शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

सोमवारची रात्र ठरणार निर्णायक

By admin | Updated: September 14, 2015 00:00 IST

जिल्ह्यात सर्वात मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या अमरावती आणि भातकुली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचे ‘काउंटडाऊन’ सुरू झाले आहे.

बाजार समिती निवडणूक : मंगळवारी मतदान, गुप्त बैठकांना वेगगणेश वासनिक अमरावतीजिल्ह्यात सर्वात मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या अमरावती आणि भातकुली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचे ‘काउंटडाऊन’ सुरू झाले आहे. मंगळवार १५ सप्टेंबर रोजी मतदान होत असल्याने सोमवारची रात्र या निवडणुकीच्या अनुषंगाने ‘कत्ल की रात’ ठरणार आहे. एव्हाना सर्वच उमेदवारांनी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन विजयासाठी ‘फिल्डिंग’ लावल्याचे वास्तव आहे.बाजार समिती निवडणुकीत स्थानिक नेत्यांचे वर्चस्व पणाला लागले आहे. पक्षभेद, विचारसरणी गुंडाळून नेते एकत्र आले आहेत. पॅनेल तयार करुन सहकारक्षेत्रात पकड मजबूत करण्यासाठी विरोधकांना ‘धोबीपछाड’ देण्याची रणनीती आखली जात आहे. एरवी विधानसभा, लोकसभा निवडणुकीत आरोप- प्रत्यारोप करणारे नेते सध्या बाजार समितीच्या निवडणुकीत एकत्र फिरुन मतदारांसमोर जोगवा मागत आहेत. प्रचारादरम्यान बाजार समितीत शेतकऱ्यांना सोयी-सवलती देण्याच्या, भ्रष्टाचार संपविण्याच्या आणि बाजार समितीचा कारभार पारदर्शकपणे करण्याची आश्वासने देऊन सहकारक्षेत्र काबीज करण्यासाठी नेते आणि उमेदवार मतदारांना आकर्षित करताना दिसून आलेत. निवडणुकीला उणेपुरे एकच दिवस शिल्लक असल्यामुळे पडद्याआड करावयाच्या राजकारणाची रणनीती सोमवारीच आखली जाणार आहे. या निवडणुकीत प्रमुख तीन पॅनेलमध्ये चुरस असली तरी अडते व व्यापारी मतदारसंघात उमेदवारांनी हायटेक पध्दतीने प्रचार केला. होर्डिंग्ज, पोस्टर्स, बॅनर, वृतपत्रातून झळकलेल्या जाहिराती बघून ही निवडणूक विधानसभा, लोकसभेच्या धर्तीवर लढली जात असल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहेत. नेत्यांचे अस्तित्व पणालाअमरावती : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला महत्त्व का आले, हा संशोधनाचा विषय आहे. शेतकऱ्यांसाठी ही बाजार समिती खरेच शेतकरी हिताचे काम करते काय, याचा विचार मतदारांनी करणे गरजेचे आहे. सोमवारी रात्री नेत्यांमध्ये छुपे मनोमिलन होण्याचीदेखील दाट शक्यता आहे. तीन पॅनेल मैदानात असले तरी आपल्या गटातील उमेदवार निवडून आणण्यासाठी नेत्यांमध्ये आपसी ‘फिक्सिंग’ होण्याची शक्यता आहे. मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी, बैठकांवर जोर देत असताना आपल्या गटातील उमेदवाराला कसे बळ मिळेल, याचे नियोजन नेते करताना दिसून येत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत प्रारंभी दोन पॅनेल रिंंगणात राहतील, असे चित्र होते. मात्र जागा वाटपावरून बोलणी फिस्कटली. त्यानंतर आ. रवी राणा यांच्या नेतृत्त्वात तिसऱ्या शेतकरी एकता पॅनेलचा उदय झाला. तिसऱ्या पॅनेलमुळे निवडणुकीचे एकूण चित्र पालटले आहे. बाजार समितीवर सत्ता मिळविण्यासाठी स्थानिक नेत्यांनी व्यूहरचना, राजकीय खेळी, मुत्सद्दीपणाचा वापर करून मतदारांना गळ घालणे सुरू केले आहे. नेते आणि उमेदवारांसाठी सोमवारची रात्र ही वैरा’ची ठरणार आहे.या निवडणुकीत सहकार पॅनेलमध्ये आ. यशोमती ठाकूर, काँग्रसचे प्रदेश सचिव संजय खोडके, विलास महल्ले, हरिभाऊ मोहोड यांचा समावेश आहे. परिवर्तन पॅनेलची धुरा माजी आमदार संजय बंड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, मनोज देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे यांच्यावर आहे. तसेच तिसऱ्या आघाडीतील शेतकरी एकता पॅनेलचे नेतृत्व आ. रवी राणा, माजी खा. अनंत गुढे, भाजपचे शहराध्यक्ष तुषार भारतीय, संयोगिता निंबाळकर, सरपंच संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गजानन बोंडे करीत आहेत. पॅनेल स्थापन करून सहकार क्षेत्रात ठसा उमटविण्यासाठी एकत्र आलेल्या विभिन्न वैचारिक पातळीच्या नेत्यांची दिलजमाई बघून सद्यस्थितीत नेतेही चक्रावून गेले आहेत. (प्रतिनिधी)