शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

सोमवारची रात्र ठरणार निर्णायक

By admin | Updated: September 14, 2015 00:00 IST

जिल्ह्यात सर्वात मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या अमरावती आणि भातकुली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचे ‘काउंटडाऊन’ सुरू झाले आहे.

बाजार समिती निवडणूक : मंगळवारी मतदान, गुप्त बैठकांना वेगगणेश वासनिक अमरावतीजिल्ह्यात सर्वात मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या अमरावती आणि भातकुली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचे ‘काउंटडाऊन’ सुरू झाले आहे. मंगळवार १५ सप्टेंबर रोजी मतदान होत असल्याने सोमवारची रात्र या निवडणुकीच्या अनुषंगाने ‘कत्ल की रात’ ठरणार आहे. एव्हाना सर्वच उमेदवारांनी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन विजयासाठी ‘फिल्डिंग’ लावल्याचे वास्तव आहे.बाजार समिती निवडणुकीत स्थानिक नेत्यांचे वर्चस्व पणाला लागले आहे. पक्षभेद, विचारसरणी गुंडाळून नेते एकत्र आले आहेत. पॅनेल तयार करुन सहकारक्षेत्रात पकड मजबूत करण्यासाठी विरोधकांना ‘धोबीपछाड’ देण्याची रणनीती आखली जात आहे. एरवी विधानसभा, लोकसभा निवडणुकीत आरोप- प्रत्यारोप करणारे नेते सध्या बाजार समितीच्या निवडणुकीत एकत्र फिरुन मतदारांसमोर जोगवा मागत आहेत. प्रचारादरम्यान बाजार समितीत शेतकऱ्यांना सोयी-सवलती देण्याच्या, भ्रष्टाचार संपविण्याच्या आणि बाजार समितीचा कारभार पारदर्शकपणे करण्याची आश्वासने देऊन सहकारक्षेत्र काबीज करण्यासाठी नेते आणि उमेदवार मतदारांना आकर्षित करताना दिसून आलेत. निवडणुकीला उणेपुरे एकच दिवस शिल्लक असल्यामुळे पडद्याआड करावयाच्या राजकारणाची रणनीती सोमवारीच आखली जाणार आहे. या निवडणुकीत प्रमुख तीन पॅनेलमध्ये चुरस असली तरी अडते व व्यापारी मतदारसंघात उमेदवारांनी हायटेक पध्दतीने प्रचार केला. होर्डिंग्ज, पोस्टर्स, बॅनर, वृतपत्रातून झळकलेल्या जाहिराती बघून ही निवडणूक विधानसभा, लोकसभेच्या धर्तीवर लढली जात असल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहेत. नेत्यांचे अस्तित्व पणालाअमरावती : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला महत्त्व का आले, हा संशोधनाचा विषय आहे. शेतकऱ्यांसाठी ही बाजार समिती खरेच शेतकरी हिताचे काम करते काय, याचा विचार मतदारांनी करणे गरजेचे आहे. सोमवारी रात्री नेत्यांमध्ये छुपे मनोमिलन होण्याचीदेखील दाट शक्यता आहे. तीन पॅनेल मैदानात असले तरी आपल्या गटातील उमेदवार निवडून आणण्यासाठी नेत्यांमध्ये आपसी ‘फिक्सिंग’ होण्याची शक्यता आहे. मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी, बैठकांवर जोर देत असताना आपल्या गटातील उमेदवाराला कसे बळ मिळेल, याचे नियोजन नेते करताना दिसून येत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत प्रारंभी दोन पॅनेल रिंंगणात राहतील, असे चित्र होते. मात्र जागा वाटपावरून बोलणी फिस्कटली. त्यानंतर आ. रवी राणा यांच्या नेतृत्त्वात तिसऱ्या शेतकरी एकता पॅनेलचा उदय झाला. तिसऱ्या पॅनेलमुळे निवडणुकीचे एकूण चित्र पालटले आहे. बाजार समितीवर सत्ता मिळविण्यासाठी स्थानिक नेत्यांनी व्यूहरचना, राजकीय खेळी, मुत्सद्दीपणाचा वापर करून मतदारांना गळ घालणे सुरू केले आहे. नेते आणि उमेदवारांसाठी सोमवारची रात्र ही वैरा’ची ठरणार आहे.या निवडणुकीत सहकार पॅनेलमध्ये आ. यशोमती ठाकूर, काँग्रसचे प्रदेश सचिव संजय खोडके, विलास महल्ले, हरिभाऊ मोहोड यांचा समावेश आहे. परिवर्तन पॅनेलची धुरा माजी आमदार संजय बंड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, मनोज देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे यांच्यावर आहे. तसेच तिसऱ्या आघाडीतील शेतकरी एकता पॅनेलचे नेतृत्व आ. रवी राणा, माजी खा. अनंत गुढे, भाजपचे शहराध्यक्ष तुषार भारतीय, संयोगिता निंबाळकर, सरपंच संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गजानन बोंडे करीत आहेत. पॅनेल स्थापन करून सहकार क्षेत्रात ठसा उमटविण्यासाठी एकत्र आलेल्या विभिन्न वैचारिक पातळीच्या नेत्यांची दिलजमाई बघून सद्यस्थितीत नेतेही चक्रावून गेले आहेत. (प्रतिनिधी)