शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

मोदींचा बसला घसा

By admin | Updated: October 11, 2014 01:03 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी चांदूररेल्वे येथे भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आले असता त्यांचा घसा बसल्याने श्रोत्यांची निराशा झाली.

अमरावती : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी चांदूररेल्वे येथे भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आले असता त्यांचा घसा बसल्याने श्रोत्यांची निराशा झाली. मोदी यांचे ज्वाजल्य विचार ऐकण्यासाठी मतदारांनी प्रचंड गर्दी केली होती. मात्र, मोदींनी घसा बसल्याने केवळ १३ मिनीटातच आपले भाषण आटोपते घेतले. त्यांच्या भाषणात फार दम नव्हता, असा सूरदेखील सभा आटोपताच मतदारांमधून ऐकावयास मिळाला.अमरावती, यवतमाळ व वर्धा जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ चांदूररेल्वे येथील कुऱ्हा मार्गावर चांदुरवाडी परिसरात विस्तीर्ण जागेवर मोदींच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभास्थळी मोदींना घेऊन येणारे वायू दलाचे तीन हेलिकॉप्टर उतरविण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सभेला मोदींचे हेलिकॉप्टर येताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला. यावेळी मोदी, मोदी जयघोषांनी आसमंत दुमदुमून गेला. त्यानंतर हेलिपॅड ते सभास्थळ यादरम्यान मोदींना काळ्या रंगाच्या बुलेटपु्रफ वाहनातून आणले गेले. मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी एसपीजी, ब्लॅक कंमाडो, पोलीस यंत्रणा तैनात होते. व्यासपीठाच्या मागील बाजूला नरेंद्र मोदी यांच्याकरिता ‘सेफ रुम’ तयार करण्यात आले होते. मोदी हे बुलेटपु्रफ वाहनातून उतरताच ‘सेफ रुम’मध्ये फ्रेश होण्यासाठी गेले. मोदी व्यासपीठावर येताच श्रोत्यांनी जयघोषाने त्यांचे स्वागत केले. नरेंद्र मोदींनी हात उंचावून मतदारांना साद घातली. दरम्यान अरुण अडसड यांनी नरेंद्र मोदी यांचे घोंगडी व ग्रामगीता देऊन स्वागत केले. त्यानंतर तिन्ही जिल्ह्यातील भाजपच्या १८ उमेदवारांनी भलामोठा हार घालून मोंदीचा सत्कार केला. दुपारी १२ वाजताच्या सुमारास सभेला चिक्कार गर्दी झाली होती. काही तास वातावरण भाजपमय झाले होते. मोदींची ही सभा धामणगाव मतदारसंघात असल्यामुळे मोंदीच्या भाषणापूर्वी अरुण अडसड यांनी मनोगत व्यक्त करुन विदर्भातील प्रश्न, विकासाचा मुद्दा त्यांच्या पुढ्यात ठेवला. त्यानंतर खा. रामदास तडस यांनी आघाडी सरकारचा समाचार घेतला. यावेळी लखनौचे महापौर दिनेश शर्मा यांना भाषणासाठी पाचारण करण्यात आले. मात्र शर्मा यांच्याऐवजी नरेंद्र मोदी यांनी भाषण करण्याचा निर्णय घेतला. मोदी हे जनसमुदायाला मार्गदर्शन करण्यासाठी डायसवर आले. मात्र आवाजात बदल झाल्याचे जाणवताच उपस्थितांमधून ‘अरे यार’ असे शब्द आपसुकच बाहेर पडले. सतत सभांमध्ये भाषण करुन गळा खराब झाला, आवाज बसल्याचे मोदी म्हणाले. मोदींनी विदर्भातील संत्रा, कापूस उत्पादकांच्या प्रश्नांवर हात घातला. शेतकरी आत्महत्या विषयावरही चिंतन केले. विकासाचा ‘फाईव्ह एफ फॉर्म्युला’ तसेच पाकिस्तानला सीमेवर भारतीय सैनिकांनी दिलेले गोळीबाराचे उत्तर, सीमेवरील नागरिकांच्या स्थानांतरणाची नुकसान भरपाई यावर ते बोलले. मोदींनी ११ मिनीट भाषण दिले, पण त्यात ‘तो’ जोश नव्हता. गर्दी पाहून ही गर्दी विजयाचे प्रतिक आहे, असे सांगायला ते विसरले नाहीत. सभास्थळी ये-जा करण्यासाठी एकच मार्ग असल्यामुळे वाहतूक व्यवस्था, सुरक्षा यंत्रणा सांभाळताना पोलिसांची तारांबळ उडाली, हे विशेष.