शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सोमवारची रात्र ठरणार निर्णायक

By admin | Updated: September 14, 2015 00:00 IST

जिल्ह्यात सर्वात मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या अमरावती आणि भातकुली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचे ‘काउंटडाऊन’ सुरू झाले आहे.

बाजार समिती निवडणूक : मंगळवारी मतदान, गुप्त बैठकांना वेगगणेश वासनिक अमरावतीजिल्ह्यात सर्वात मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या अमरावती आणि भातकुली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचे ‘काउंटडाऊन’ सुरू झाले आहे. मंगळवार १५ सप्टेंबर रोजी मतदान होत असल्याने सोमवारची रात्र या निवडणुकीच्या अनुषंगाने ‘कत्ल की रात’ ठरणार आहे. एव्हाना सर्वच उमेदवारांनी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन विजयासाठी ‘फिल्डिंग’ लावल्याचे वास्तव आहे.बाजार समिती निवडणुकीत स्थानिक नेत्यांचे वर्चस्व पणाला लागले आहे. पक्षभेद, विचारसरणी गुंडाळून नेते एकत्र आले आहेत. पॅनेल तयार करुन सहकारक्षेत्रात पकड मजबूत करण्यासाठी विरोधकांना ‘धोबीपछाड’ देण्याची रणनीती आखली जात आहे. एरवी विधानसभा, लोकसभा निवडणुकीत आरोप- प्रत्यारोप करणारे नेते सध्या बाजार समितीच्या निवडणुकीत एकत्र फिरुन मतदारांसमोर जोगवा मागत आहेत. प्रचारादरम्यान बाजार समितीत शेतकऱ्यांना सोयी-सवलती देण्याच्या, भ्रष्टाचार संपविण्याच्या आणि बाजार समितीचा कारभार पारदर्शकपणे करण्याची आश्वासने देऊन सहकारक्षेत्र काबीज करण्यासाठी नेते आणि उमेदवार मतदारांना आकर्षित करताना दिसून आलेत. निवडणुकीला उणेपुरे एकच दिवस शिल्लक असल्यामुळे पडद्याआड करावयाच्या राजकारणाची रणनीती सोमवारीच आखली जाणार आहे. या निवडणुकीत प्रमुख तीन पॅनेलमध्ये चुरस असली तरी अडते व व्यापारी मतदारसंघात उमेदवारांनी हायटेक पध्दतीने प्रचार केला. होर्डिंग्ज, पोस्टर्स, बॅनर, वृतपत्रातून झळकलेल्या जाहिराती बघून ही निवडणूक विधानसभा, लोकसभेच्या धर्तीवर लढली जात असल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहेत. नेत्यांचे अस्तित्व पणालाअमरावती : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला महत्त्व का आले, हा संशोधनाचा विषय आहे. शेतकऱ्यांसाठी ही बाजार समिती खरेच शेतकरी हिताचे काम करते काय, याचा विचार मतदारांनी करणे गरजेचे आहे. सोमवारी रात्री नेत्यांमध्ये छुपे मनोमिलन होण्याचीदेखील दाट शक्यता आहे. तीन पॅनेल मैदानात असले तरी आपल्या गटातील उमेदवार निवडून आणण्यासाठी नेत्यांमध्ये आपसी ‘फिक्सिंग’ होण्याची शक्यता आहे. मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी, बैठकांवर जोर देत असताना आपल्या गटातील उमेदवाराला कसे बळ मिळेल, याचे नियोजन नेते करताना दिसून येत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत प्रारंभी दोन पॅनेल रिंंगणात राहतील, असे चित्र होते. मात्र जागा वाटपावरून बोलणी फिस्कटली. त्यानंतर आ. रवी राणा यांच्या नेतृत्त्वात तिसऱ्या शेतकरी एकता पॅनेलचा उदय झाला. तिसऱ्या पॅनेलमुळे निवडणुकीचे एकूण चित्र पालटले आहे. बाजार समितीवर सत्ता मिळविण्यासाठी स्थानिक नेत्यांनी व्यूहरचना, राजकीय खेळी, मुत्सद्दीपणाचा वापर करून मतदारांना गळ घालणे सुरू केले आहे. नेते आणि उमेदवारांसाठी सोमवारची रात्र ही वैरा’ची ठरणार आहे.या निवडणुकीत सहकार पॅनेलमध्ये आ. यशोमती ठाकूर, काँग्रसचे प्रदेश सचिव संजय खोडके, विलास महल्ले, हरिभाऊ मोहोड यांचा समावेश आहे. परिवर्तन पॅनेलची धुरा माजी आमदार संजय बंड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, मनोज देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे यांच्यावर आहे. तसेच तिसऱ्या आघाडीतील शेतकरी एकता पॅनेलचे नेतृत्व आ. रवी राणा, माजी खा. अनंत गुढे, भाजपचे शहराध्यक्ष तुषार भारतीय, संयोगिता निंबाळकर, सरपंच संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गजानन बोंडे करीत आहेत. पॅनेल स्थापन करून सहकार क्षेत्रात ठसा उमटविण्यासाठी एकत्र आलेल्या विभिन्न वैचारिक पातळीच्या नेत्यांची दिलजमाई बघून सद्यस्थितीत नेतेही चक्रावून गेले आहेत. (प्रतिनिधी)