शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

माकडाचा उपद्रव, महिलेच्या एका पायाला २० टाके, दुसरा फ्रॅक्चर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 05:01 IST

छाया चंद्रशेखर देशमुख (६२) असे जखमी महिलेचे नाव आहे. दोन तासांच्या प्रयत्नाअंती महापालिका, वनविभागाच्या चमूला चवताळलेल्या लंगुरास बेशुद्ध करण्यात यश आले. मात्र, लंगुराच्या उपद्रवामुळे काही काळ काँग्रेसनगरवासी भयभीत झाले होते. येथे बुधवारी सकाळी ८ पासून आठ-दहा लंगूर धुमाकूळ घालत होते. घराच्या छतावर, आवारात काही तरी खाण्यास शोधत असताना, यातील एक लंगूर चवताळले. पहाटे भ्रमंतीला जाणाऱ्या छाया देशमुख यांच्यावर त्याने हल्ला केला.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : माकड प्रजातीतील लंगूरने बुधवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास स्थानिक काँग्रेसनगरात उपद्रव घातल्यामुळे एक महिलेला चावा घेत गंभीररीत्या जखमी केले. महिलेच्या एका पायाला २० टाके पडले असून, दुसरा पाय फ्रॅक्चर झाला आहे.छाया चंद्रशेखर देशमुख (६२) असे जखमी महिलेचे नाव आहे. दोन तासांच्या प्रयत्नाअंती महापालिका, वनविभागाच्या चमूला चवताळलेल्या लंगुरास बेशुद्ध करण्यात यश आले. मात्र, लंगुराच्या उपद्रवामुळे काही काळ काँग्रेसनगरवासी भयभीत झाले होते. येथे बुधवारी सकाळी ८ पासून आठ-दहा लंगूर धुमाकूळ घालत होते. घराच्या छतावर, आवारात काही तरी खाण्यास शोधत असताना, यातील एक लंगूर चवताळले. पहाटे भ्रमंतीला जाणाऱ्या छाया देशमुख यांच्यावर त्याने हल्ला केला. चावा घेत रक्तबंबाळ केले. यानंतर लंगूरने जोरात उडी घेतल्याने त्यांचा पाय फ्रॅ क्चर झाला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तब्बल १०० ते १२५ किलो वजनाचे हे लंगूर असल्याची माहिती वनविभागाने दिली. ट्रँक्विलायझरने बेशुद्ध केल्यानंतर लंगूरला जंगलात सोडण्यात आले. महापालिका पशुवैद्यकीय अधिकारी सचिन बोंद्रे, वनरक्षक अमोल गावनेर यांनी या मोहिमेत मोलाची कामगिरी बजावली.रेस्क्यू चमूने मिळविले नियंत्रणकाँग्रेसनगरात लंगुरांनी उपद्रव सुरू केला. सेवानिवृत्त शिक्षिकेला गंभीररीत्या जखमी केल्याची माहिती मिळताच वनविभागाचे रेस्क्यू पथक आणि महापालिका पशू विभागाची चमू घटनास्थळी पोहोचली. उपद्रव घालणाºया लंगूर माकडाला जेरबंद करुन इतरांना हाकलून लावले. नगरसेवक बबलू शेखावत यांनी रेस्क्यू चमूला पाचारण केले.अन्न, पाण्याच्या शोधात आल्याचा अंदाजलंगूर माकड हे सहसा जेथे अन्न, पाणी मिळेल अशाच देऊळ, मंदिर भागात संचार करतात. मात्र, उन्हाळ्यात घराच्या छतावर पापड, अन्नधान्य वाळू घालणे याकडे सुद्धा लंगूर आकृष्ट झाले असावे. हल्ली शहरी भागात निंबाच्या झाडाला निंबोळ्या लागल्या असून, त्या खाण्यासाठी ते आलेत, अशी माहिती उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे यांनी ‘लोकमत’ला दिली.