४,७५५, वाशिम १०,८७९ आणि यवतमाळ १०,८७९ या प्रमाणे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर जिल्हानिहाय मजूर कामावर आहेत.मनरेगा अंतर्गत ११ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात विविध ठिकाणी ४९ हजारांवर मजूर कामावर होते. हा आकडा दररोज वाढत असून, मागील पंधरवड्यापेक्षा मजूर व कामांची संख्या वाढली. मनरेगा योजनेत पुरेशी कामे व रोजगार उपलब्ध आहे. मंगळवारी मजुरांचा हा आकडा राज्यात सर्वाधिक राहिला.- संदीप महाजन,उपजिल्हाधिकारी, मग्रारोहयो

टॅग्स :Governmentसरकार