शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

सोमवारपासून फक्त गुरूजींसाठीच वाजणार शाळेची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:09 IST

विद्यार्थ्यांचा फोटो टाकणे ऑफलाईनवर निर्भर, तालुक्यातील ३२ हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य ऑनलाईन चांदूर बाजार : कोरोनामुळे प्रत्यक्ष विद्यार्थ्यांसाठी शाळा ...

विद्यार्थ्यांचा फोटो टाकणे

ऑफलाईनवर निर्भर, तालुक्यातील ३२ हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य ऑनलाईन

चांदूर बाजार : कोरोनामुळे प्रत्यक्ष विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू होण्याबाबत अद्यापही संभ्रमच कायम आहे. असे असले तरी दरवर्षीप्रमाणे तालुक्यातील शाळा, २८ जूनपासून विद्यार्थ्यांविनाच सुरू होणार आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाचा विचार करता, सोमवारपासून फक्त गुरुजींसाठीच शाळेची घंटा वाजणार आहे. परिणामी शिक्षकांना हे वर्षही विद्यार्थ्यांविनाच काढावे लागेल की काय, अशी शंका निर्माण होत आहे.

मागील वर्षी कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे पूर्ण शैक्षणिक सत्र, शिक्षणाविनाच पार पडले. नाही म्हणायला, ऑनलाईन शिक्षण सुरू होते. त्यातून विद्यार्थ्यांच्या पदरी किती ज्ञान पडले, हे फक्त राज्याच्या शिक्षण विभागालाच माहीत. कारण जे ऑनलाईन होते ते, जे ऑफलाई होते. असे पहिली ते बारावीपर्यंतचे सर्वच विद्यार्थ्यी पुढील वर्गात प्रमोटेड झालेत. त्यांच्या ज्ञान संपादनाची कोणतीच कसोटी तपासली गेली नाही. त्यामुळे अव्वल येणारा विद्यार्थी व नापास होणारा विद्यार्थी यावर्षी ढकलगाडीने पुढील वर्गात जात आहे. परिणामी दोघांचाही ज्ञानाची दर्जा समान झाल्यामुळे प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना यावर्षी कौतुकापासून वंचित राहावे लागणार आहे.

यावर्षीच्या सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षात अद्यापही शिक्षण ऑनलाईन किंवा ऑफलाईनवरच निर्भर राहाणार आहे. त्यामुळे यंदाही तालुक्यातील ३२ हजार विद्यार्थ्यांचे, शौक्षणिक भवितव्य अधांतरीच आहे. यावर्षी १० वी व १२ वीची परीक्षा झाली नाही. त्यामुळे या दोन्ही वर्गांचा निकाल कोणत्या निकषांवर लावावा. याबाबत राज्याचा शिक्षण विभाग, अद्यापही निर्णय घेऊ शकला नाही. त्यामुळे पाल्याचे पुढील शैक्षणिक भवितव्य काय? याबद्दल पालकवर्ग कमालीचा चिंतेत आहे.

कोट

२८ जूनपासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू होत आहे. शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनात पहिल्या टप्प्यात शिक्षकांनी शाळानिहाय नियोजन तयार केले आहे. त्यानुसार जेथे शक्य तेथे ऑनलाईन अभ्यासाचे नियोजन करण्यात आले आहे. जेथे ऑनलाईन शक्य नाही तेथे ऑफलाईनचे नियोजन शिक्षकांनी केले आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या सल्ल्याने स्थानिक पातळीवर या शैक्षणिक सत्राचे निर्णय घेण्यात येतील.

- शुभांगी श्रीराव, गट शिक्षणाधिकारी

कोट २

पहिली ते चौथीचे प्राथमिक शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक इमारतीचा बेस आहे. मागील वर्षी कोरोनामुळे प्राथमिक शिक्षण पाण्यात गेले. यावर्षीही तीच स्थिती कायम राहिल्यास प्राथमिक शिक्षणाचा बट्ट्याबोळ होईल. बेसच पक्का नसला तर, विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी कसे तयार होतील?

-विक्रम देशमुख,

पालक, गणोजा