शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

सोमवारची रात्र ठरणार निर्णायक

By admin | Updated: September 14, 2015 00:00 IST

जिल्ह्यात सर्वात मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या अमरावती आणि भातकुली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचे ‘काउंटडाऊन’ सुरू झाले आहे.

बाजार समिती निवडणूक : मंगळवारी मतदान, गुप्त बैठकांना वेगगणेश वासनिक अमरावतीजिल्ह्यात सर्वात मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या अमरावती आणि भातकुली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचे ‘काउंटडाऊन’ सुरू झाले आहे. मंगळवार १५ सप्टेंबर रोजी मतदान होत असल्याने सोमवारची रात्र या निवडणुकीच्या अनुषंगाने ‘कत्ल की रात’ ठरणार आहे. एव्हाना सर्वच उमेदवारांनी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन विजयासाठी ‘फिल्डिंग’ लावल्याचे वास्तव आहे.बाजार समिती निवडणुकीत स्थानिक नेत्यांचे वर्चस्व पणाला लागले आहे. पक्षभेद, विचारसरणी गुंडाळून नेते एकत्र आले आहेत. पॅनेल तयार करुन सहकारक्षेत्रात पकड मजबूत करण्यासाठी विरोधकांना ‘धोबीपछाड’ देण्याची रणनीती आखली जात आहे. एरवी विधानसभा, लोकसभा निवडणुकीत आरोप- प्रत्यारोप करणारे नेते सध्या बाजार समितीच्या निवडणुकीत एकत्र फिरुन मतदारांसमोर जोगवा मागत आहेत. प्रचारादरम्यान बाजार समितीत शेतकऱ्यांना सोयी-सवलती देण्याच्या, भ्रष्टाचार संपविण्याच्या आणि बाजार समितीचा कारभार पारदर्शकपणे करण्याची आश्वासने देऊन सहकारक्षेत्र काबीज करण्यासाठी नेते आणि उमेदवार मतदारांना आकर्षित करताना दिसून आलेत. निवडणुकीला उणेपुरे एकच दिवस शिल्लक असल्यामुळे पडद्याआड करावयाच्या राजकारणाची रणनीती सोमवारीच आखली जाणार आहे. या निवडणुकीत प्रमुख तीन पॅनेलमध्ये चुरस असली तरी अडते व व्यापारी मतदारसंघात उमेदवारांनी हायटेक पध्दतीने प्रचार केला. होर्डिंग्ज, पोस्टर्स, बॅनर, वृतपत्रातून झळकलेल्या जाहिराती बघून ही निवडणूक विधानसभा, लोकसभेच्या धर्तीवर लढली जात असल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहेत. नेत्यांचे अस्तित्व पणालाअमरावती : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला महत्त्व का आले, हा संशोधनाचा विषय आहे. शेतकऱ्यांसाठी ही बाजार समिती खरेच शेतकरी हिताचे काम करते काय, याचा विचार मतदारांनी करणे गरजेचे आहे. सोमवारी रात्री नेत्यांमध्ये छुपे मनोमिलन होण्याचीदेखील दाट शक्यता आहे. तीन पॅनेल मैदानात असले तरी आपल्या गटातील उमेदवार निवडून आणण्यासाठी नेत्यांमध्ये आपसी ‘फिक्सिंग’ होण्याची शक्यता आहे. मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी, बैठकांवर जोर देत असताना आपल्या गटातील उमेदवाराला कसे बळ मिळेल, याचे नियोजन नेते करताना दिसून येत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत प्रारंभी दोन पॅनेल रिंंगणात राहतील, असे चित्र होते. मात्र जागा वाटपावरून बोलणी फिस्कटली. त्यानंतर आ. रवी राणा यांच्या नेतृत्त्वात तिसऱ्या शेतकरी एकता पॅनेलचा उदय झाला. तिसऱ्या पॅनेलमुळे निवडणुकीचे एकूण चित्र पालटले आहे. बाजार समितीवर सत्ता मिळविण्यासाठी स्थानिक नेत्यांनी व्यूहरचना, राजकीय खेळी, मुत्सद्दीपणाचा वापर करून मतदारांना गळ घालणे सुरू केले आहे. नेते आणि उमेदवारांसाठी सोमवारची रात्र ही वैरा’ची ठरणार आहे.या निवडणुकीत सहकार पॅनेलमध्ये आ. यशोमती ठाकूर, काँग्रसचे प्रदेश सचिव संजय खोडके, विलास महल्ले, हरिभाऊ मोहोड यांचा समावेश आहे. परिवर्तन पॅनेलची धुरा माजी आमदार संजय बंड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, मनोज देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे यांच्यावर आहे. तसेच तिसऱ्या आघाडीतील शेतकरी एकता पॅनेलचे नेतृत्व आ. रवी राणा, माजी खा. अनंत गुढे, भाजपचे शहराध्यक्ष तुषार भारतीय, संयोगिता निंबाळकर, सरपंच संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गजानन बोंडे करीत आहेत. पॅनेल स्थापन करून सहकार क्षेत्रात ठसा उमटविण्यासाठी एकत्र आलेल्या विभिन्न वैचारिक पातळीच्या नेत्यांची दिलजमाई बघून सद्यस्थितीत नेतेही चक्रावून गेले आहेत. (प्रतिनिधी)