शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

अमरावतीमधील नवाबच्या संरक्षणार्थ कॅमेरा ट्रॅपद्वारे मॉनिटरिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 11:08 IST

अमरावती जिल्ह्यातील पोहरा-चिरोडीच्या विस्तीर्ण जंगलात वर्षभरापासून मुक्त संचार करीत असलेल्या वाघाच्या (नवाब) संरक्षणार्थ वनविभागाने कठोर पावले उचलली आहेत.

ठळक मुद्देवीजप्रवाह सोडल्यास तीन गुन्हे दाखल होणारजंगलाशेजारील शेतकुंपणांची तपासणी 

अमोल कोहळे।आॅनलाईन लोकमत अमरावती:जिल्ह्यातील पोहरा-चिरोडीच्या विस्तीर्ण जंगलात वर्षभरापासून मुक्त संचार करीत असलेल्या वाघाच्या (नवाब) संरक्षणार्थ वनविभागाने कठोर पावले उचलली आहेत. शेतकुंपणाला वीजप्रवाही तारा सोडू नये, याबाबत शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. वीजप्रवाहित तारा निदर्शनास आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, अशा सूचना नोटिसात आहेत. वाघोबाच्या सुरक्षेच्या दृष्टीने कॅमेरा ट्रॅपद्वारे मॉनिटरिंग करण्यात येत आहे.जंगलालगत असलेल्या शेतातील उभे पीक वन्यप्राणी फस्त करतात. त्यामुळे पीक वाचविण्यासाठी शेतकरी आपापल्या शेतात पीक संरक्षणासाठीच नव्हे, तर काही शेतकरी तारांच्या कुंपणामध्ये वीज प्रवाहदेखील सोडतात. त्यामुळे वन्यप्राण्यांचा बळी जातो. मागील आठवड्यात कुंपणातील वीज प्रवाहाने वाघ आणि बिबटाचा मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्यात घडली होती. त्यामुळेच का होईना, पण या संघर्षामुळे कधी मानवाचा, तर कधी वन्यजिवांचा हकनाक बळी जात आहे. अख्ख्या महाराष्टत ठिकठिकाणी वन्यजिवांचा विद्युत करंटमुळे जीव बळी गेला. त्यामुळे छुप्या मार्गानेही घातपातांच्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन चांदूररेल्वे, चिरोडी वनपरिक्षेत्राच्यावतीने जंगलालगतच्या शेतकऱ्यांना नोटिशी देण्यात आल्या आहेत. शिवाय नियमित जंगल गस्त करून वन्यप्राण्यांच्या हालचालीवर दोन्ही वर्तुळाचे वनकर्मचारी लक्ष ठेवून आहेत. त्यासाठी वडाळी व चांदूर रेल्वे या दोन्ही रेंजच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी आपापल्या वनकर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.नवाबच्या विशेष संरक्षणार्थ उपवनसंरक्षक हेमंत मिणा हे अपरात्री जंगलात गस्त घालतात. ट्रॅप कॅमेरे तपासून त्याच्या हालचाली टिपतात.वीजप्रवाह सोडल्यास तीन गुन्हे दाखल होणारशेतकुंपणात वीजप्रवाह सोडल्यास व करंट लागून वन्यप्राणी ठार झाल्यास वनविभाग स्वतंत्र गुन्हा दाखल करणार आहे. यासोबत अवैधरीत्या वीजचोरीचा गुन्हा तसेच वीज कंपनी त्यांच्या नियमानुसार गुन्हा दाखल करणार असल्याने वीजप्रवाह सोडणाऱ्या शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे.जंगलाशेजारील शेतकुंपणांची तपासणी दोन्ही वर्तुळाचे वनकर्मचारी सुरक्षिततेसाठी रात्रीला व दिवसाला जंगलानजीकच्या शेतीची तपासणी करीत असून शेतकऱ्यांना नोटिशी देण्यात येत आहेत. दोन्ही वर्तुळाचे वनकर्मचारी वन्य प्राण्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. वाघाच्या अस्तित्वामुळे पोहरा-चिरोडीच्या जंगलात हे प्रमाण कमी आहे, हेही तितकेच खरे आहे. ही वस्तुस्थिती असली तरी वन्य प्राण्यांच्या सुरक्षेसाठी वनविभागाने आणखी अलर्ट राहणे गरजेचे आहे.

टॅग्स :forestजंगल