शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

मोर्शीत तहसीलदारांच्या कक्षाला लावले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:12 IST

२०१८ मधील गारपीटग्रस्तांवर अन्याय, मोबदल्यात घोळ घालणाऱ्यांवर कारवाईची किसान मोर्चाकडून मागणी मोर्शी : २०१८-१९ मधील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मोबदला ...

२०१८ मधील गारपीटग्रस्तांवर अन्याय, मोबदल्यात घोळ घालणाऱ्यांवर कारवाईची किसान मोर्चाकडून मागणी

मोर्शी : २०१८-१९ मधील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मोबदला देण्यात यावा, या मागणीसाठी भारतीय जनता किसान मोर्चाच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी २८ जुलै रोजी मोर्शीत तहसीलदारांच्या कक्षाला लावले कुलूप लावले. यावेळी अमरावतीहून दंगा नियंत्रण पथक व मोर्शीचे पोलीस तैनात करण्यात आल्याने मोर्चाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

२०१८-१९ मधील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मोबदला देण्यात यावा. शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या पैशात घोळ घालणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर योग्य कारवाई करण्यात यावी. शेतकऱ्यांच्या शेतातील वीज कनेक्शन त्वरित सुरू करण्यात यावे. श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनेंतर्गत बोगस यादी रद्द करून पात्र लाभार्थींनाच मानधन वितरित करण्यात यावे, या प्रमुख मागणीसंदर्भात भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. अनिल बोंडे व किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष अशोक ठाकरे यांच्या नेतृत्वात तालुक्यातील शेकडो शेतकरी तहसील कार्यालयावर येऊन धडकले. मागणीसंदर्भात लेखी निवेदन उपविभागीय अधिकारी मोर्शी यांना देण्यात आले. यानंतर तहसीलदार यांच्या कक्षाला कुलूप ठोकून निषेध व्यक्त केला.

२०१९, २०२० मध्ये दापोरी, हिवरखेड आणि मायवाडी शिवारातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नव्हती. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी कोट्यावधी रुपये मोर्शी तालुक्यात देण्यात आले होते. मात्र, शेतीच नाही अशा तथाकथित शेतकऱ्यांना लाखो रुपयांची नुकसानभरपाई त्यावेळी देण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी करून दोषी असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना निलंबित करण्याची मागणी अद्याप प्रलंबित आहे. याशिवाय २०१८-१९ मध्ये गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील वीज जोडणी बंद आहे. महावितरण शेतकऱ्यांना बिल भरा, अन्यथा वीज पुरवठा सुरू होणार नाही, असे सांगते. हा शासनाच्याच धोरणाचा अवमान आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले. यावेळी भाजपाचे पदाधिकारी ज्योतिप्रसाद मालवीय, प्रवीण राऊत, देवकुमार बुरंगे, नगर परिषद उपाध्यक्ष आप्पासाहेब गेडाम, नितीन राऊत प्रामुख्याने उपस्थित होते.

दरम्यान, मोर्शी तालुक्यातील काही भागातील नुकसानग्रस्तांच्या याद्यांमध्ये घोळ झाल्याचे आढळताच संबंधित तलाठी व कारकून यांच्याविरुद्ध चौकशी व कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे, असे तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी सांगितले.