शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पिकांचे निरीक्षण आता उपग्रहाद्वारे

By admin | Updated: November 25, 2014 22:46 IST

दरवर्षी दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. उपग्रहाच्या माध्यमातून रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाच्या आधारे

पैसेवारी पद्धती होणार कालबाह्य : धोरणासाठी समितीची रचनाजितेंद्र दखने - अमरावतीदरवर्षी दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. उपग्रहाच्या माध्यमातून रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाच्या आधारे पीक-पाण्याचे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. यासाठीची कार्यपद्धती निश्चित करण्याकरिता वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती गठीत केली जाणार आहे. दरवर्षी पीक-पाण्याच्या पाहणीवरून अडचणी निर्माण होतात. महसूल विभागाच्या आणेवारी, पैसेवारी काढण्याच्या पद्धती कालबाह्य होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर अमरावतीसह राज्यभरातील पीक पाण्याची मोजणी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उपग्रहाच्या साह्याने करता येऊ शकणार आहे. याबाबत कार्यपद्धती निश्चित करणे तसेच धोरण ठरविण्यासाठी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती निवडण्यात येणार आहे. राज्यात सातत्याने दुष्काळसदृश्य स्थिती उद्भवत आहे. पीक-पाण्याच्या सद्यस्थितीची माहिती मिळविण्यासाठी अद्यापही नजर आणेवारी, सुधारित आणेवारी व अंतिम आणेवारी पद्धतीचा अवलंब केला जात आहे. पण बऱ्याचदा यासंदर्भातील अंतिम आकडेवारी प्राप्त होण्यास विलंब होतो व त्याअभावी शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळणे अशक्य होते. त्यामुळे पीक पाण्याच्या स्थितीची मोजणी ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उपग्रहाच्या साह्याने केल्यास यासंदर्भातील माहिती त्वरित उपलब्ध होऊ शकणार आहे. तसेच शेतकऱ्यांना तातडीने मदत करता येणार आहे. या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याबाबत कार्यपद्धती व धोरण निश्चित करण्यासाठी मंत्रालयातील माहिती तंत्रज्ञान, महसूल, कृषी या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती गठीत करून ही समिती या संदर्भात अंतिम कार्यपद्धती निश्चित केली जाणार आहे. आणेवारी प्रक्रियेत बदलाचे धोरणसध्या महसूल विभागामार्फत दरवर्षी १५ नोव्हेंबरदरम्यान विविध जिल्ह्याची आणेवारी जाहीर करण्यात येते. ही आणेवारी प्रत्यक्ष महसूल व कृषी विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यामार्फत केली जात असल्याने या प्रक्रियेत बराच वेळ वाया जातो. त्यामुळे या प्रक्रियेत आमुलाग्र बदल करण्याचे नवीन भाजप सरकारणे धोरण स्वीकारले आहे.शेतकऱ्यांसाठी नवतंत्रज्ञानाचा वापरदरवर्षी दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सध्या सुरू असलेली प्रक्रिया किचकट ठरत आहे. त्यामुळे याबाबत राज्य शासनाने निर्णय घेताना विविध अडचणी येत होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय देताना विलंब होत असून यामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा प्रयोग करून आता उपग्रहाच्या माध्यमातून रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाच्या आधारे पीक पाण्याचे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे.अहवालानंतर होणार शिक्कामोर्तबसातत्याने दुष्काळसदृश्य स्थिती उद्भवत आहे. पीक पाण्याच्या सद्यस्थितीची माहिती मिळविण्यासाठी पीक पाण्याची मोजणी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उपग्रहाच्या साह्याने करता येऊ शकणार आहे. याबाबत कार्यपद्धती निश्चित करणे तसेच धोरण ठरविण्यासाठी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती निवडण्यात येणार आहे. या समितीच्या अभ्यासानंतर सादर केल्या जाणाऱ्या अंतिम अहवालाच्या आधारे हा नवा प्रयोग अंमलात आणला जाणार आहे.