शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

राज्यात मनरेगाचे सर्वाधिक मजूर अमरावतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 14:50 IST

मनरेगाच्या कामात शिथिलता देण्यात आल्याने अवघ्या महिनाभरात राज्यात सर्वाधिक अमरावती जिल्ह्यात मंगळवार ११ डिसेंबर रोजी तब्बल ४९ हजार ८१४ मजूर मनरेगाच्या जावून पोहचली आहे.

ठळक मुद्देदुष्काळाची झळसर्वाधिक मजूर मेळघाटात

जितेंद्र दखनेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दुष्काळाच्या गडद छायेत अवघा महाराष्ट्र झाकोळला जात असून, जिल्ह्यातील मजुरांनाही त्याची झळ पोहोचत आहे. मनरेगाच्या कामात शिथिलता देण्यात आल्याने अवघ्या महिनाभरात राज्यात सर्वाधिक अमरावती जिल्ह्यात मंगळवार ११ डिसेंबर रोजी तब्बल ४९ हजार ८१४ मजूर मनरेगाच्या जावून पोहचली आहे. येत्या काही महिन्यांत हा आकडा अधिक वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात २१ हजार ७८२ एवढी मजुरांची संख्या होती. यावर्षी दुष्काळाची छाया अधिक गडद असून, मनरेगाच्या कामावर १०० दिवस काम देण्याची हमी असल्याने अशा स्थितीत मजुरांची पावले मनरेगाच्या कामाकडे वळत आहेत. मध्यंतरी अनेक जिल्ह्यांतील तालुक्यांमध्ये मजुरांची संख्या कमी होती. कालांतराने ही संख्या वाढली. राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता मजुरांच्या स्थलांतराचा प्रश्न हाताळण्यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. यापूर्वीचा पूर्वानुभव पाहता वर्तमान स्थितीत मनरेगासाठी नोंदणी केलेल्या मजुरांना मागणीनुसार पुरेशी कामे उपलब्ध करण्यात आली आहेत. जेणेकरून मजुरांचे स्थलांतरण थांबेल. सद्यस्थितीत राज्यातील ३४ जिल्ह्यांपैकी अमरावती जिल्ह्यात ११ डिसेंबर रोजी सर्वाधिक ४९ हजार ८१४ मजूर मनरेगाच्या कामावर होते. त्यानंतर दुसºया क्रमांकावर मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात ११ हजार ८७९ मजूर कामावर असल्याची नोंद आॅनलाइन रिपोर्टमध्ये आहे.जिल्हानिहाय कामावरील मजूर संख्याअहमदनगर १०,३९०, अकोला ५,०७४, अमरावती ४९,८१४, औरंगाबाद ११,८७९, बीड ८,२२९, भंडारा ५८९०, बुलडाणा ९,१९०, चंद्रपूर ६,०३१, धुळे १०,५७५, गडचिरोली ५,३३५, गोंदिया ८५८९, हिंगोली ५,८२७, जळगाव ६,३४३, जालना ६,७०६, कोल्हापूर १,७१५, लातूर ५,८४३, नागपूर ६४६६, नांदेड १०,६२७, नंदूरबार ९,०७४, नाशिक ९,९५८, उस्मानाबाद ९,७०९, पालघर ८,४६३, परभणी ३,३३२, पुणे १,७०३, रायगड ८९२, रत्नागिरी ५७१५, सांगली ३७०९, सातारा ४४८९, सिंधूदूर्ग १९९३, सोलापूर १,८०५, ठाणे १,११३, वर्धा ४,७५५, वाशिम १०,८७९ आणि यवतमाळ १०,८७९ या प्रमाणे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर जिल्हानिहाय मजूर कामावर आहेत.मनरेगा अंतर्गत ११ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात विविध ठिकाणी ४९ हजारांवर मजूर कामावर होते. हा आकडा दररोज वाढत असून, मागील पंधरवड्यापेक्षा मजूर व कामांची संख्या वाढली. मनरेगा योजनेत पुरेशी कामे व रोजगार उपलब्ध आहे. मंगळवारी मजुरांचा हा आकडा राज्यात सर्वाधिक राहिला.- संदीप महाजन,उपजिल्हाधिकारी, मग्रारोहयो

टॅग्स :Governmentसरकार