शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

जावईबापूंसाठी सुगीचा ‘अधिक’महिना

By admin | Updated: June 20, 2015 00:51 IST

अधिकमास म्हटला की, वऱ्हाडात वाण लावायची प्रथा नजरेसमोर येते.

परंपरा : नवविवाहित तरुणांना ‘वाण’ देण्याची पध्दत जीतेंद्र दखणे अमरावतीअधिकमास म्हटला की, वऱ्हाडात वाण लावायची प्रथा नजरेसमोर येते. याला धोंडा असेही म्हणतात. त्यामुळे १७ जूनपासून जावाईबापूंसाठी सुगीचा महिना सुरु झाला आहे. विशेषत: नवविवाहित तरुणांसाठी सासरवाडीहून भेटवस्तूची अधिक रेलचेल होणार आहे. सर्वत्र याला मलमास, पुरुषोत्तमास आणि महाराष्ट्रात धोंडामास असेही म्हणतात. चंद्र वर्ष व सौर वर्ष यांचा मेळ घालण्यासाठी सरासरी वर्गास किंवा ३३ चांद्रमासनंतर चांंद्र वर्षात एक अधिक महिना धरावा लागतो. त्याला अधिकमास म्हणतात. सामान्यत: प्रत्येक चांद्रमासात एक सौर संक्रांती होत असते. ज्या मासात अशी एकही सौर संक्रांती घडत नाही. म्हणजेच जो चांद्रास संपूर्णपणे दोन संक्रांतीच्या दरम्यान येतो, तो अधिकमास समजायचा. ज्या सूर्याची मेष संक्रांती चैत्र अमावस्येला घडली व त्याची वृषभ संक्रांती वैशाखात न होता ती त्यापुढील महिन्याच्या प्रतिपदेस घडली तर हा संक्रांती विहितमास अधिक वैशाख ठरेल व त्यापुढचा महिना तर निज वैशाख होईल. चैत्र, ज्येष्ठ व श्रावण हे १२ वर्षांनी आषाढ १८ वर्षांनी भाद्रपद २४ वर्षांनी, आश्विन १४१ वर्षांनी व कार्तिक ७०० वर्षांनी अधिकमास होतो. भाद्रपद पर्यंतच्या मासांना अधिकमास म्हणतात. आश्विन व कार्तिक अधिक झाले तरी त्यास तसे म्हणत नाहीत. ज्यावर्षी आश्विन अधिक होतो, त्यावर्षी पौष क्षयमास होतो. अशावेळी दोन पदरांपर्यंत मार्गशीष व दोन पदरानंतर पोष मानून दोन्ही मासांची धर्मक्रये एकाच महिन्यात करतात. या जोड मासाला 'संसर्प' असे म्हणतात. बहुक्षारदीय व पद्य या पुराणात पुरुषोत्तम मासमहात्म व मलमास महात्म या प्रकरणात अधिकमासाचे महत्त्व वर्णीले आहे. त्यात अधिकमासात करायची व्रते, दान उद्यापन यांचा विधी सांगितला असून फलश्रृतीही निवेदिली आहे.या महिन्यातील देव पुरुषोत्तम म्हणजे विष्णू मानले असून त्याच्या कृपेसाठी पुढील विधी करण्यास सांगितले आहे. पापसालनासाठी मलमास व्रत प्रत्येक दिवशी अनारसे आदी पक्वान्न ३३ या संधेने कांस्यपालात भरुन त्याचे दान, पादत्राणे व छत्री यांचे दान सुवर्ण दक्षिणा इत्यादी. महाराष्ट्रात अधिकमास अनरशांचे वाण बहुधा जावयाला देतात. कन्या व जावयास लक्ष्मी नारायणास्वरुपी मानले जाते, त्यातून ही पध्दत आली असावी. त्यात जावईबापुंना कपडे, दागिने, भांडी स्वरुपात वस्तू भेट दिली जातात. पंचपक्वान्न व गोड-धोडाच्या जेवणावळी होतात. अधिकमासात दान, उपवास केले जातात. दीपदान, तांब्याच्या वस्तू, अपुपदान देव ब्राह्मण, जावई, भाचे यांना दिले जाते. गौदान वस्त्रदान करण्यात येते. पोथी, भागवत वाचनदेखील केले जाते.