शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

पिकांचे निरीक्षण आता उपग्रहाद्वारे

By admin | Updated: November 25, 2014 22:46 IST

दरवर्षी दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. उपग्रहाच्या माध्यमातून रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाच्या आधारे

पैसेवारी पद्धती होणार कालबाह्य : धोरणासाठी समितीची रचनाजितेंद्र दखने - अमरावतीदरवर्षी दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. उपग्रहाच्या माध्यमातून रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाच्या आधारे पीक-पाण्याचे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. यासाठीची कार्यपद्धती निश्चित करण्याकरिता वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती गठीत केली जाणार आहे. दरवर्षी पीक-पाण्याच्या पाहणीवरून अडचणी निर्माण होतात. महसूल विभागाच्या आणेवारी, पैसेवारी काढण्याच्या पद्धती कालबाह्य होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर अमरावतीसह राज्यभरातील पीक पाण्याची मोजणी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उपग्रहाच्या साह्याने करता येऊ शकणार आहे. याबाबत कार्यपद्धती निश्चित करणे तसेच धोरण ठरविण्यासाठी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती निवडण्यात येणार आहे. राज्यात सातत्याने दुष्काळसदृश्य स्थिती उद्भवत आहे. पीक-पाण्याच्या सद्यस्थितीची माहिती मिळविण्यासाठी अद्यापही नजर आणेवारी, सुधारित आणेवारी व अंतिम आणेवारी पद्धतीचा अवलंब केला जात आहे. पण बऱ्याचदा यासंदर्भातील अंतिम आकडेवारी प्राप्त होण्यास विलंब होतो व त्याअभावी शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळणे अशक्य होते. त्यामुळे पीक पाण्याच्या स्थितीची मोजणी ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उपग्रहाच्या साह्याने केल्यास यासंदर्भातील माहिती त्वरित उपलब्ध होऊ शकणार आहे. तसेच शेतकऱ्यांना तातडीने मदत करता येणार आहे. या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याबाबत कार्यपद्धती व धोरण निश्चित करण्यासाठी मंत्रालयातील माहिती तंत्रज्ञान, महसूल, कृषी या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती गठीत करून ही समिती या संदर्भात अंतिम कार्यपद्धती निश्चित केली जाणार आहे. आणेवारी प्रक्रियेत बदलाचे धोरणसध्या महसूल विभागामार्फत दरवर्षी १५ नोव्हेंबरदरम्यान विविध जिल्ह्याची आणेवारी जाहीर करण्यात येते. ही आणेवारी प्रत्यक्ष महसूल व कृषी विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यामार्फत केली जात असल्याने या प्रक्रियेत बराच वेळ वाया जातो. त्यामुळे या प्रक्रियेत आमुलाग्र बदल करण्याचे नवीन भाजप सरकारणे धोरण स्वीकारले आहे.शेतकऱ्यांसाठी नवतंत्रज्ञानाचा वापरदरवर्षी दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सध्या सुरू असलेली प्रक्रिया किचकट ठरत आहे. त्यामुळे याबाबत राज्य शासनाने निर्णय घेताना विविध अडचणी येत होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय देताना विलंब होत असून यामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा प्रयोग करून आता उपग्रहाच्या माध्यमातून रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाच्या आधारे पीक पाण्याचे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे.अहवालानंतर होणार शिक्कामोर्तबसातत्याने दुष्काळसदृश्य स्थिती उद्भवत आहे. पीक पाण्याच्या सद्यस्थितीची माहिती मिळविण्यासाठी पीक पाण्याची मोजणी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उपग्रहाच्या साह्याने करता येऊ शकणार आहे. याबाबत कार्यपद्धती निश्चित करणे तसेच धोरण ठरविण्यासाठी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती निवडण्यात येणार आहे. या समितीच्या अभ्यासानंतर सादर केल्या जाणाऱ्या अंतिम अहवालाच्या आधारे हा नवा प्रयोग अंमलात आणला जाणार आहे.